शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

बायकोकडून होतोय छळ; कोरोनाच्या काळात ४२ तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 10:27 IST

Harassment by wife; 42 complaints during Corona : जिल्ह्यात एकूण ४४३ तक्रारी या २०२० व जुलै, २०२१ पर्यंत प्राप्त आहेत.

अकोला : महिलांचा छळ अनेक वर्षांपासून हाेत असल्याचे आपण नेहमीच ऐकताे. काेराेनाच्या काळात या प्रमाणात वाढही झाली, परंतु या काळात पुरुषांचाही छळ झाल्याच्या तक्रारी पाेलीस विभागाकडे आहेत. पत्नीकडून होत असलेल्या छळाविरुद्ध पुरुषांच्या तक्रारीचे प्रमाण कमी असले, तरी महिलांचा छळच माेठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते.

काेराेनाच्या काळात सर्व कामधंदे बंद असल्याने अनेक जण घरी आहेत. त्यामुळे आपोआप कुटुंबातील संवाद वाढला. या संवादाचा काहींनी चांगला उपयाेग करून घेतला, तर काहींच्या कुटुंबामध्ये वाद झाला. जिल्ह्यात २०१८ मध्ये ११ तक्रारी पुरुषांनी केल्या असून, त्या तक्रारीनुसार पत्नी शिवीगाळ करते व मारहाण करीत असल्याचा आहेत, तर २०१९ मध्ये १३ पुरुषांनी पत्नीविरुद्ध तक्रारी केलेल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ४४३ तक्रारी या २०२० व जुलै, २०२१ पर्यंत प्राप्त आहेत. यामध्ये पुरुषांच्या महिलेविरुद्ध १४ तर महिलेच्या पुरुषाविरुद्ध ४२९ तक्रारींचा समावेश आहे. शहरातील अनेक समाजसेवकांनी अनेक प्रकरण आपसात केले आहे, तर पाेलीस विभागाकडून १३० प्रकरणांत सामंजस्य केले असल्याची नाेंद आहे.

 

बायकोकडून छळ होत असल्याच्या तक्रारी

२०१८ - ११

२०१९ - १३

२०२० - १०

२०२१ - ०४

 

मानसिक छळच नव्हे, तर मारहाणही होते

पुरुषांनी दिलेल्या तक्रारीनुसार पत्नी त्यांचा मानसिक छळच करीत नसून, पतींना मारहाणही करीत असल्याची माहिती आहे. अनेक प्रकरणांत पत्नी दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्याच्या तक्रारी आहेत. यावरूनच अधिक वाद होत असल्याचे पोलीस दप्तरी नोंद आहे, तर काही प्रकरणांत पती कामावर जात नाही, म्हणून पत्नीकडून छळ होत असल्याच्याही तक्रारी आहेत.

आर्थिक टंचाई आणि अति सहवास

काेराेना संसर्गामुळे काेणतेही काम नाही. घरात सर्वांशी अति सहवास वाढला. या सहवासातून घरी बसल्या बसल्या क्षुल्लक कारणावरून वाद उद‌्भवणे सुरू झाले. सहवास वाढल्याने भांडणेही वाढल्याचे दिसून येते. आर्थिक अडचणीतूनही वाद मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

- डॉ.अमोल केळकर, मानसोपचार तज्ज्ञ अकोला

 

१३० कुटुंबांची संसारवेल पुन्हा फुलली

काेराेनाच्या काळात सर्वच जण घरी, त्यातून अनेकांचे भांडणे झालीत, तर काहींनी सहवास वाढल्याने आनंदात वेळ घालविला. २०२० व २१ मध्ये महिलांच्या पुरुषाविरुद्ध व पुरुषांच्या महिलांविरुद्ध मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. यापैकी महिला सुरक्षा विशेष कक्षाच्या साहाय्याने १३० जणांमध्ये सामंजस्य करण्यात आले. यामध्ये २०२० मध्ये १०३ तर चालू वर्षात मे महिन्यापर्यंत २७ प्रकरणांचा समावेश आहे. हे १३० कुटुंब व्यवस्थित जीवन जगत असून, पुन्हा याच्या तक्रारी प्राप्त झाल्या नाहीत.

भांडणाची ही काय कारणे झाली?

काेराेनाच्या काळात अनेक जण घरीच असल्याने सहवास वाढला, यातून विविध खाद्यपदार्थांची फर्माइश वाढली. ती पूर्ण न केल्याने, पत्नी माेबाइलवर जास्त वेळ राहते, म्हणून भांडण वाढले. दारू पिऊन येऊन घरात धिंगाणा घातल्या जात असल्याबाबत तक्रारी वाढल्या आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी