शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

तीन मुलांच्या बापानं पैशांसाठी केलं अनेक जणींसोबत लग्न, जेव्हा पहिल्या पत्नीला कळालं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 22:18 IST

तुम्ही 'डॉली की डोली' हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल ज्यामध्ये वधू-अभिनेत्री सोनम कपूर अनेकांना फसवते आणि घरातील सर्व सामान घेऊन फरार होते. आता वास्तविक जीवनात पात्रं बदलली आहेत परंतु प्रकरण तेच आहे.

दानापूर

तुम्ही 'डॉली की डोली' हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल ज्यामध्ये वधू-अभिनेत्री सोनम कपूर अनेकांना फसवते आणि घरातील सर्व सामान घेऊन फरार होते. आता वास्तविक जीवनात पात्रं बदलली आहेत परंतु प्रकरण तेच आहे. पाटण्याच्या जवळ असलेल्या दानापूरमध्ये एक तरुण तीन मुलांचा बाप असूनही एकदा नव्हे तर अनेकदा वेगवेगळ्या मुलींसोबत विवाह केला आहे. 

लग्न करायचं आणि वधू पक्षाकडून हुंडा वसूल करायचा असा या नराधमाचा प्रताप सुरू होता. तरुणाच्या कुटुंबीयांनीही त्याला साथ दिली. लग्नानंतर वधू वराच्या घरी पोहोचताच आरोपीचे कुटुंबीय प्लान करुन वधूला घरातून हाकलून देत असत. आरोपी तरुणाला अधिकाधिक मुलींशी लग्न करून रेकॉर्ड करायचा होता. अनेक मुलींना भुरळ पाडून फसवणाऱ्या या वरामुळे पोलिसही हैराण झाले आहेत. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी आता वराचा शोध सुरू केला आहे.

दानापूरच्या दुल्हीन बाजार भागातील ही घटना असून रेल्वेमध्ये मोटरमन म्हणून काम करणारा व्यक्ती आतापर्यंत तीन लग्न करुन झाला आहे. यासोबतच तो आणखी काही मुलींना लग्नासाठी तयार करत होता. आरोपीच्या फसवणुकीला बळी पडलेल्या पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानंतर पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी अजय पासवान तीन मुलांचा बाप आहे आणि त्यानं अनेक लग्न केली आहेत. खगौल येथील नानचक येथे राहणारा आरोपी हा रेल्वे कर्मचारी असून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्याशी लग्न करुन पैसे उकळायचा त्याचा धंदा सुरू होता. 

दुल्हन बाजारच्या सिघाडा येथे राहणार्‍या गुंजा कुमारीचे लग्न 12 मार्च 2020 रोजी खगौल पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी भरत पासवान यांच्या मुलासोबत मंदिरात झालं होतं. लग्नाच्या वेळी मुलगा अविवाहित असून रेल्वेत मोटरमन असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर गुंजा कुमारीच्या वडिलांनी हुंड्यात अनेक गोष्टी देऊन मुलीचे हात पिवळे केले.

ज्यावेळी गुंजा तिच्या सासरच्या घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिले की आरोपी वराची दुसरी पत्नी गरोदर आहे आणि त्याचं आधीच लग्न झालं आहे. "आरोपीनं दिल्लीला नेलं आणि भाड्याच्या घरात ठेवलं. काही दिवसांनी वैशालीच्या राघोपूर येथील दुसऱ्या मुलीशी लग्न झाल्याचं मला समजलं. तो तीन मुलांचा बापही आहे", असं गुंजा हिनं सांगितलं. तिनं आक्षेप घेत सासरचं घर गाठलं, तिथं सासरच्यांनी तिला घरात जाण्यापासून रोखलं आणि मारहाण केली. या प्रकरणाबाबत पोलीस स्टेशन प्रभारी अशोक कुमार यांनी सांगितले की, विवाहितेनं तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून योग्य ती कारवाई केली जाईल. सध्या आरोपी फरार असल्याचं सांगण्यात येत आहे.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी