शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

तीन मुलांच्या बापानं पैशांसाठी केलं अनेक जणींसोबत लग्न, जेव्हा पहिल्या पत्नीला कळालं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 22:18 IST

तुम्ही 'डॉली की डोली' हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल ज्यामध्ये वधू-अभिनेत्री सोनम कपूर अनेकांना फसवते आणि घरातील सर्व सामान घेऊन फरार होते. आता वास्तविक जीवनात पात्रं बदलली आहेत परंतु प्रकरण तेच आहे.

दानापूर

तुम्ही 'डॉली की डोली' हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल ज्यामध्ये वधू-अभिनेत्री सोनम कपूर अनेकांना फसवते आणि घरातील सर्व सामान घेऊन फरार होते. आता वास्तविक जीवनात पात्रं बदलली आहेत परंतु प्रकरण तेच आहे. पाटण्याच्या जवळ असलेल्या दानापूरमध्ये एक तरुण तीन मुलांचा बाप असूनही एकदा नव्हे तर अनेकदा वेगवेगळ्या मुलींसोबत विवाह केला आहे. 

लग्न करायचं आणि वधू पक्षाकडून हुंडा वसूल करायचा असा या नराधमाचा प्रताप सुरू होता. तरुणाच्या कुटुंबीयांनीही त्याला साथ दिली. लग्नानंतर वधू वराच्या घरी पोहोचताच आरोपीचे कुटुंबीय प्लान करुन वधूला घरातून हाकलून देत असत. आरोपी तरुणाला अधिकाधिक मुलींशी लग्न करून रेकॉर्ड करायचा होता. अनेक मुलींना भुरळ पाडून फसवणाऱ्या या वरामुळे पोलिसही हैराण झाले आहेत. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी आता वराचा शोध सुरू केला आहे.

दानापूरच्या दुल्हीन बाजार भागातील ही घटना असून रेल्वेमध्ये मोटरमन म्हणून काम करणारा व्यक्ती आतापर्यंत तीन लग्न करुन झाला आहे. यासोबतच तो आणखी काही मुलींना लग्नासाठी तयार करत होता. आरोपीच्या फसवणुकीला बळी पडलेल्या पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानंतर पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी अजय पासवान तीन मुलांचा बाप आहे आणि त्यानं अनेक लग्न केली आहेत. खगौल येथील नानचक येथे राहणारा आरोपी हा रेल्वे कर्मचारी असून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्याशी लग्न करुन पैसे उकळायचा त्याचा धंदा सुरू होता. 

दुल्हन बाजारच्या सिघाडा येथे राहणार्‍या गुंजा कुमारीचे लग्न 12 मार्च 2020 रोजी खगौल पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी भरत पासवान यांच्या मुलासोबत मंदिरात झालं होतं. लग्नाच्या वेळी मुलगा अविवाहित असून रेल्वेत मोटरमन असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर गुंजा कुमारीच्या वडिलांनी हुंड्यात अनेक गोष्टी देऊन मुलीचे हात पिवळे केले.

ज्यावेळी गुंजा तिच्या सासरच्या घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिले की आरोपी वराची दुसरी पत्नी गरोदर आहे आणि त्याचं आधीच लग्न झालं आहे. "आरोपीनं दिल्लीला नेलं आणि भाड्याच्या घरात ठेवलं. काही दिवसांनी वैशालीच्या राघोपूर येथील दुसऱ्या मुलीशी लग्न झाल्याचं मला समजलं. तो तीन मुलांचा बापही आहे", असं गुंजा हिनं सांगितलं. तिनं आक्षेप घेत सासरचं घर गाठलं, तिथं सासरच्यांनी तिला घरात जाण्यापासून रोखलं आणि मारहाण केली. या प्रकरणाबाबत पोलीस स्टेशन प्रभारी अशोक कुमार यांनी सांगितले की, विवाहितेनं तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून योग्य ती कारवाई केली जाईल. सध्या आरोपी फरार असल्याचं सांगण्यात येत आहे.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी