शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 21:44 IST

गुलफाशाने, सोनमपेक्षाही एक पाऊल पुढे जात, लग्नाच्या एक दिवस आधीच आपल्या प्रियकरासोबत मिळून वराची हत्या केली.

मध्य प्रदेशातील इंदूर येथील राजा रघुवंशी हत्या प्रकरण देशभर हनीमूनसाठी गेलेल्या राजाची पत्नी सोनमने प्रियकरासोबत मिळून त्याची हत्या केली होती. आता अशीच एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील रामपूरमधून समोर आली आहे, जिथे एका वधूने, गुलफाशाने, सोनमपेक्षाही एक पाऊल पुढे जात, चक्क लग्नाच्या एक दिवस आधीच आपल्या प्रियकरासोबत मिळून वराची हत्या केली. पोलिसांनी सोमवारी (१६ जून रोजी) वराचा मृतदेह ताब्यात घेतला असून, वधू गुलफाशा आणि तिच्या प्रियकरासह चार जणांविरुद्ध खून आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी प्रियकर आणि त्याच्या एका मित्राला अटक करण्यात आली आहे, तर वधू आणि अन्य एक आरोपी अद्याप फरार आहेत.

नेमके काय घडले?

रामपूर जिल्ह्यातील गंज पोलीस स्टेशन परिसरातील निहाल (३५) हा लग्न आणि पार्ट्यांमध्ये जेवण बनवण्याचे काम करत असे. चार महिन्यांपूर्वी त्याचे लग्न भोट पोलीस स्टेशन परिसरातील धनुपुरा गावातील गुलफाशासोबत निश्चित झाले होते. लग्नाची वरात १५ जून रोजी येणार होती आणि निहालच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू होती.

एका फोन कॉलने बदलले नशीब

दरम्यान, १४ जून रोजी निहालला एका तरुणाचा फोन आला. या तरुणाने स्वतःची ओळख नवरीचा चुलत भाऊ अशी करून दिली आणि नवीन कपड्यांसाठी माप घेण्यासाठी त्याला बोलावले. निहाल घराबाहेर पडला आणि दुचाकीवरून आलेल्या त्या दोन तरुणांसोबत निघून गेला.

संध्याकाळी उशिरापर्यंत निहाल घरी परतला नाही, तेव्हा कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. खूप शोध घेऊनही काहीही न सापडल्याने, कुटुंबीयांनी गंज पोलीस ठाण्यात निहाल बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या घटनेत त्याची होणारी पत्नी गुलफाशा आणि तिचा प्रियकर सामील असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.

सीसीटीव्ही फुटेज आणि कबुलीजबाब

तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन तरुणांची ओळख पटली. पोलिसांनी प्रियकर सद्दाम आणि फरमान यांना अटक केली. चौकशीदरम्यान, त्यांनी निहालची हत्या केल्याची कबुली दिली.

सोमवारी सकाळी दोन्ही आरोपींनी दिलेल्या माहितीवरून, अझीमनगर पोलीस स्टेशन परिसरातील रतनपुरा जंगलातून निहालचा मृतदेह सापडला. निहालचा भाऊ नायब शाह याच्या तक्रारीवरून, गुलफाशा, प्रियकर सद्दाम, फरमान आणि अनीस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रियकर सद्दाम आणि फरमान यांना अटक केली आहे, तर गुलफाशा आणि अनीस अजूनही फरार आहेत.

प्रेमसंबंधातून हत्या

एएसपी अतुल श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, निहालच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून, सद्दाम, फरमान, अनीस आणि होणारी वधू गुलफाशा यांच्याविरुद्ध अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, निहालचे अपहरण करून गळा दाबून हत्या करण्यात आली होती आणि मृतदेह जंगलातील मक्याच्या शेतात लपवण्यात आला होता. त्याचा मोबाईलही तोडण्यात आला होता.

रामपूरचे एसपी विद्यासागर मिश्रा यांनी सांगितले की, वधू गुलफाशा हिची चौकशी केली जात आहे आणि फरार सद्दामचाही शोध घेतला जात आहे. लवकरच सर्व आरोपींना अटक केली जाईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वधू गुलफाशा हिचे तिच्या शेजारी राहणाऱ्या सद्दामसोबत (३२) एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. गुलफाशाचे लग्न निश्चित झाल्याने सद्दाम संतापला होता. तो गुलफाशाच्या घरी गेला होता आणि तिथे त्यांच्यात वादही झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, प्रेमप्रकरणातून घडलेल्या या क्रूर हत्येने अनेकांना धक्का बसला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशhusband and wifeपती- जोडीदार