शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! हनुमान जयंतीच्या मिरवणुकीला गालबोट; दोन गटात संघर्ष, दगडफेकीत 15 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 20:04 IST

Hanuman Jayanti : हनुमान जयंतीची निघालेली मिरवणूक एका मशिदीजवळ आली तेव्हा काही समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक केली.

नवी दिल्ली -  देशभरात हनुमान जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशमध्ये हनुमान जयंतीच्या सणाला गालबोट लावणारी एक भयंकर घटना घडली. हनुमान जयंतीची निघालेली मिरवणूक एका मशिदीजवळ आली तेव्हा काही समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. त्यातून दोन गटात संघर्ष झाला. पण सुदैवाने घटनास्थळी पोलीस दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये 15 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्या कुरनूल जिल्ह्यातील होलागुंडा गावात ही घटना घडली. होलागुंडा गावात शनिवारी रात्री हनुमान जयंतीची मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक जेव्हा गावातील एका मशिदीजवळ आली तेव्हा रमजानचा विचार करुन मिरवणूक आयोजकांनी मिरवणुकीतील माईक बंद केले होते. पण काही भक्तांनी 'जय श्रीराम' अशी घोषणाबाजी केली. त्यातून नाराज होऊन काही नागरिकांनी हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मिरवणुकीत सहभागी असलेल्या नागरिकांनीदेखील दगडफेक सुरू केली. या घटनेत जवळपास 15 जण किरकोळ जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संबंधित प्रकार घडत असताना पोलिसांची भूमिका प्रचंड महत्त्वाची ठरली. पोलीस दोन्ही पक्षातील नागरिकांची समजूत काढू लागले. तसेच त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांना पोलीस ठाण्याला घेऊन गेले. मात्र पोलीस ठाण्यातही दोन्ही पक्षातील नागरिकांमध्ये तणावजन्य परिस्थिती होती. अखेर पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षाच्या तरुणांना दम दिला तेव्हा ते शांत बसले. संबंधित घटनेनंतर कुरनूलचे पोलीस अधीक्षक सुधीर कुमार रेड्डी होलागुंडा गावात पोहोचले. गावात कोणतीही अनपेक्षित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. 

पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं. त्यामुळे सध्या गावातील वातावरण आता पूर्वपदावर आलं आहे. याच दरम्यान, भाजपाचे आंध्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत विरोध केला आहे. "हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर हल्ला झाला. याप्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई व्हावी" असं वीरराजू यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेश