शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

गोंदिया हत्याकांडात मृत कुुटंबातील तरुणीवर सर्वाधिक वार, मारेकऱ्याचा टार्गेट होती पोर्णिमा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 23:30 IST

Crime News: गोंदिया जिल्हा हादरवून सोडणाऱ्या एकाच कुटुंबातील चाैघांच्या मृत्यू प्रकरणात बिसेन कुटुंबातील पोर्णिमा नामक तरुणी निर्दयतेचा बळी ठरली आहे.

- नरेश डोंगरे  नागपूर - गोंदिया जिल्हा हादरवून सोडणाऱ्या एकाच कुटुंबातील चाैघांच्या मृत्यू प्रकरणात बिसेन कुटुंबातील पोर्णिमा नामक तरुणी निर्दयतेचा बळी ठरली आहे. मारेकऱ्यांनी तिच्यावर लोखंडी रॉडने अनेक फटके मारून तिचा चेहरा पुरता बिघडवला आहे. त्यावरून मारेकऱ्याचे टार्गेट पोर्णिमा होती, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाचे अनेक पैलू दोन दिवसांत पुढे आले असले तरी पोलीस या संबंधाने उघडपणे काही जाहिर करण्याचे टाळत आहेत.

अमाणूषतेचा कळस गाठणारी चुरडी- तिरोडा (जि. गोंदिया) येथील ही घटना मंगळवारी, २१ सप्टेंबरला उघडकीस आली. शिर्षस्थ पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिसेन कुटुंबाचा प्रमूख रेवचंदचा गळफास लावलेला आणि त्याची पत्नी मालता, मुलगी पोर्णिमा तसेच तेजस हे तिघे रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. पुढे रेवचंद वगळता तिघांच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने प्रहार करून त्यांची हत्या केल्याचे आणि रेवचंदचा गळफासामुळे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी वैद्यकीय अहवालातून स्पष्ट केले आहे. वैद्यकीय अहवालानुसार, आरोपीने सर्वाधिक लोखंडी रॉडचे फटके बिसेन कुटुंबातील पोर्णिमा हिच्यावर हाणले आहेत. तिचा संपर्ण चेहराच आरोपीने बिघडवला आहे. त्यातून पोर्णिमावर आरोपीचा सर्वाधिक राग होता, असा अंदाज पोलीस अधिकाऱ्यांनी काढला आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी या चाैघांचे मृतदेह आढळले त्या खोलीचे दार आतून लावून होते.

घरात शिरण्याचा वरचा मार्ग म्हणजे जिना. या जिन्यावरील कुंड्याही दाटीवाटीने ‘जैसे थे’च ठेवून होत्या. त्याचप्रमाणे श्वान पथक, ठसे तज्ज्ञ आणि एकूणच परिस्थितीजन्य पुरावे या घटनेचा आरोपी म्हणून मृतकाशी संबंधित व्यक्तीकडेच अंगुलीनिर्देश करीत आहेत. मात्र, आरोपीबाबतचा अहवाल जाहिर करण्याऐवजी पोलिसांनी चारही मृतदेहांचे व्हिसेरा प्रिझर्व्ह करून नागपूरच्या रासायनिक प्रयोगशाळेत पाठविले आहेत. तो अहवाल आल्यानंतरच आम्ही या प्रकरणाबाबत काही ठोसपणे सांगू, असे गोंदियाचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी लोकमतला सांगितले आहे.

 तिघे जेवले, रेवचंद उपाशीचवैद्यकीय अहवालानुसार, तेजस, पोर्णिमा आणि त्यांची आई मालता हे तिघेही घटनेच्या पूर्वी जेवले. रेवचंदच्या पोटात केवळ पाणी आढळले. अर्थात त्याने त्या रात्री जेवणही घेतले नव्हते, हे स्पष्ट झाले आहे. जेव्हा की शिजविलेले भरपूर अन्न फ्रीजमध्ये ठेवून होते.वरिष्ठांनी मागून घेतला चाैकशी अहवालगोंदिया जिल्ह्याच्या या घटनेची चर्चा सर्वत्र पसरली आहे. या हत्याकांडाचा आरोपी कोण ते जाणून घेण्यासाठी नागपूर-मुंबईतील वरिष्ठांकडूनही गोंदिया पोलिसांना विचारणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर, गोंदिया-गडचिरोली परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनीही गोंदिया पोलीस प्रशासनाकडून आतापर्यंतचा चाैकशी अहवाल मागून घेतला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी