शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 10:01 IST

पतीला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत असलेल्या एका महिलेची गळा दाबून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील बरेली शहरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. पतीला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत असलेल्या एका महिलेची गळा दाबून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या घटनेचा खुलासा महिलेच्या चार वर्षांच्या चिमुकल्या मुलाने केला असून, त्याने आपल्या आईची प्रियकरानेच हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, प्रियकर आणि पती दोघांचाही शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिलीभीत जिल्ह्यातील मीरा शर्मा (वय ३०) या महिलेचा मृतदेह बरेलीतील रामगंगा नगर सेक्टर-७, ब्लॉक-८ मधील एका भाड्याच्या क्वार्टरमध्ये आढळला. सकाळी खोलीचा दरवाजा बंद असल्याने आणि आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी बिथरी चैनपूर पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा उघडला असता, मीराचा मृतदेह खोलीत पडलेला दिसला. तिचा चेहरा सुजलेला होता आणि शरीरावर मारहाणीच्या अनेक खुणा स्पष्ट दिसत होत्या, असे पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालात गळा दाबून हत्या झाल्याचे आणि शरीरावर अनेक जखमा असल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉक्टरांनुसार, मृत्यू सुमारे २० तासांपूर्वी, म्हणजेच गुरुवारी रात्री झाला होता.

चिमुकल्या मुलाने दिला धक्कादायक जबाबघटनेच्या वेळी खोलीत मीराचा चार वर्षांचा मुलगा गोविंदाही उपस्थित होता. तो घाबरलेल्या अवस्थेत एका कोपऱ्यात बसला होता. पोलिसांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, तो सुरुवातीला घाबरला. मात्र, शेजारच्या महिलांनी त्याला समजावून सांगितल्यावर, त्याने हळूवारपणे सांगितले की, "काकांनी (आईचा प्रियकर) आईचा गळा दाबला." मुलाच्या या जबाबामुळे पोलिसांचा संशय मीराचा प्रियकर गुड्डू उर्फ आशिक याच्यावर अधिक बळावला. शेजाऱ्यांनीही रात्री त्यांच्या खोलीतून भांडणाचे आवाज येत असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

मीराचे वैयक्तिक जीवन आणि संशयाच्या भोवऱ्यात पतीही!पोलिसांच्या माहितीनुसार, मीरा शर्माचे लग्न सुमारे आठ वर्षांपूर्वी पवन नावाच्या तरुणासोबत झाले होते. सुरुवातीला सर्व काही ठीक असले तरी, नंतर दोघांमध्ये वारंवार भांडणे होऊ लागली. सुमारे एक वर्षापूर्वी हे वाद इतके विकोपाला गेले की, मीरा तिचा चार वर्षांचा मुलगा गोविंदासोबत पतीचे घर सोडून माहेरी परतली. काही काळ माहेरी राहिल्यानंतर, ती बरेलीत येऊन एक क्वार्टर भाड्याने घेऊन शाहजहानपूर येथील गुड्डू उर्फ आशिकसोबत राहू लागली. गुड्डू हा दुसऱ्या समुदायाचा असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. त्यांच्यातही अनेकदा भांडणे होत असत.

पोलिसांच्या तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, मीराचा पती पवन देखील कधीकधी त्याच क्वार्टरमध्ये येत असे. पवन आणि मीराचे अनेकवेळा भांडण झाले होते आणि एक-दोनदा पवनने त्यांच्या मुलाला जबरदस्तीने पळवून नेले होते. मीराचा मोठा मुलगा अजूनही पवनसोबतच राहतो. यामुळे, पती पवनची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आली असून, पोलीस त्याचाही शोध घेत आहेत.

पोलिसांची पुढील कारवाईबिथरी चैनपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्र प्रकाश शुक्ला यांनी सांगितले की, सध्या गुड्डूला हत्येतील मुख्य आरोपी मानले जात आहे आणि त्याचा शोध घेतला जात आहे. त्याचा मोबाईलही बंद येत आहे. मात्र, पती पवनची भूमिकाही संशयास्पद असल्याने, पोलीस त्याचाही शोध घेत आहेत जेणेकरून त्याची चौकशी करता येईल. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून ते कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहे. घटनास्थळावरून आवश्यक पुरावे जमा करण्यात आले असून, हे प्रकरण लवकरच उघडकीस येईल, असे निरीक्षक शुक्ला यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी