शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

एकत्र लावण्यात आली चार लग्ने, वराती दरम्यान लाखो रूपये घेऊन गायब झाल्या चौघांच्याही बायका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 16:24 IST

Madhya Pradesh : पीडितने पोलिसांना सांगितलं की, त्यांना दोन मुलं आहेत ज्यांचं लग्न झालं नव्हतं. ते दिव्यांग आहेत. त्यांनी मेहनतीने सात लाख रूपये जमा केले होते.

Wedding News: मध्यप्रदेशच्या इंदुर  जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार नवरींनी काही दलालांसोबत मिळून तरूण आणि त्यांच्या परिवारांना निशाणा बनवलं. चौघींनी लग्नासाठी आधी दीड-दीड लाख रूपये घेतले. लग्नानंतर वरात काढली जात होती, तेव्हा नवरदेव समोर होते आणि नवरी मागे होत्या. तीन नवरी रस्त्यातूनच गायब झाल्या तर एक पोट दुखत असल्याचं कारण सांगत हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि तिथून फरार झाली. पोलिसांनुसार, जगदीश कुंवरजी सुनेर यांनी गावातीलच गणेश, त्याचे वडील सत्यनारायण आणि त्याची आई सुंदरबाई, नातेवाईक महेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीडितने पोलिसांना सांगितलं की, त्यांना दोन मुलं आहेत ज्यांचं लग्न झालं नव्हतं. ते दिव्यांग आहेत. त्यांनी मेहनतीने सात लाख रूपये जमा केले होते. जेव्हा याची माहिती गणेश आणि सुंदरबाईला लागली तेव्हा दोघांनी हे त्यांचा नातेवाईक महेशला सांगितलं. यानंतर गणेश आई सुंदरबाईला घेऊन जगदीशकडे गेला आणि म्हणाला, दोन्ही मुलांचं वय होत आहे तरी लग्न जुळत नाहीये का? मुली शोधायच्या असतील तर आम्हाला सांगा. आम्ही शोधू.

दोघांच्या बोलण्यात येऊन जगदीशनेही त्यांना मुली शोधण्यासाठी सांगितलं. ते म्हणाले की, दीड लाख रूपये लागतील. सतत आठ दिवस चर्चा केल्यावर पीडितला आरोपींनी आपल्या जाळ्यात अडकवलं आणि केवळ त्यांच्या दोन मुलांनाच नाही तर त्यांच्या मेहुण्याचा मुलगा आणि गावातील एका तरूणाला लग्नाच्या नावावर फसवलं. या सर्वांकडून आरोपींनी आठ लाख रूपये घेतले होते. नंतर मंदिरात पीडितचे मुलं लखन, प्रल्हाद, मेहुण्याचा मुलगा जितेंद्र तसेच गावातील  एका तरूणाचं लग्न लावून देण्यात आलं. 

लग्नानंतर तीन डिसेंबरला चौघांचीही वरात निघाली. या दरम्यान नवरदेव आणि पाहुणे नाचत होते. तेच चौरही नव्या नवरी मागे होत्या. घरी पोहोचण्याआधीच तीन नवरी एका गाडीत बसून फरार झाल्या. तर चौथी पोटदुखीचं कारण सांगत हॉस्पिटलमध्ये गेली. ती तिथून फरार झाली. जेव्हा नवरी परत आल्या नाही तेव्हा फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.

या घटनेनंतर पीडित दलालांकडे पोहोचले आणि त्यांनी यांना आश्वासन दिलं. आरोपी म्हणाले की, मुली आहेत परत येतील. असं करत काही दिवस गेले. पण तरूणी काही परत आल्या नाही. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेलं. बऱ्याच मेहनतीनंतर तक्रार दाखल झाली. आता पोलीस चौकशी करत आहेत.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी