शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

टीव्ही पाहून मिळाली आयडिया; पतीने आधी पत्नीला संपवलं, त्यानंतर तिचा मृतदेह...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 09:08 IST

पोलिसांनी ज्या ठिकाणाहून बॅग जप्त केली त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली.

गुरुग्राम - शहरातील सुटकेस कांडमध्ये नवा खुलासा झाला असून आरोपीने टीव्ही आणि वृत्तपत्रातून मृतदेह सुटकेसमध्ये टाकून फेकून दिल्याच्या बातम्या ऐकल्या आणि वाचल्या होत्या. तेच पाहून पतीला पत्नीची हत्या करून मृतदेहाचा बंदोबस्त करण्याची आयडिया सापडली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने या हत्याकांडाचा खुलासा केला आहे. 

मागील सोमवारी गुरुग्रामच्या चौकात रस्त्याशेजारी एक बॅग बेवारस अवस्थेत आढळली. एका ऑटो चालकाची नजर त्या बॅगवर गेली त्याने पोलिसांना याबाबत कळवलं. सूचना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यानंतर जेव्हा बॅग उघडून पाहिली तेव्हा त्यात एक मृतदेह सापडल्याने खळबळ माजली. हा मृतदेह एका मुलीचा होता. तिच्या अंगावर कपडे नव्हते. शरीरावर झालेल्या जखमा पाहून तिच्यावर क्रूर अत्याचार झाल्याचं दिसून येते. 

सर्वात विचित्र म्हणजे मृत मुलीच्या हातावर चाकूने आणि जाळण्याचा प्रयत्न झाल्याच्या खूणा आढळल्या. कदाचित हातावर टॅटू असण्याची शक्यता होती. त्याला मिटवण्याचा प्रयत्न झाला असावा. बॅगेत मृतदेहाशिवाय इतर काहीही सापडले नाही. ज्यामुळे मृत मुलीची ओळख पटवता येईल. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी पाठवला. 

पोलिसांनी ज्या ठिकाणाहून बॅग जप्त केली त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. योगायोगाने एका कॅमेऱ्यात एक माणूस तीच बॅग रस्त्यावर ओढताना दिसतो. भरदिवसा मृतदेह ठेवून, बॅग घेत बेधडकपणे रस्त्याने चालत होते. या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अखेर पोलिसांनी संशयिताची ओळख पटवली आणि लवकरच त्याला पकडले. त्याने आपला गुन्हाही कबूल केला. पण त्याने सांगितलेली हत्येची कहाणी खूप विचित्र होती.

आरोपी भाड्याच्या घरात राहत होताआरोपी मारेकऱ्याचे नाव राहुल आहे. आणि ज्या महिलेचा मृतदेह बॅगेत सापडला ती त्याची पत्नी प्रियांका होती. दोघेही यूपीचे रहिवासी आहेत. दोघेही प्रेमात पडले आणि त्यांनी दीड वर्षांपूर्वी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले. लग्नानंतर दोघेही गुरुग्रामला आले आणि तिथे भाड्याच्या घरात राहू लागले. राहुल गुरुग्राममध्ये एका कंपनीत काम करायचा. त्यांचा पगार फक्त १२ हजार रुपये होता.चौकशीत राहुलने पोलिसांना सांगितले की, लग्नानंतर पत्नीने कधी टीव्ही तर कधी महागड्या मोबाईलची मागणी करायला सुरुवात केली. हे सर्व विकत घेण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे दोघांमध्ये भांडण सुरू झाले. सततच्या मागण्या आणि दिवसेंदिवस होणाऱ्या भांडणांना कंटाळून राहुलने पत्नीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. 

टीव्ही पाहिल्यानंतर आटडिया मिळालीबॅगमध्ये मृतदेहाच्या अनेक कथा त्यांनी टीव्ही आणि वर्तमानपत्रात पाहिल्या आणि वाचल्या होत्या. १६ ऑक्टोबरच्या रात्री त्याचे पुन्हा पत्नीसोबत भांडण झाले. यानंतर रागाच्या भरात त्याने पत्नी प्रियांकाचा गळा आवळून खून केला. पत्नीच्या हातावर त्याच्या नावाचा टॅटूही कोरला होता.त्यामुळे तो टॅटू पुसण्यासाठी राहुलने चाकूने पत्नीचा हात खरवडला आणि नंतर पेटवून दिला. यानंतर तो रात्रभर मृतदेहासोबत घरातच राहिला.