शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

संतापजनक! नववधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही; कारसाठी लग्न केलं रद्द, हुंड्यामुळे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 14:38 IST

वधू पक्षाने लग्नाची सर्व तयारी पूर्ण केली होती. मात्र बराच वेळ होऊनही लग्नाची वरात न पोहोचल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाशी फोनवर चर्चा केली.

उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये लग्नामुळे आनंदाचं वातावरण होतं. सर्वजण वरातीची आतुरतेने वाट पाहत होते. वधू पक्षाने लग्नाची सर्व तयारी पूर्ण केली होती. मात्र बराच वेळ होऊनही लग्नाची वरात न पोहोचल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाशी फोनवर चर्चा केली. तेव्हा त्यांना समजले की आलिशान गाडी न मिळाल्याने वराकडची मंडळी वरात घेऊन येत नव्हती. हे समजताच वधूपक्षात एकच खळबळ उडाली. 

नवरीकडच्या मंडळींनी वर आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस गुन्हा दाखल करून तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ज्वालापूर कोतवाली परिसरातील आहे. पोलिसांनी सांगितले की, गुफरान अहमद उर्फ ​​पप्पू यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीचे लग्न उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील रहिवासी दानिश अब्बासीसोबत निश्चित झाले आहे. 

लग्नाच्या वेळी वराला, त्याचे वडील आणि कुटुंबीयांना सोन्याचे दागिने आणि रोख 1.21 लाख रुपये देण्यात आले. त्यानंतर त्यांनी सात लाख रुपये रोख व इतर भेटवस्तूही दिल्या. यावर्षी 22 जानेवारीला वरातीपूर्वी मुलाच्या वडिलांनी स्कूटीची मागणी केल्याने त्यांनी मध्यस्थांच्या खात्यात 1.10 लाख रुपये टाकले. त्याचवेळी 15 लाख रुपये रोखही देण्यात आले. लग्नाची सर्व तयारी झाली होती. मात्र लग्नाच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत वरात पोहोचली नव्हती

काही वेळाने त्याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हुंड्यात हुंडई व्हर्ना कार नको, तर इनोव्हा क्रिस्टा कार हवी असल्याचे सांगितले. पीडितेच्या कुटुंबीयांनी त्याला खूप समजावले पण तो तयाप झाला नाही. त्यानंतर आर्थिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली. या संदर्भात कोतवाली पोलिसांनी सांगितले की अनेक लोकांविरुद्ध फसवणूक आणि हुंड्यासाठी छळ या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :marriageलग्न