शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

दुसऱ्या लग्नाच्या आरोपात अडकला गुजरातचा आयएएस अधिकारी; निलंबनाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 19:48 IST

सरकारने निलंबन केल्यानंतर काही तासांनी दहिया यांनी गुजरातच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

अहमदाबाद : गुजरात सरकारचे वरिष्ठ आयएएस अधिकारी गौरव दहिया यांचे निलंबन करण्यात आले आहे. दिल्लीच्या एका महिलेने दहिया यांच्यावर दुसरे लग्न करून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. यावर सरकारने दहिया यांच्यावर कारवाईचा इशारा दिला आहे. 

सरकारने निलंबन केल्यानंतर काही तासांनी दहिया यांनी गुजरातच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करत राज्याच्या पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप न करू देण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, हे प्रकरण दिल्ली पोलिसांच्या अधिकारात येत असल्याचे म्हटले आहे. 

मुख्य सचिव जे एन सिंह यांनी सांगितले की, चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारावर राज्य सरकारने बुधवारी गौरव दहिया यांना निलंबित केले आहे. या सचिवांनी अहवालाबाबत भाष्य करणे टाळले आहे. नुकताच चौकशी समितीने हा अहवाल राज्य सरकारकडे सोपविला आहे. 

गेल्याच महिन्यात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मुख्य सचिव सुनैना तोमर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. दिल्लीच्या महिलेने दहिया यांच्याविरोधात दुसरे लग्न केल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. आयएएस अधिकारी चौकशी समितीसमोर दोनवेळा सामोरे गेले आहेत. यावेळी त्यांनी हे आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी गांधीनगर पोलिसही वेगळा तपास करत आहेत.

महिलेने हनीट्रॅप केले?दहिया यांनी सांगितले की, या महिलेने त्य़ांना हनीट्रॅप केले आहे. दुसरीकडे पोलिसांनी या महिलेला दोन वेळा जबानी नोंदविण्यासाठी बोलावले होते. ती आली. मात्र, दहिया एकदाही गेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या महिलेने दहिया यांच्यावर महिलांसोबत शारिरीक संबंध ठेवून नंतर त्यांना सोडून दिल्याचा गंभीर आरोपही केला आहे. चौकशी अधिकाऱ्यांना दहिया यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे आढळले आहे. या महिलेने दिलेले पुरावेही खरे असल्याचे आढळले आहेत. यावर दहिया यांनी या महिलेने हनी ट्रॅप केल्याचे म्हटले आहे, तसेच ब्लॅकमेलही केल्याचा दावा केला आहे. 

टॅग्स :Gujaratगुजरातmarriageलग्न