शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

बॅण्ड स्टँडवरून दिवसाढवळ्या ‘ती’ मुलगी गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 06:36 IST

१५ दिवस झाले तरीही पोलिसांना सापडेना 

मनीषा म्हात्रे

परीक्षेसाठी घराबाहेर पडलेली बोईसर येथील एमबीबीएसची विद्यार्थिनी वांद्रे बॅण्ड स्टॅंडवरून दिवसाढवळ्या गायब झाल्याच्या घटनेला १५ दिवस उलटले आहेत. तपासासाठी वांद्रे पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली; पण स्कॉटलँड यार्ड पोलिसांशी तुलना होणाऱ्या मुंबई पोलिसांच्या हाती अद्याप काहीही लागलेले नाही. मुलीचे आईवडील मात्र यामुळे हवालदिल झाले आहेत.

बोईसर परिसरात कुटुंबीयांसोबत राहणारी स्वदिच्छा मनीष साने ही २२ वर्षीय तरुणी सर जे. जे. रुग्णालयातील ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता पेपर असल्याने सकाळी साडेनऊच्या सुमारास ती घराबाहेर पडली. दुपारी साडेबाराच्या सुमारास चुकीची लोकल पकडल्यामुळे अंधेरीत उतरल्याचे तिने आत्याला फोन करून सांगितले. तोच तिचा शेवटचा कॉल ठरला.

सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तिच्या मैत्रिणीने, स्वदिच्छा ही परीक्षेला तसेच हॉस्टेललाही आली नसल्याचे सांगितले. ते ऐकून कुटुंबीयांना धक्का बसला. घरातील प्रत्येकजण तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, संपर्क झाला नाही. अखेर भाऊ संस्कारने बोईसर पोलीस ठाणे गाठून मुलगी हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनीही तक्रार नोंदवून घेत तपास सुरू केला. पोलीस तपासात त्याच दिवशी दुपारी २ वाजून १२ मिनिटांनी स्वदिच्छा बॅण्ड स्टँड येथील समुद्रकिनारी जाताना दिसल्याचे उघड झाले. त्यानंतर मात्र ती तेथून बाहेर पडताना दिसली नाही. ही तरुणी तेथे का गेली होती, याचेही गूढच आहे. त्यानुसार बोईसर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवत पुढील तपासासाठी वांद्रे पोलिसांकडे वर्ग केला. वांद्रे पोलिसांसह गुन्हे शाखाही याचा समांतर तपास करत आहेत. तिच्या मित्र-मैत्रिणींकडे चौकशी सुरू आहे, तसेच तिच्या मोबाईल तपशिलाच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.

रात्री तीन वाजता तेथील जीवरक्षकासोबतचा तिचा एक सेल्फीही समोर आला आहे. त्याच्या चौकशीतून तरुणी पहाटेपर्यंत तेथेच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी जीवरक्षकाचा मोबाईल ताब्यात घेतला आहे.

स्वदिच्छाचा तपास सुरूस्वदिच्छाच्या शोधासाठी विविध पथके तैनात असून, अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणी तिला अखेरचे पाहिलेल्या जीवरक्षकाचा जबाबही नोंंदविण्यात आला आहे.- मनोहर धनावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वांद्रे पोलीस ठाणे

अपहरणाचा संशयस्वदिच्छा अभ्यासात हुशार आहे. ती हॉस्टेलमध्येच राहायची. दिवाळीच्या सुटीनिमित्ताने ती महिनाभरापूर्वी घरी आली होती. तिच्याकडील किमती ऐवज चोरी करण्याच्या हेतूने तिचे अपहरण करण्यात आल्याचा संशय आहे. पोलिसांनी तिचा लवकरात लवकर शोध घेणे गरजेचे आहे.- संस्कार साने, स्वदिच्छाचा भाऊ

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी