शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

सुसाईड नोटमध्ये कुणाचं नाव लिहिलं असेल तर त्यांच्याविरोधात 'कशी' कारवाई होते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 11:15 IST

बऱ्याचदा सुसाईड नोटमध्ये नाव लिहून आत्महत्या केली जाते परंतु जर सुसाईड नोटमध्ये कुणाचं नाव लिहून मृत्यू झाला तर त्या व्यक्तींवर काय कारवाई होते असा प्रश्न अनेकांना पडला असेल. 

बंगळुरूच्या ३४ वर्षीय इंजिनिअर अतुल सुभाषच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर सर्व लोक त्याला न्याय देण्याची मागणी करत आहेत. अतुल सुभाषने मृत्यूपूर्वी व्हिडिओ आणि सुसाईड नोटमधून पत्नी आणि तिच्या घरच्यांवर गंभीर आरोप केले. पत्नीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून अतुलने आत्महत्या केल्याचं पुढे आले. सुसाईड करण्यापूर्वी अतुल सुभाषने जवळपास दीड तासाचा व्हिडिओ आणि २४ पानी सुसाईड नोट लिहून टोकाचं पाऊल उचलले.

अतुलने व्हिडिओत आणि सुसाईड नोटमध्ये आत्महत्या का करतोय ते सांगितले, त्याच आधारे बंगळुरू पोलीस स्टेशनला अतुलच्या भावाने अतुलची पत्नी आणि त्याच्या सासरच्यांवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. बऱ्याचदा सुसाईड नोटमध्ये नाव लिहून आत्महत्या केली जाते परंतु जर सुसाईड नोटमध्ये कुणाचं नाव लिहून मृत्यू झाला तर त्या व्यक्तींवर काय कारवाई होते असा प्रश्न अनेकांना पडला असेल. 

'या' कलमाअंतर्गत दाखल होतो गुन्हा

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी बंगळुरू पोलिसांनी भारतीय न्याय संहिता बीएस कलम १०८ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जर कुणी सुसाईड नोटमध्ये एखाद्याचं नाव लिहून निघून जातो तर याच कलमाखाली पोलीस गुन्हा दाखल करतात. जर पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला तर कोर्टात प्रकरण सुनावणीस येते. जर आरोप सिद्ध झाले तर संबंधिताला १० वर्षापर्यंत जेल आणि दंड भरावा लागू शकतो. अशा प्रकरणी पोलीस कुठल्याही परवानगीशिवाय अटक करू शकते. हा अजामीनपात्र गुन्हा असतो. 

मात्र जर कुणी सुसाईड नोटमध्ये एखाद्याचे नाव लिहून आत्महत्या करत असेल तर केवळ याच आरोपाखाली त्याला शिक्षा मिळू शकत नाही. त्याआधी संपूर्ण प्रक्रिया पार पाडावी लागते. ज्यात सुसाईड नोटची सत्यता पडताळली जाते कारण हा प्राथमिक पुरावा असतो. सुसाईड करणाऱ्या व्यक्तीने त्याच्यात हस्ताक्षरात नोट लिहिली की नाही याची पडताळणी केली जाते. त्यानंतर सुसाईड नोटमधील आरोपांचा तपास केला जातो. सुसाईड नोटची सत्यता आणि त्यात लावलेले आरोप याची पडताळणी झाल्यानंतरच पोलीस गुन्हा नोंदवते. त्यानंतर पुरावे गोळा केले जातात. कोर्टात खटला चालतो आणि सुनावणीनंतर निर्णय दिला जातो. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी