शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आई वडील धार्मिक सहभागी होत नसल्याची तक्रार; संतप्त मुलाने दोघांनाही संपवलं, देशाबाहेर जात होता पळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 17:08 IST

पश्चिम बंगालमध्ये आई वडिलांची हत्या करणाऱ्या हुमायून कबीरबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

West Bengal Crime: आपल्या पालकांची हत्या करणाऱ्या बेरोजगार सिव्हिल इंजिनिअरला पोलिसांनी अटक केली आहे. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमांच्या अभावामुळे तो त्रस्त होता. 'रोहिंग्या समर्थक' असलेला हुमायू एकांतवासात राहत होता आणि धार्मिक साहित्यात रमलेला होता. तो म्यानमारमधून पळून जाण्याच्या तयारीत होता. हुमायून कबीर असं त्याचे नाव असल्याचे समोर आलं आहे. कबीरला गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमधील पूर्वा वर्धमान येथून अटक करण्यात आली होती.

जादवपूर विद्यापीठातून पदवीधर झालेल्या हुमायून कबीरने २८ मे रोजी पूर्व बर्दवानमधील मेमारी येथील त्याच्या घरी त्याच्या वृद्ध पालकांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने त्याच्या पालकांचे मृतदेह रस्त्यावर ओढत आणले होते. त्यानंतर तो तिथून पळून गेला आणि सुमारे १०७ किमी अंतरावर असलेल्या बोनगाव येथील एका अनाथाश्रमात पोहोचला. तिथल्या चार कर्मचाऱ्यांवर त्याने चाकूने हल्ला केला होता. पोलिसांनी त्याला २९ मे रोजी अटक केली.

हुमायून कबीरचे वडील पूर्व बर्दवानच्या मेमारी शहरात गिफ्टचे दुकान चालवायचे. त्यांच्या कुटुंबाकडे भरपूर शेती होती. २०१२ मध्ये कबीरने जाधवपूर विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. त्यानंतर त्याने मुंबई, दिल्ली आणि नोएडा येथे काम केले. कबीरचा सहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. त्यानंतर त्याची वागणूक बदलू लागली. तो हळूहळू इतरांपासून स्वतःला वेगळे करू लागला. या काळात त्याला नोकरीही गमवावी लागली.

या वर्षाच्या सुरुवातीला, तो अनेक महिने बेपत्ता झाला. तो हिमाचल प्रदेशला गेला होता. त्याच्या वडिलांनी खूप प्रयत्नांनंतर त्याला शोधून काढले आणि त्याला परत आणले. पुढील काही महिन्यांत, त्याचे वर्तन खूप बदलले. त्याने धार्मिक आणि जिहादी साहित्य वाचण्यास सुरुवात केली. या काळात, त्याने त्याच्या पालकांवर धार्मिक कार्यात रस नसल्याबद्दल रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्याला त्याच्या पालकांना स्वर्ग मिळवून द्यायचा होता. त्याने त्यांना मारण्याची योजना आखण्यास सुरुवात केली. २८ मे रोजी त्याने दोघांनाही संपवले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने त्याच्या वडिलांचे मनगट कापले. आणि नंतर जेव्हा त्याची आई ओरड ऐकून आली तेव्हा त्याने तिलाही ठार मारले. यानंतर कबीर राणाघाटला गेला आणि तिथून तो ट्रेन पकडून बोनगावला पोहोचला. जे भारत-बांगलादेश सीमेपासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. येथून तो म्यानमारला पळून जाण्याचा विचार करत होता. मात्र अनाथाश्रमातील चार लोकांवर हल्ला केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली आणि त्याचा प्लॅन फसला. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारी