शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वाईटातून चांगलं... 'तो' आत्महत्या करायला गेला अन् दोन वर्षांनी पालकांना 'हरवलेला' मुलगा सापडला!

By पूनम अपराज | Updated: July 23, 2019 15:22 IST

पोलिसांच्या तपासातून बडोदा येथे राहणाऱ्या आई - वडिलांना आपला मुलगा परत मिळाला आहे.

ठळक मुद्देउजयकुमार परमार (१९)) याने वांद्रे - वरळी सी लिंक येथे आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यापासून तो बेपत्ता झाल्याने अपहरणाचा गुन्हा बडोद्यातील देसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्याने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने गळ्यावर आणि दोन्ही हातांवर रागाच्या भरात वार करून घेतले.

मुंबई - दोन वर्षांपासून बेपत्ता असलेला उजयकुमार परमार (१९)) याने वांद्रे - वरळी सी लिंक येथे आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, त्याचं दैव बलवत्तर होतं म्हणूनच सी लिंक तैनात असलेल्या गार्डने त्याला समुद्रात उडी मारण्यापासून वाचविले आणि त्यानिमित्ताने पोलिसांच्या तपासातून बडोदा येथे राहणाऱ्या आई - वडिलांना आपला मुलगा परत मिळाला आहे. याप्रकरणी वरळी पोलीस पुढील तपास करत असून मुलाला आई - वडिलांच्या ताब्यात सोपविले जाईल असे वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाला वरपे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

वरपे यांनी पुढे सांगितले की, २०१७ साली १७ वर्षाचा असताना उजयकुमारने बडोदा येथून पळ काढून मुंबई गाठली होती. त्यापासून तो बेपत्ता झाल्याने अपहरणाचा गुन्हा बडोद्यातील देसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुंबईत येऊन अजयकुमार छोटी - मोठी कामं करून पोट भरत होता. दादर येथील एका कपड्याच्या दुकानात तो काम करत होता असून नैराश्याने त्याने टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करण्याचं ठरविलं. त्याप्रमाणे आज त्याने वरळी येथून वांद्रे येथे जाण्यासाठी उजयकुमारने टॅक्सी केली. वांद्रे - वरळी सी लिंकवर टॅक्सी प्रवासादरम्यान मध्येच थांबवून सी लिंकवरून समुद्रात उडी मारत असताना गार्डने त्याला अडविले. त्यानंतर त्याने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने गळ्यावर आणि दोन्ही हातांवर रागाच्या भरात वार करून घेतले. याबाबत वरळी पोलिसांना माहिती मिळताच जखमी उजयकुमारला भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच या मुलाची माहिती काढत असताना या मुलांबाबत बडोद्यातील देसर पोलीस ठाण्यात २०१७ साली मिसिंग तक्रार असल्याची माहिती समोर आली. मुलाच्या पालकांना आम्ही संपर्क साधला असून ते त्यांना घेऊन जातील अशी माहिती वरपे यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसBandra Worli Sea Linkवांद्रे-वरळी सी लिंकMissingबेपत्ता होणं