शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

टीव्ही पाहून मिळाली आयडिया; पतीने आधी पत्नीला संपवलं, त्यानंतर तिचा मृतदेह...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 09:08 IST

पोलिसांनी ज्या ठिकाणाहून बॅग जप्त केली त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली.

गुरुग्राम - शहरातील सुटकेस कांडमध्ये नवा खुलासा झाला असून आरोपीने टीव्ही आणि वृत्तपत्रातून मृतदेह सुटकेसमध्ये टाकून फेकून दिल्याच्या बातम्या ऐकल्या आणि वाचल्या होत्या. तेच पाहून पतीला पत्नीची हत्या करून मृतदेहाचा बंदोबस्त करण्याची आयडिया सापडली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने या हत्याकांडाचा खुलासा केला आहे. 

मागील सोमवारी गुरुग्रामच्या चौकात रस्त्याशेजारी एक बॅग बेवारस अवस्थेत आढळली. एका ऑटो चालकाची नजर त्या बॅगवर गेली त्याने पोलिसांना याबाबत कळवलं. सूचना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यानंतर जेव्हा बॅग उघडून पाहिली तेव्हा त्यात एक मृतदेह सापडल्याने खळबळ माजली. हा मृतदेह एका मुलीचा होता. तिच्या अंगावर कपडे नव्हते. शरीरावर झालेल्या जखमा पाहून तिच्यावर क्रूर अत्याचार झाल्याचं दिसून येते. 

सर्वात विचित्र म्हणजे मृत मुलीच्या हातावर चाकूने आणि जाळण्याचा प्रयत्न झाल्याच्या खूणा आढळल्या. कदाचित हातावर टॅटू असण्याची शक्यता होती. त्याला मिटवण्याचा प्रयत्न झाला असावा. बॅगेत मृतदेहाशिवाय इतर काहीही सापडले नाही. ज्यामुळे मृत मुलीची ओळख पटवता येईल. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी पाठवला. 

पोलिसांनी ज्या ठिकाणाहून बॅग जप्त केली त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. योगायोगाने एका कॅमेऱ्यात एक माणूस तीच बॅग रस्त्यावर ओढताना दिसतो. भरदिवसा मृतदेह ठेवून, बॅग घेत बेधडकपणे रस्त्याने चालत होते. या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अखेर पोलिसांनी संशयिताची ओळख पटवली आणि लवकरच त्याला पकडले. त्याने आपला गुन्हाही कबूल केला. पण त्याने सांगितलेली हत्येची कहाणी खूप विचित्र होती.

आरोपी भाड्याच्या घरात राहत होताआरोपी मारेकऱ्याचे नाव राहुल आहे. आणि ज्या महिलेचा मृतदेह बॅगेत सापडला ती त्याची पत्नी प्रियांका होती. दोघेही यूपीचे रहिवासी आहेत. दोघेही प्रेमात पडले आणि त्यांनी दीड वर्षांपूर्वी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले. लग्नानंतर दोघेही गुरुग्रामला आले आणि तिथे भाड्याच्या घरात राहू लागले. राहुल गुरुग्राममध्ये एका कंपनीत काम करायचा. त्यांचा पगार फक्त १२ हजार रुपये होता.चौकशीत राहुलने पोलिसांना सांगितले की, लग्नानंतर पत्नीने कधी टीव्ही तर कधी महागड्या मोबाईलची मागणी करायला सुरुवात केली. हे सर्व विकत घेण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे दोघांमध्ये भांडण सुरू झाले. सततच्या मागण्या आणि दिवसेंदिवस होणाऱ्या भांडणांना कंटाळून राहुलने पत्नीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. 

टीव्ही पाहिल्यानंतर आटडिया मिळालीबॅगमध्ये मृतदेहाच्या अनेक कथा त्यांनी टीव्ही आणि वर्तमानपत्रात पाहिल्या आणि वाचल्या होत्या. १६ ऑक्टोबरच्या रात्री त्याचे पुन्हा पत्नीसोबत भांडण झाले. यानंतर रागाच्या भरात त्याने पत्नी प्रियांकाचा गळा आवळून खून केला. पत्नीच्या हातावर त्याच्या नावाचा टॅटूही कोरला होता.त्यामुळे तो टॅटू पुसण्यासाठी राहुलने चाकूने पत्नीचा हात खरवडला आणि नंतर पेटवून दिला. यानंतर तो रात्रभर मृतदेहासोबत घरातच राहिला.