शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"१८ वर्षांत २५ वेळा घरातून पळून गेली पत्नी, आयुष्य उद्ध्वस्त केलं"; त्रासलेल्या पतीची तक्रार, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 14:16 IST

पत्नीने आपलं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप पतीने केला आहे.

उत्तर प्रदेशातील बरेली येथून एका पतीने आपल्या पत्नीबाबत एसपीकडे तक्रार केल्याची घटना समोर आली आहे. पत्नीने आपलं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप पतीने केला आहे. त्यांच्या लग्नाला १८ वर्षे झाली असून या वर्षांत ती २५ वेळा घरातून पळून गेली आहे. पती म्हणाला की, ती केव्हाही कुठेही निघून जाते आणि मी तिला शोधत राहतो. अनेकदा पोलिसांनी तिला शोधून परत आणलं आहे. एवढेच नाही तर तिने पतीविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हाही दाखल केला आहे.

हे प्रकरण बरेलीच्या किला पोलीस स्टेशनचं आहे जिथे मोहल्ला हुसैन बाग येथे राहणारा अफसर अली म्हणाला की, तो टॅक्सी चालवतो. २००६ मध्ये गुलाब नगरमध्ये राहणाऱ्या रुबी खानसोबत त्याचं लग्न झालं होतं. त्याला तीन मुलं आहेत. तिन्ही मुलं त्याच्यासोबत राहतात. अधिकाऱ्याने सांगितलं की, रुबीने लग्नानंतर घर सोडून जायला सुरुवात केली होती. छोट्या-छोट्या मुद्द्यावरून ती घराबाहेर जायची.

पतीने आरोप केला आहे की, २०१९ मध्ये देखील त्याची पत्नी घर सोडून गेली होती आणि पोलिसांच्या मदतीने तिला शोधून काढण्यात आलं. यानंतर ती आपल्या मुलीसोबत नोएडाला गेली. २०२३ मध्ये, मुलीने फोन केला आणि सांगितलं की तिच्या आईने तिला घरातून हाकलून दिलं आहे. त्यानंतर त्याने आपल्या मुलीला नोएडाहून घरी आणलं. एवढेच नाही तर पत्नीने त्याच्यावर हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हाही दाखल केला आहे. घर, गाडी सगळं काही पत्नीच्या नावावर आहे.

अफसर अली म्हणाला की, पत्नी घरातून वारंवार पळून गेल्याने तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. इकडे तिकडे तिच्या शोधात तो आपल्या मुलांकडे लक्षही देऊ शकत नाही. त्याची सासूही पतीपासून वेगळी राहते आणि पत्नीच्या बहिणीने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं त्याने सांगितलं. तिच्या एका भावाने सहा लग्न केलं असून दुसऱ्या भावाची मानसिक स्थिती इतकी बिकट आहे, तो रस्त्यावर भटकत राहतो. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश