शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

खंडणीसह दरोडे टाकणारी नवी मुंबईतील टोळी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 05:51 IST

सोनसाखळीसह रोकड हस्तगत

ठाणे : दरोडे टाकून खंडणीही उकळणाऱ्या अभिषेक सिंग (२३, ईश्वरनगर, नवी मुंबई) याच्यासह पाच जणांच्या टोळीला कळवा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून सोनसाखळी तसेच दोन हजारांची रोकडही हस्तगत केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.

कळव्यातील वाघोबानगर येथील रहिवासी चंद्रभान प्रजापती आणि त्यांचे मित्र किशनकुमार राणा हे दोघे वाघोबानगर येथील रस्त्याने ४ डिसेंबर २०१९ रोजी पायी जात होते. त्यावेळी चार जणांच्या एका टोळक्याने या दोघांनाही दगडाने मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, मोबाइल आणि रोकड असा ३५ हजारांचा ऐवज जबरीने हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे यांच्या पथकाने खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशातील लखनऊ येथून अभिषेक यांच्यासह भरत जाधव (२५, रा. नवी मुंबई), आशुतोष पाटोळे (१९, रा. नवी मुंबई), परमेश्वर पाटोळे (१९, रा. नवी मुंबई) आणि अभिषेक आंबावकर (१९, रा. नवी मुंबई) या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांनी जबरीने चोरलेली सोनसाखळी आणि दोन हजारांची रोकडही हस्तगत केली. त्यांनी ४ डिसेंबर रोजी नवी मुंबईतील दिघा येथेही सुनीलकुमार दुबे यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. ती न दिल्याने त्यांना मारहाण करून ठार मारण्याचीही धमकी दिल्याचे चौकशीत उघड झाले.

टॅग्स :jailतुरुंग