शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

धक्कादायक! हनुमान जयंतीच्या मिरवणुकीला गालबोट; दोन गटात संघर्ष, दगडफेकीत 15 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 20:04 IST

Hanuman Jayanti : हनुमान जयंतीची निघालेली मिरवणूक एका मशिदीजवळ आली तेव्हा काही समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक केली.

नवी दिल्ली -  देशभरात हनुमान जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशमध्ये हनुमान जयंतीच्या सणाला गालबोट लावणारी एक भयंकर घटना घडली. हनुमान जयंतीची निघालेली मिरवणूक एका मशिदीजवळ आली तेव्हा काही समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. त्यातून दोन गटात संघर्ष झाला. पण सुदैवाने घटनास्थळी पोलीस दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये 15 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्या कुरनूल जिल्ह्यातील होलागुंडा गावात ही घटना घडली. होलागुंडा गावात शनिवारी रात्री हनुमान जयंतीची मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक जेव्हा गावातील एका मशिदीजवळ आली तेव्हा रमजानचा विचार करुन मिरवणूक आयोजकांनी मिरवणुकीतील माईक बंद केले होते. पण काही भक्तांनी 'जय श्रीराम' अशी घोषणाबाजी केली. त्यातून नाराज होऊन काही नागरिकांनी हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मिरवणुकीत सहभागी असलेल्या नागरिकांनीदेखील दगडफेक सुरू केली. या घटनेत जवळपास 15 जण किरकोळ जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संबंधित प्रकार घडत असताना पोलिसांची भूमिका प्रचंड महत्त्वाची ठरली. पोलीस दोन्ही पक्षातील नागरिकांची समजूत काढू लागले. तसेच त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांना पोलीस ठाण्याला घेऊन गेले. मात्र पोलीस ठाण्यातही दोन्ही पक्षातील नागरिकांमध्ये तणावजन्य परिस्थिती होती. अखेर पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षाच्या तरुणांना दम दिला तेव्हा ते शांत बसले. संबंधित घटनेनंतर कुरनूलचे पोलीस अधीक्षक सुधीर कुमार रेड्डी होलागुंडा गावात पोहोचले. गावात कोणतीही अनपेक्षित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. 

पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं. त्यामुळे सध्या गावातील वातावरण आता पूर्वपदावर आलं आहे. याच दरम्यान, भाजपाचे आंध्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत विरोध केला आहे. "हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर हल्ला झाला. याप्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई व्हावी" असं वीरराजू यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेश