शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

दुसऱ्या लग्नाच्या आरोपात अडकला गुजरातचा आयएएस अधिकारी; निलंबनाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 19:48 IST

सरकारने निलंबन केल्यानंतर काही तासांनी दहिया यांनी गुजरातच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

अहमदाबाद : गुजरात सरकारचे वरिष्ठ आयएएस अधिकारी गौरव दहिया यांचे निलंबन करण्यात आले आहे. दिल्लीच्या एका महिलेने दहिया यांच्यावर दुसरे लग्न करून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. यावर सरकारने दहिया यांच्यावर कारवाईचा इशारा दिला आहे. 

सरकारने निलंबन केल्यानंतर काही तासांनी दहिया यांनी गुजरातच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करत राज्याच्या पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप न करू देण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, हे प्रकरण दिल्ली पोलिसांच्या अधिकारात येत असल्याचे म्हटले आहे. 

मुख्य सचिव जे एन सिंह यांनी सांगितले की, चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारावर राज्य सरकारने बुधवारी गौरव दहिया यांना निलंबित केले आहे. या सचिवांनी अहवालाबाबत भाष्य करणे टाळले आहे. नुकताच चौकशी समितीने हा अहवाल राज्य सरकारकडे सोपविला आहे. 

गेल्याच महिन्यात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मुख्य सचिव सुनैना तोमर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. दिल्लीच्या महिलेने दहिया यांच्याविरोधात दुसरे लग्न केल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. आयएएस अधिकारी चौकशी समितीसमोर दोनवेळा सामोरे गेले आहेत. यावेळी त्यांनी हे आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी गांधीनगर पोलिसही वेगळा तपास करत आहेत.

महिलेने हनीट्रॅप केले?दहिया यांनी सांगितले की, या महिलेने त्य़ांना हनीट्रॅप केले आहे. दुसरीकडे पोलिसांनी या महिलेला दोन वेळा जबानी नोंदविण्यासाठी बोलावले होते. ती आली. मात्र, दहिया एकदाही गेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या महिलेने दहिया यांच्यावर महिलांसोबत शारिरीक संबंध ठेवून नंतर त्यांना सोडून दिल्याचा गंभीर आरोपही केला आहे. चौकशी अधिकाऱ्यांना दहिया यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे आढळले आहे. या महिलेने दिलेले पुरावेही खरे असल्याचे आढळले आहेत. यावर दहिया यांनी या महिलेने हनी ट्रॅप केल्याचे म्हटले आहे, तसेच ब्लॅकमेलही केल्याचा दावा केला आहे. 

टॅग्स :Gujaratगुजरातmarriageलग्न