शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

धक्कादायक! हनुमान जयंतीच्या मिरवणुकीला गालबोट; दोन गटात संघर्ष, दगडफेकीत 15 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 20:04 IST

Hanuman Jayanti : हनुमान जयंतीची निघालेली मिरवणूक एका मशिदीजवळ आली तेव्हा काही समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक केली.

नवी दिल्ली -  देशभरात हनुमान जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशमध्ये हनुमान जयंतीच्या सणाला गालबोट लावणारी एक भयंकर घटना घडली. हनुमान जयंतीची निघालेली मिरवणूक एका मशिदीजवळ आली तेव्हा काही समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. त्यातून दोन गटात संघर्ष झाला. पण सुदैवाने घटनास्थळी पोलीस दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये 15 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्या कुरनूल जिल्ह्यातील होलागुंडा गावात ही घटना घडली. होलागुंडा गावात शनिवारी रात्री हनुमान जयंतीची मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक जेव्हा गावातील एका मशिदीजवळ आली तेव्हा रमजानचा विचार करुन मिरवणूक आयोजकांनी मिरवणुकीतील माईक बंद केले होते. पण काही भक्तांनी 'जय श्रीराम' अशी घोषणाबाजी केली. त्यातून नाराज होऊन काही नागरिकांनी हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मिरवणुकीत सहभागी असलेल्या नागरिकांनीदेखील दगडफेक सुरू केली. या घटनेत जवळपास 15 जण किरकोळ जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संबंधित प्रकार घडत असताना पोलिसांची भूमिका प्रचंड महत्त्वाची ठरली. पोलीस दोन्ही पक्षातील नागरिकांची समजूत काढू लागले. तसेच त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांना पोलीस ठाण्याला घेऊन गेले. मात्र पोलीस ठाण्यातही दोन्ही पक्षातील नागरिकांमध्ये तणावजन्य परिस्थिती होती. अखेर पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षाच्या तरुणांना दम दिला तेव्हा ते शांत बसले. संबंधित घटनेनंतर कुरनूलचे पोलीस अधीक्षक सुधीर कुमार रेड्डी होलागुंडा गावात पोहोचले. गावात कोणतीही अनपेक्षित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. 

पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं. त्यामुळे सध्या गावातील वातावरण आता पूर्वपदावर आलं आहे. याच दरम्यान, भाजपाचे आंध्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत विरोध केला आहे. "हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर हल्ला झाला. याप्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई व्हावी" असं वीरराजू यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेश