शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

संतापजनक! नववधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही; कारसाठी लग्न केलं रद्द, हुंड्यामुळे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 14:38 IST

वधू पक्षाने लग्नाची सर्व तयारी पूर्ण केली होती. मात्र बराच वेळ होऊनही लग्नाची वरात न पोहोचल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाशी फोनवर चर्चा केली.

उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये लग्नामुळे आनंदाचं वातावरण होतं. सर्वजण वरातीची आतुरतेने वाट पाहत होते. वधू पक्षाने लग्नाची सर्व तयारी पूर्ण केली होती. मात्र बराच वेळ होऊनही लग्नाची वरात न पोहोचल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाशी फोनवर चर्चा केली. तेव्हा त्यांना समजले की आलिशान गाडी न मिळाल्याने वराकडची मंडळी वरात घेऊन येत नव्हती. हे समजताच वधूपक्षात एकच खळबळ उडाली. 

नवरीकडच्या मंडळींनी वर आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस गुन्हा दाखल करून तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ज्वालापूर कोतवाली परिसरातील आहे. पोलिसांनी सांगितले की, गुफरान अहमद उर्फ ​​पप्पू यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीचे लग्न उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील रहिवासी दानिश अब्बासीसोबत निश्चित झाले आहे. 

लग्नाच्या वेळी वराला, त्याचे वडील आणि कुटुंबीयांना सोन्याचे दागिने आणि रोख 1.21 लाख रुपये देण्यात आले. त्यानंतर त्यांनी सात लाख रुपये रोख व इतर भेटवस्तूही दिल्या. यावर्षी 22 जानेवारीला वरातीपूर्वी मुलाच्या वडिलांनी स्कूटीची मागणी केल्याने त्यांनी मध्यस्थांच्या खात्यात 1.10 लाख रुपये टाकले. त्याचवेळी 15 लाख रुपये रोखही देण्यात आले. लग्नाची सर्व तयारी झाली होती. मात्र लग्नाच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत वरात पोहोचली नव्हती

काही वेळाने त्याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हुंड्यात हुंडई व्हर्ना कार नको, तर इनोव्हा क्रिस्टा कार हवी असल्याचे सांगितले. पीडितेच्या कुटुंबीयांनी त्याला खूप समजावले पण तो तयाप झाला नाही. त्यानंतर आर्थिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली. या संदर्भात कोतवाली पोलिसांनी सांगितले की अनेक लोकांविरुद्ध फसवणूक आणि हुंड्यासाठी छळ या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :marriageलग्न