शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अपहरण करून ट्रेनिंग देतात, पैशांचे टार्गेट फिक्स; भिकाऱ्यांच्या नेटवर्कचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 14:34 IST

काही दिवसांनी हा दिव्यांग मुलगा कटिहारच्या रस्त्यांवर भीक मागत असल्याचं कुटुंबाला कळालं.

कटिहार - मुंबई असो वा दिल्ली देशातील अनेक शहरांमध्ये तुम्हाला भिकारी लोकांकडे भीक मागताना पाहायला मिळतील. मुंबईत तर भिकाऱ्यांचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. ज्यात हजारोंच्या संख्येने भिकारी जोडले आहेत. भीक मागण्याच्या व्यवसाय वर्षाकाठी कोट्यवधीच्या घरात जातो. यात दिव्यांग मुले आणि मोठ्या प्रमाणात वृद्धांचा समावेश असतो. मुंबईत भिकाऱ्यांचे रॅकेट चालते. त्याचप्रमाणे आता बिहारमध्येही हे उघड झाले आहे.

रमजानच्या काळात मोठ्या संख्येने भाड्याने भिकारी बनवण्याचं रॅकेट उभं केले जात आहे. त्यांना भीक मागण्याचं काम दिले जात आहे. यातून मिळणारा पैशामधील मोठा हिस्सा माफियांपर्यंत पोहचवला जातो. दिव्यांगांकडून मशिदीसमोर जबरदस्तीनं भीक मागण्यास बसवल्याचं एक प्रकरण उघड झाले आहे. कटिहारच्या मनिहारी येथून दीड महिन्यापूर्वी गुलशन नावाचा दिव्यांग मुलगा बेपत्ता झाला होता. नातेवाईकांनी त्याला खूप शोधलं परंतु तो सापडला नाही. त्यानंतर याबाबत पोलीस ठाण्यात रिपोर्ट नोंदवण्यात आला.

काही दिवसांनी हा दिव्यांग मुलगा कटिहारच्या रस्त्यांवर भीक मागत असल्याचं कुटुंबाला कळालं. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती देत कटिहार गाठलं. त्यानंतर गुलशनच्या कुटुंबाने जे सांगितले ते धक्कादायक होते. गुलशननं त्याच्या कुटुंबाला सांगितले की, मनिहारीतून एका व्यक्तीने मला फसवून घेऊन गेला. या व्यक्तीचं भिकाऱ्यांशी नेटवर्क होते. तो स्वत: भीक मागतो. सुरुवातीला मला भीक मागण्याचं ट्रेनिंग दिले गेले. त्यानंतर दिवसाला १ हजार ते १५०० रुपये भीक जमा करण्यास सांगितले. हा पैसा ते जमा करतात त्यातील मोठा हिस्सा सिडिंकेटमध्ये जातो. त्यात अनेकजण सहभागी असल्याचं मुलाने सांगितले.

ज्या मुलांचं अपहरण करून भीक मागण्यासाठी लावण्यात येत होते त्यातील बहुतांश अल्पवयीन होते. या रॅकेटमागे काही मोठ्या लोकांचाही हात आहे. जे दिवसाचे कलेक्शन आणि पैशांचा हिशोब ठेवतात. गुलशनने हाजीपूर परिसराचा उल्लेख करत त्याठिकाणी बळजबरीने मुले आणि वृद्धांना भीक मागण्यासाठी अपहरण करून ठेवल्याचं सांगितले. त्याचठिकाणी त्याला ट्रेनिंग दिली गेली. मात्र गुलशनच्या खुलाशामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांनी अशा लोकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. लवकरच आरोपींना अटक करू असं आश्वासन पोलिसांनी दिले आहे.