शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

एकत्र लावण्यात आली चार लग्ने, वराती दरम्यान लाखो रूपये घेऊन गायब झाल्या चौघांच्याही बायका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 16:24 IST

Madhya Pradesh : पीडितने पोलिसांना सांगितलं की, त्यांना दोन मुलं आहेत ज्यांचं लग्न झालं नव्हतं. ते दिव्यांग आहेत. त्यांनी मेहनतीने सात लाख रूपये जमा केले होते.

Wedding News: मध्यप्रदेशच्या इंदुर  जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार नवरींनी काही दलालांसोबत मिळून तरूण आणि त्यांच्या परिवारांना निशाणा बनवलं. चौघींनी लग्नासाठी आधी दीड-दीड लाख रूपये घेतले. लग्नानंतर वरात काढली जात होती, तेव्हा नवरदेव समोर होते आणि नवरी मागे होत्या. तीन नवरी रस्त्यातूनच गायब झाल्या तर एक पोट दुखत असल्याचं कारण सांगत हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि तिथून फरार झाली. पोलिसांनुसार, जगदीश कुंवरजी सुनेर यांनी गावातीलच गणेश, त्याचे वडील सत्यनारायण आणि त्याची आई सुंदरबाई, नातेवाईक महेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीडितने पोलिसांना सांगितलं की, त्यांना दोन मुलं आहेत ज्यांचं लग्न झालं नव्हतं. ते दिव्यांग आहेत. त्यांनी मेहनतीने सात लाख रूपये जमा केले होते. जेव्हा याची माहिती गणेश आणि सुंदरबाईला लागली तेव्हा दोघांनी हे त्यांचा नातेवाईक महेशला सांगितलं. यानंतर गणेश आई सुंदरबाईला घेऊन जगदीशकडे गेला आणि म्हणाला, दोन्ही मुलांचं वय होत आहे तरी लग्न जुळत नाहीये का? मुली शोधायच्या असतील तर आम्हाला सांगा. आम्ही शोधू.

दोघांच्या बोलण्यात येऊन जगदीशनेही त्यांना मुली शोधण्यासाठी सांगितलं. ते म्हणाले की, दीड लाख रूपये लागतील. सतत आठ दिवस चर्चा केल्यावर पीडितला आरोपींनी आपल्या जाळ्यात अडकवलं आणि केवळ त्यांच्या दोन मुलांनाच नाही तर त्यांच्या मेहुण्याचा मुलगा आणि गावातील एका तरूणाला लग्नाच्या नावावर फसवलं. या सर्वांकडून आरोपींनी आठ लाख रूपये घेतले होते. नंतर मंदिरात पीडितचे मुलं लखन, प्रल्हाद, मेहुण्याचा मुलगा जितेंद्र तसेच गावातील  एका तरूणाचं लग्न लावून देण्यात आलं. 

लग्नानंतर तीन डिसेंबरला चौघांचीही वरात निघाली. या दरम्यान नवरदेव आणि पाहुणे नाचत होते. तेच चौरही नव्या नवरी मागे होत्या. घरी पोहोचण्याआधीच तीन नवरी एका गाडीत बसून फरार झाल्या. तर चौथी पोटदुखीचं कारण सांगत हॉस्पिटलमध्ये गेली. ती तिथून फरार झाली. जेव्हा नवरी परत आल्या नाही तेव्हा फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.

या घटनेनंतर पीडित दलालांकडे पोहोचले आणि त्यांनी यांना आश्वासन दिलं. आरोपी म्हणाले की, मुली आहेत परत येतील. असं करत काही दिवस गेले. पण तरूणी काही परत आल्या नाही. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेलं. बऱ्याच मेहनतीनंतर तक्रार दाखल झाली. आता पोलीस चौकशी करत आहेत.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी