शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

संतापजनक! नववधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही; कारसाठी लग्न केलं रद्द, हुंड्यामुळे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 14:38 IST

वधू पक्षाने लग्नाची सर्व तयारी पूर्ण केली होती. मात्र बराच वेळ होऊनही लग्नाची वरात न पोहोचल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाशी फोनवर चर्चा केली.

उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये लग्नामुळे आनंदाचं वातावरण होतं. सर्वजण वरातीची आतुरतेने वाट पाहत होते. वधू पक्षाने लग्नाची सर्व तयारी पूर्ण केली होती. मात्र बराच वेळ होऊनही लग्नाची वरात न पोहोचल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाशी फोनवर चर्चा केली. तेव्हा त्यांना समजले की आलिशान गाडी न मिळाल्याने वराकडची मंडळी वरात घेऊन येत नव्हती. हे समजताच वधूपक्षात एकच खळबळ उडाली. 

नवरीकडच्या मंडळींनी वर आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस गुन्हा दाखल करून तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ज्वालापूर कोतवाली परिसरातील आहे. पोलिसांनी सांगितले की, गुफरान अहमद उर्फ ​​पप्पू यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीचे लग्न उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील रहिवासी दानिश अब्बासीसोबत निश्चित झाले आहे. 

लग्नाच्या वेळी वराला, त्याचे वडील आणि कुटुंबीयांना सोन्याचे दागिने आणि रोख 1.21 लाख रुपये देण्यात आले. त्यानंतर त्यांनी सात लाख रुपये रोख व इतर भेटवस्तूही दिल्या. यावर्षी 22 जानेवारीला वरातीपूर्वी मुलाच्या वडिलांनी स्कूटीची मागणी केल्याने त्यांनी मध्यस्थांच्या खात्यात 1.10 लाख रुपये टाकले. त्याचवेळी 15 लाख रुपये रोखही देण्यात आले. लग्नाची सर्व तयारी झाली होती. मात्र लग्नाच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत वरात पोहोचली नव्हती

काही वेळाने त्याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हुंड्यात हुंडई व्हर्ना कार नको, तर इनोव्हा क्रिस्टा कार हवी असल्याचे सांगितले. पीडितेच्या कुटुंबीयांनी त्याला खूप समजावले पण तो तयाप झाला नाही. त्यानंतर आर्थिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली. या संदर्भात कोतवाली पोलिसांनी सांगितले की अनेक लोकांविरुद्ध फसवणूक आणि हुंड्यासाठी छळ या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :marriageलग्न