शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

बायकोकडून होतोय छळ; कोरोनाच्या काळात ४२ तक्रारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 10:27 IST

Harassment by wife; 42 complaints during Corona : जिल्ह्यात एकूण ४४३ तक्रारी या २०२० व जुलै, २०२१ पर्यंत प्राप्त आहेत.

अकोला : महिलांचा छळ अनेक वर्षांपासून हाेत असल्याचे आपण नेहमीच ऐकताे. काेराेनाच्या काळात या प्रमाणात वाढही झाली, परंतु या काळात पुरुषांचाही छळ झाल्याच्या तक्रारी पाेलीस विभागाकडे आहेत. पत्नीकडून होत असलेल्या छळाविरुद्ध पुरुषांच्या तक्रारीचे प्रमाण कमी असले, तरी महिलांचा छळच माेठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते.

काेराेनाच्या काळात सर्व कामधंदे बंद असल्याने अनेक जण घरी आहेत. त्यामुळे आपोआप कुटुंबातील संवाद वाढला. या संवादाचा काहींनी चांगला उपयाेग करून घेतला, तर काहींच्या कुटुंबामध्ये वाद झाला. जिल्ह्यात २०१८ मध्ये ११ तक्रारी पुरुषांनी केल्या असून, त्या तक्रारीनुसार पत्नी शिवीगाळ करते व मारहाण करीत असल्याचा आहेत, तर २०१९ मध्ये १३ पुरुषांनी पत्नीविरुद्ध तक्रारी केलेल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ४४३ तक्रारी या २०२० व जुलै, २०२१ पर्यंत प्राप्त आहेत. यामध्ये पुरुषांच्या महिलेविरुद्ध १४ तर महिलेच्या पुरुषाविरुद्ध ४२९ तक्रारींचा समावेश आहे. शहरातील अनेक समाजसेवकांनी अनेक प्रकरण आपसात केले आहे, तर पाेलीस विभागाकडून १३० प्रकरणांत सामंजस्य केले असल्याची नाेंद आहे.

 

बायकोकडून छळ होत असल्याच्या तक्रारी

२०१८ - ११

२०१९ - १३

२०२० - १०

२०२१ - ०४

 

मानसिक छळच नव्हे, तर मारहाणही होते

पुरुषांनी दिलेल्या तक्रारीनुसार पत्नी त्यांचा मानसिक छळच करीत नसून, पतींना मारहाणही करीत असल्याची माहिती आहे. अनेक प्रकरणांत पत्नी दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्याच्या तक्रारी आहेत. यावरूनच अधिक वाद होत असल्याचे पोलीस दप्तरी नोंद आहे, तर काही प्रकरणांत पती कामावर जात नाही, म्हणून पत्नीकडून छळ होत असल्याच्याही तक्रारी आहेत.

आर्थिक टंचाई आणि अति सहवास

काेराेना संसर्गामुळे काेणतेही काम नाही. घरात सर्वांशी अति सहवास वाढला. या सहवासातून घरी बसल्या बसल्या क्षुल्लक कारणावरून वाद उद‌्भवणे सुरू झाले. सहवास वाढल्याने भांडणेही वाढल्याचे दिसून येते. आर्थिक अडचणीतूनही वाद मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

- डॉ.अमोल केळकर, मानसोपचार तज्ज्ञ अकोला

 

१३० कुटुंबांची संसारवेल पुन्हा फुलली

काेराेनाच्या काळात सर्वच जण घरी, त्यातून अनेकांचे भांडणे झालीत, तर काहींनी सहवास वाढल्याने आनंदात वेळ घालविला. २०२० व २१ मध्ये महिलांच्या पुरुषाविरुद्ध व पुरुषांच्या महिलांविरुद्ध मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. यापैकी महिला सुरक्षा विशेष कक्षाच्या साहाय्याने १३० जणांमध्ये सामंजस्य करण्यात आले. यामध्ये २०२० मध्ये १०३ तर चालू वर्षात मे महिन्यापर्यंत २७ प्रकरणांचा समावेश आहे. हे १३० कुटुंब व्यवस्थित जीवन जगत असून, पुन्हा याच्या तक्रारी प्राप्त झाल्या नाहीत.

भांडणाची ही काय कारणे झाली?

काेराेनाच्या काळात अनेक जण घरीच असल्याने सहवास वाढला, यातून विविध खाद्यपदार्थांची फर्माइश वाढली. ती पूर्ण न केल्याने, पत्नी माेबाइलवर जास्त वेळ राहते, म्हणून भांडण वाढले. दारू पिऊन येऊन घरात धिंगाणा घातल्या जात असल्याबाबत तक्रारी वाढल्या आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी