शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

बुलेट न दिल्यानं पतीनं पत्नीला जाळून मारलं; दीड महिन्याची चिमुरडी पोरकी झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 15:25 IST

पती आणि सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी मुलीला पेटवून दिले असा आरोप मृत महिलेच्या आईने केला आहे.

बरेली - उत्तर प्रदेशात सातत्याने हुंड्यामुळे महिलांच्या हत्या होत असल्याचं समोर येत आहे. आता बरेली येथील चैनपूरमध्ये हुंड्यात बुलेट न दिल्यानं सासरच्या मंडळींना राग आला. त्यांनी सूनेला जाळून टाकलं. आगीत भाजल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. आता महिलेच्या मृत्यूनंतर माहेरच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंद करत सासरच्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवला आहे. 

पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मृत महिलेच्या आईनं सांगितले की, हाफिज गंज येथे राहणारी आमची मुलगी राजवीचं लग्न बिथरीच्या तालिबसोबत ३ वर्षापूर्वी झालं होते. मुलीने दीड महिन्यापूर्वी मुलीला जन्म दिला होता. मुलीच्या जन्मानंतर सासरची मंडळी आणि पती सूनेचा छळ करू लागले. इतकेच नाही तर हुंड्यात बुलेटची मागणी केली आणि बुलेट दिल्यास घरातून बाहेर काढण्याची धमकी दिली. मुलीने आम्हाला फोन केला तेव्हा आम्ही सासरी पोहचलो. पतीने आतून दरवाजा बंद केला त्यामुळे मुलीशी बोलणंही झाले नाही. 

पती आणि सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी मुलीला पेटवून दिले असा आरोप मृत महिलेच्या आईने केला आहे. आई म्हणाली की, माझी मुलगी राजवीला सासरकडून बुलेटची मागणी केली जात होती. ही मागणी पूर्ण न झाल्याने हुंड्यासाठी त्यांनी मुलीला जाळलं. जेव्हा जखमी अवस्थेत मुलीला हॉस्पिटलला नेण्यात आले तेव्हा तिचं शरीर ८० टक्के भाजले होते असं डॉक्टरांनी सांगितले. उपचारावेळी ६ तासानंतर महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आले. 

या प्रकरणी बिथरी चैनपूरचे पोलीस निरीक्षक हिंताशु शर्मा म्हणाले की, हाफीज गंजला राहणाऱ्या एका महिलेचे लग्न ३ वर्षापूर्वी झाले होते. महिलेच्या आईने सासरच्या मंडळींवर हुंड्याचा आरोप लावला आहे. हुंड्यासाठी हत्या करण्याचा आरोप केला आहे. महिलेच्या आईनं दिलेल्या तक्रारीनंतर या चौकशीला सुरूवात झाली आहे. 

टॅग्स :Policeपोलिस