शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

सुसाईड नोटमध्ये कुणाचं नाव लिहिलं असेल तर त्यांच्याविरोधात 'कशी' कारवाई होते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 11:15 IST

बऱ्याचदा सुसाईड नोटमध्ये नाव लिहून आत्महत्या केली जाते परंतु जर सुसाईड नोटमध्ये कुणाचं नाव लिहून मृत्यू झाला तर त्या व्यक्तींवर काय कारवाई होते असा प्रश्न अनेकांना पडला असेल. 

बंगळुरूच्या ३४ वर्षीय इंजिनिअर अतुल सुभाषच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर सर्व लोक त्याला न्याय देण्याची मागणी करत आहेत. अतुल सुभाषने मृत्यूपूर्वी व्हिडिओ आणि सुसाईड नोटमधून पत्नी आणि तिच्या घरच्यांवर गंभीर आरोप केले. पत्नीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून अतुलने आत्महत्या केल्याचं पुढे आले. सुसाईड करण्यापूर्वी अतुल सुभाषने जवळपास दीड तासाचा व्हिडिओ आणि २४ पानी सुसाईड नोट लिहून टोकाचं पाऊल उचलले.

अतुलने व्हिडिओत आणि सुसाईड नोटमध्ये आत्महत्या का करतोय ते सांगितले, त्याच आधारे बंगळुरू पोलीस स्टेशनला अतुलच्या भावाने अतुलची पत्नी आणि त्याच्या सासरच्यांवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. बऱ्याचदा सुसाईड नोटमध्ये नाव लिहून आत्महत्या केली जाते परंतु जर सुसाईड नोटमध्ये कुणाचं नाव लिहून मृत्यू झाला तर त्या व्यक्तींवर काय कारवाई होते असा प्रश्न अनेकांना पडला असेल. 

'या' कलमाअंतर्गत दाखल होतो गुन्हा

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी बंगळुरू पोलिसांनी भारतीय न्याय संहिता बीएस कलम १०८ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जर कुणी सुसाईड नोटमध्ये एखाद्याचं नाव लिहून निघून जातो तर याच कलमाखाली पोलीस गुन्हा दाखल करतात. जर पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला तर कोर्टात प्रकरण सुनावणीस येते. जर आरोप सिद्ध झाले तर संबंधिताला १० वर्षापर्यंत जेल आणि दंड भरावा लागू शकतो. अशा प्रकरणी पोलीस कुठल्याही परवानगीशिवाय अटक करू शकते. हा अजामीनपात्र गुन्हा असतो. 

मात्र जर कुणी सुसाईड नोटमध्ये एखाद्याचे नाव लिहून आत्महत्या करत असेल तर केवळ याच आरोपाखाली त्याला शिक्षा मिळू शकत नाही. त्याआधी संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागते. ज्यात सुसाईड नोटची सत्यता पडताळली जाते कारण हा प्राथमिक पुरावा असतो. सुसाईड करणाऱ्या व्यक्तीने त्याच्यात हस्ताक्षरात नोट लिहिली की नाही याची पडताळणी केली जाते. त्यानंतर सुसाईड नोटमधील आरोपांचा तपास केला जातो. सुसाईड नोटची सत्यता आणि त्यात लावलेले आरोप याची पडताळणी झाल्यानंतरच पोलीस गुन्हा नोंदवते. त्यानंतर पुरावे गोळा केले जातात. कोर्टात खटला चालतो आणि सुनावणीनंतर निर्णय दिला जातो. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी