शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

बुलेट न दिल्यानं पतीनं पत्नीला जाळून मारलं; दीड महिन्याची चिमुरडी पोरकी झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 15:25 IST

पती आणि सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी मुलीला पेटवून दिले असा आरोप मृत महिलेच्या आईने केला आहे.

बरेली - उत्तर प्रदेशात सातत्याने हुंड्यामुळे महिलांच्या हत्या होत असल्याचं समोर येत आहे. आता बरेली येथील चैनपूरमध्ये हुंड्यात बुलेट न दिल्यानं सासरच्या मंडळींना राग आला. त्यांनी सूनेला जाळून टाकलं. आगीत भाजल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. आता महिलेच्या मृत्यूनंतर माहेरच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंद करत सासरच्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवला आहे. 

पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मृत महिलेच्या आईनं सांगितले की, हाफिज गंज येथे राहणारी आमची मुलगी राजवीचं लग्न बिथरीच्या तालिबसोबत ३ वर्षापूर्वी झालं होते. मुलीने दीड महिन्यापूर्वी मुलीला जन्म दिला होता. मुलीच्या जन्मानंतर सासरची मंडळी आणि पती सूनेचा छळ करू लागले. इतकेच नाही तर हुंड्यात बुलेटची मागणी केली आणि बुलेट दिल्यास घरातून बाहेर काढण्याची धमकी दिली. मुलीने आम्हाला फोन केला तेव्हा आम्ही सासरी पोहचलो. पतीने आतून दरवाजा बंद केला त्यामुळे मुलीशी बोलणंही झाले नाही. 

पती आणि सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी मुलीला पेटवून दिले असा आरोप मृत महिलेच्या आईने केला आहे. आई म्हणाली की, माझी मुलगी राजवीला सासरकडून बुलेटची मागणी केली जात होती. ही मागणी पूर्ण न झाल्याने हुंड्यासाठी त्यांनी मुलीला जाळलं. जेव्हा जखमी अवस्थेत मुलीला हॉस्पिटलला नेण्यात आले तेव्हा तिचं शरीर ८० टक्के भाजले होते असं डॉक्टरांनी सांगितले. उपचारावेळी ६ तासानंतर महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आले. 

या प्रकरणी बिथरी चैनपूरचे पोलीस निरीक्षक हिंताशु शर्मा म्हणाले की, हाफीज गंजला राहणाऱ्या एका महिलेचे लग्न ३ वर्षापूर्वी झाले होते. महिलेच्या आईने सासरच्या मंडळींवर हुंड्याचा आरोप लावला आहे. हुंड्यासाठी हत्या करण्याचा आरोप केला आहे. महिलेच्या आईनं दिलेल्या तक्रारीनंतर या चौकशीला सुरूवात झाली आहे. 

टॅग्स :Policeपोलिस