शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

संतापजनक! नववधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही; कारसाठी लग्न केलं रद्द, हुंड्यामुळे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 14:38 IST

वधू पक्षाने लग्नाची सर्व तयारी पूर्ण केली होती. मात्र बराच वेळ होऊनही लग्नाची वरात न पोहोचल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाशी फोनवर चर्चा केली.

उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये लग्नामुळे आनंदाचं वातावरण होतं. सर्वजण वरातीची आतुरतेने वाट पाहत होते. वधू पक्षाने लग्नाची सर्व तयारी पूर्ण केली होती. मात्र बराच वेळ होऊनही लग्नाची वरात न पोहोचल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाशी फोनवर चर्चा केली. तेव्हा त्यांना समजले की आलिशान गाडी न मिळाल्याने वराकडची मंडळी वरात घेऊन येत नव्हती. हे समजताच वधूपक्षात एकच खळबळ उडाली. 

नवरीकडच्या मंडळींनी वर आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस गुन्हा दाखल करून तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ज्वालापूर कोतवाली परिसरातील आहे. पोलिसांनी सांगितले की, गुफरान अहमद उर्फ ​​पप्पू यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीचे लग्न उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील रहिवासी दानिश अब्बासीसोबत निश्चित झाले आहे. 

लग्नाच्या वेळी वराला, त्याचे वडील आणि कुटुंबीयांना सोन्याचे दागिने आणि रोख 1.21 लाख रुपये देण्यात आले. त्यानंतर त्यांनी सात लाख रुपये रोख व इतर भेटवस्तूही दिल्या. यावर्षी 22 जानेवारीला वरातीपूर्वी मुलाच्या वडिलांनी स्कूटीची मागणी केल्याने त्यांनी मध्यस्थांच्या खात्यात 1.10 लाख रुपये टाकले. त्याचवेळी 15 लाख रुपये रोखही देण्यात आले. लग्नाची सर्व तयारी झाली होती. मात्र लग्नाच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत वरात पोहोचली नव्हती

काही वेळाने त्याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हुंड्यात हुंडई व्हर्ना कार नको, तर इनोव्हा क्रिस्टा कार हवी असल्याचे सांगितले. पीडितेच्या कुटुंबीयांनी त्याला खूप समजावले पण तो तयाप झाला नाही. त्यानंतर आर्थिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली. या संदर्भात कोतवाली पोलिसांनी सांगितले की अनेक लोकांविरुद्ध फसवणूक आणि हुंड्यासाठी छळ या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :marriageलग्न