शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

वाईतील चार जणांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

By दत्ता यादव | Updated: March 11, 2024 20:25 IST

सातारा : वाई पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असलेल्या चार जणांच्या टोळीला पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्ह्यातून दोन ...

सातारा : वाई पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असलेल्या चार जणांच्या टोळीला पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले. अक्षय गोरख माळी (वय २१), सनी उर्फ राहुल सुरेश जाधव (२५), सारंग ज्ञानेश्वर माने (२४), वसंत ताराचंद घाडगे (१९, सर्व रा. गुरेबाजार झोपडपट्टी, वाई), अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वरील चौघांवर गर्दी मारामारी करून खुनाचा प्रयत्न करणे, घरफोडी, चोरी करणे, शिवीगाळ, दमदाटी करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

या गुन्ह्यांत चौघांनाही बऱ्याचवेळा अटकही झाली. मात्र, जामिनावर कारागृहातून बाहेर आल्यानंतर पुन्हा त्यांच्या हातून गुन्हे घडत होते. त्यांच्यावर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्यामुळे वाई तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता. या टोळीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून केली जात होती. त्यामुळे वाई पोलिस ठाण्यातील प्रभारी पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी या चाैघांचा हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे पाठविला.

या प्रस्तावावर सुनावणी होऊन अधीक्षक शेख यांनी चौघांनाही सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले. हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलिस अधीक्षक ऑंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, पोलिस उपनिरीक्षक तानाजी माने, हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, केतन शिंदे, अनुराधा चव्हाण यांनी योग्य पुरावे सादर केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी