शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वाईतील चार जणांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

By दत्ता यादव | Updated: March 11, 2024 20:25 IST

सातारा : वाई पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असलेल्या चार जणांच्या टोळीला पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्ह्यातून दोन ...

सातारा : वाई पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असलेल्या चार जणांच्या टोळीला पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले. अक्षय गोरख माळी (वय २१), सनी उर्फ राहुल सुरेश जाधव (२५), सारंग ज्ञानेश्वर माने (२४), वसंत ताराचंद घाडगे (१९, सर्व रा. गुरेबाजार झोपडपट्टी, वाई), अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वरील चौघांवर गर्दी मारामारी करून खुनाचा प्रयत्न करणे, घरफोडी, चोरी करणे, शिवीगाळ, दमदाटी करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

या गुन्ह्यांत चौघांनाही बऱ्याचवेळा अटकही झाली. मात्र, जामिनावर कारागृहातून बाहेर आल्यानंतर पुन्हा त्यांच्या हातून गुन्हे घडत होते. त्यांच्यावर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्यामुळे वाई तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता. या टोळीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून केली जात होती. त्यामुळे वाई पोलिस ठाण्यातील प्रभारी पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी या चाैघांचा हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे पाठविला.

या प्रस्तावावर सुनावणी होऊन अधीक्षक शेख यांनी चौघांनाही सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले. हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलिस अधीक्षक ऑंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, पोलिस उपनिरीक्षक तानाजी माने, हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, केतन शिंदे, अनुराधा चव्हाण यांनी योग्य पुरावे सादर केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी