शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

लग्न मंडपात पोहोचण्याआधी तुरूंगात पोहोचला नवरदेव, वर्षभरापासून पोलिसांसोबत खेळत होता लपाछपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 17:25 IST

गेल्यावर्षी १० जानेवारीला गौतम सिंह उर्फ फंटू सिंह याची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. यात अनेक लोक आरोपी होते.

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील एका हत्येच्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. हा आरोपी लग्न करण्यासाठी लग्न मंडपाकडे जातच होता तेव्हाच त्याला पोलिसांनी अटक केली. ही घटना बस्ती गावातील आहे. गेल्यावर्षी १० जानेवारीला गौतम सिंह उर्फ फंटू सिंह याची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. यात अनेक लोक आरोपी होते. त्यातील एक म्हणजे अविनाश कुमार हाही होता.

असे सांगितले जात आहे की, अविनाश कुमार घटनेपासून फरार होता आणि पोलीस त्याचा शोध घेत होते. पण अनेक प्रयत्न करूनही तो सापडत नव्हता. अशात शोध घेता घेता पोलिसांना खबर लागली की अविनाश दैली गावात आला आहे. माहिती मिळताच पोली घटनास्थळी पोहोचले. तेव्हा अविनाश नवरदेव बनून गाडीवर नुकताच बसला होता. पोलिसांनी त्याला लगेच धरलं आणि अटक केली. (बघा : Viral Video: बघता-बघता तरूणीने तलावात घेतली उडी, मागून भाऊही आला आणि मग...)

असे सांगितले जात आहे की, हत्येचा आरोपी अविनाशची वरात दैली गावातून जहानाबादला जाणार होती. पण नवरदेव बनलेला अविनाश लग्न मंडपात पोहोचण्याआधी तुरूंगात पोहोचला. पोलिसांनुसार अविनाश यानेच गौतम सिंहच्या हत्येत रेकी करण्याचं काम केलं होतं. अविनाशकडूनच सर्व माहिती घेतली जात होती. ही घटना झाल्यावर अविनाश दिल्लीला पळून गेला होता. तिथे तो बरेच दिवस लपून राहिला. दरम्यान त्याचं लग्न जुळलं आणि तो लग्न करण्यासाठी गावात परतला होता. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी