शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
4
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
5
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
6
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
7
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
8
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
9
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
10
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
11
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
12
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
13
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
15
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
16
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
17
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
18
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
19
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
20
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार

रहिवासी सोसायट्यांमध्ये पशूहत्येस उच्च न्यायालयाने घातली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 21:43 IST

समाजमंदिराच्या एक किलोमीटर परिघात असलेल्या सोसायट्यांच्या आवारातही पशुहत्येस मनाई केली.

ठळक मुद्देष्ठ वकील रजनी अय्यर यांनी ट्रस्टच्यावतीने न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे बाजू मांडली.घरामध्ये पशुहत्या करण्यास आम्ही मनाई करत आहोत.

मुंबई - सार्वजनिक सुरक्षा, स्वच्छतेमुळे घरातच पशुहत्या करण्याची परवानगी देण्यासंबंधीच्या धोरणाचा स्वीकार करणे अशक्य आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला घरातच पशुहत्येस परवानगी देण्यास नकार दिला. तसेच समाजमंदिराच्या एक किलोमीटर परिघात असलेल्या सोसायट्यांच्या आवारातही पशुहत्येस मनाई केली.बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने कोणत्याही सणाच्या वेळेस घरात, सोसायटीमध्ये पशुहत्या करण्यास तात्पुरती परवानगी देण्यासंबंधी धोरण आखले. या धोरणाला जीवमैत्री ट्रस्टने उच्च न्यायालयात आव्हान दिले. ज्येष्ठ वकील रजनी अय्यर यांनी ट्रस्टच्यावतीने न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे बाजू मांडली.महापालिका लोकांना त्यांच्या घरी, सोसायट्यांच्या आवारात पशुहत्या करण्याची परवानगी देऊ सार्वजनिक आरोग्याशी खेळत आहे. तसेच एअरक्राफ्ट नियमांचेही उल्लंघन करून विमान प्रवाशांचा जीव धोक्यात आणत आहे, असा युक्तिवाद अय्यर यांनी केला.महापालिकेच्यावतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी याचिकेवर आक्षेप घेतला. महापालिका नियमांच्याअधीन राहून परवानगी देईल. सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेची काळजी घेतली जाईल. सुमारे ८००० लोकांनी घरातच पशुहत्या करण्यासाठी अर्ज केले आहेत, असे साखरे यांनी न्यायालयाला सांगितले.न्यायालयाने याबाबत आदेश देताना म्हटले की, सार्वजनिक सुरक्षा, स्वच्छतेमुळे घरातच पशुहत्या करण्याची परवानगी देण्यासंबंधीच्या धोरणाचा स्वीकार करणे अशक्य आहे. ‘मुंबईची लोकसंख्या मोठी आहे आणि हे शहर दाटीवाटीचे आहे. येथील घरेही छोटी आहेत. त्यामुळे घरातच पशुहत्या करून स्वच्छता राखता येईल, यावर आमचा विश्वास नाही. या घरांमध्ये तरुण, वृद्ध दोन्हीही राहतात आणि त्यांच्या आरोग्याची व स्वच्छतेची आम्हाला काळजी आहे. त्यामुळे घरातच पशुहत्या करण्यासाठी अर्ज न स्वीकारण्याचा आदेश आम्ही देत आहोत,’ असे न्यायालयाने म्हटले.घरामध्ये पशुहत्या करण्यास आम्ही मनाई करत आहोत. तसेच समाजमंदिरांच्या एक किलोमीटर परिघात असलेल्या सोसायट्यांनाही त्यांच्या आवारात पशुहत्या करण्यास मनाई करण्यात येत आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. महापालिका सार्वजनिक आरोग्याची काळजी घेईल, अशी अपेक्षा आम्ही करतो, असे म्हणत उच्च न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी १४ आॅगस्ट रोजी ठेवली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयBakri Eidबकरी ईदCourtन्यायालय