शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मानवी कवटीमुळे फुटली दहा वर्षांपूर्वी झालेल्या खुनाला वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 23:00 IST

एका घरात सापडलेल्या मानवी कवटीचे गुढ उकलले असून. तब्बल दहा वर्षापुर्वी घडलेल्या खुनाला वाचा फुटली आहे.

 मडगाव - गोव्यातील मडगाव शहरात एका घरात सापडलेल्या मानवी कवटीचे गुढ उकलले असून. तब्बल दहा वर्षापुर्वी घडलेल्या खुनाला वाचा फुटली आहे. भिमसेन कोदागन्नूर (45) या इसमाचा जून 2008 साली खून झाला होता. मडगाव पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास करताना कर्नाटकातील बिजापूर जिल्हयातील कोन्नूर येथून परशुराम जत्तप्पा दोरहनहल्ली (35) याला जेरबंद केले आहे.आज शनिवारी त्याला मडगावात आणून मागाहून रितसर अटक केली. संशयिताने खुनाची कबुली दिली आहे. मयत भीमसेन याचे संशयिताच्या आईशी अनैतिक संबध होते. दारुच्या नशेत तो तिला तसेच परशुराम व त्याच्या दोन बहिणींना मारहाण करीत होता. असाच एके दिवशी त्याने दारुच्या नशेत भांडण उरकरुन काढले असता, परशुराम व तिची आई रेणुका याने भीमसेन याला मारहाण केली होती. मारहाणीनंतर तो बेशुध्द पडला असता त्याचा गळा आवळला होता. मागाहून तो मरण पावल्यानतंर त्याचा मृतदेह पुरुन टाकण्यात आला होता. जून 2008 साली ही घटना घडल्यानंतर चार दिवसांनतर परशुराम व त्याचे कुटुंबिय गोव्यातून आपल्या मूळ गावी गेले होते.आके येथील शेख इस्माईल याच्या मालकीच्या घराशेजारी असलेल्या स्टोअररुममध्ये रेणुका, तिचा मुलगा परशुराम व दोन मुलीसमवेत रहात होत्या. रेणुका हिचा पती बिजापूर येथे असून, मडगावात आल्यानंतर तिचे भीमसेनशी अनैतिक संबध जुळले होते. त्यातून भिमसेन हा तिच्या घरी ये - जा करीत होता. शेख इस्माईल हा पुर्वी दुबईला कामाला होता. भीमसेन बेपत्ता झाल्यानंतर रेणुका कुणालाही काहीही न सांगता अचानक आपल्या कुटुंबियांसमवेत नाहीशा झाल्या होत्या. त्यानंतर रेणुकाने आपला नवरा बेपत्ता असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांनी रेणुकाच्या एका मुलीने त्यांना मालमत्तेच्या वादावरुन आपल्या आई - वडीलांचा खून झाल्याचे सांगितले होते.शनिवारी या खोलीत मानवी कवटी व हाडे सापडल्यानंतर मडगाव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. यावेळी त्यांना तिरप्पा नावाची एक व्यक्ती भिमसेनला ओळखत असल्याची माहिती मिळाली. तिरप्पा व भिमसेन हे दोघेही व्यवसायाने टाईल्स फिटर होते. त्यामुळे ते एकमेकांचे परिचयाचे होते. पोलिसांनी तिरप्पा याला बोलावून घेउन चौकशी केली असता, मुलगा व बायको आपल्याला मारहाण करीत असल्याचे भीमसेन हा आपल्याला सांगत होता अशी माहितीही त्यांनी पोलिसांना दिली. भिमसेनचा पत्ता मिळविल्यानतंर पोलीस निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक बिजापूरला पाठवून देण्यात आले. तेथे पोलिसांनी तपास केला असता, परशुराम याने गावातील मालमत्ता विकून तो गाव सोडून कोन्नूर येथे रहात असल्याची पक्की माहिती मिळाली होती. त्यानंतर कोन्नूर येथे जाउन पोलिसांनी परशुरामाला ताब्यात घेतले. रेणुका हिने किटकनाशक औषध घेउन यापुर्वीच आत्महत्या केली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिली.परशुराम याच्यावर भारतीय दंड संहितेच्या 302 व 201 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. पुढील पोलीस तपास चालू असून, उदया मंगळवारी त्याला रिमांडासाठी न्यायालयात उभे केले जाणार आहे. रेणुका हिच्या दोन मुलीचा या खून प्रकरणात सहभाग आहे का याचाही सदया पोलीस तपास करीत आहे. त्या दोघांचा विवाह झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, त्यांचा शोध चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून