शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

तरूणांनो, सतर्क राहा! पैसे मोजून लग्न करायचे अन् लग्न होताच नवरी 'सावधान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 16:43 IST

विविध माध्यमांतून फसवणुकीच्या घटना घडताना दिसतात. आता अनेक जिल्ह्यात लुटेरी दुल्हनची दहशत निर्माण झाली आहे.

गोंदिया : सध्या फसवणुकीचा नवा फंडा सुरु झालेला आहे. परराज्यातून मुली आणायच्या आणि लग्न जमवून द्यायचे. लग्नानंतर पैसे घेऊन नवरीने धूम ठोकायची, असे प्रकार विविध जिल्ह्यात घडल्याचे ऐकिवात आहे. त्यामुळे गोंदियाकरांनो सावधान, संपूर्ण चौकशी, माहिती गोळा करून पुढील पावले उचलून लग्न करा, अन्यथा फसवणुकीला सामोरे जावे लागेल, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

विविध माध्यमांतून फसवणुकीच्या घटना घडताना दिसतात. आता अनेक जिल्ह्यात लुटेरी दुल्हनची दहशत निर्माण झाली आहे. परराज्यातील मुली आणून लग्न लावून द्यायचे, दोन दिवसांनंतर पैसे आणि दागिने घेऊन फरार व्हायचे, असले प्रकार सुरु आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वर मंडळींनी ही बाब गांभीर्याने घेऊन वधू मंडळींकडील सर्व माहिती अचूक घ्यावी. नंतर ते शक्य होत नाही, हे मात्र तितकेच खरे. त्यामुळे नागरिकांनीही सतर्क राहून पुढील पावले उचलावीत, अन्यथा फसवणुकीला सामोरे जावे लागेल. सध्या फसवणुकीचे नवनवे फंडे वापरले जात आहेत. सतर्क राहिल्यास फसवणुकीचे प्रकार टाळता येतील.

लग्नासाठी मुली मिळेनात

मुलींच्या अपेक्षा मोठ्या असल्याने अनेकांना विवाहयोग्य मुली मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेकजण वय वाढत असल्याच्या चिंतेत लग्नाची घाई करून अनोळखी मुलीशी लग्न करण्यास तयार होतात. मात्र, अशा मुलांची नंतर फसवणूक होते.

कोठून आणल्या जातात या मुली ?

अशा मुली परराज्यातून आणल्या जातात. अशा मुलींकडून फसवणुकीचे धंदे अनेक ठिकाणी सुरु असतात. नवनवीन फंडे वापरून फसवणूक केली जाते. यात विनाकारण मुलाला नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यातच वर मंडळाची बदनामी होते. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

लग्नासाठी अनोळखीला पैसे देऊ नका

-लग्न जमविण्यासाठी अनोळखी व्यक्तिला पैसे देऊ नका, अनेकदा पैसे घेऊन मध्यस्थी फरार होतात.

-आधी मुली मिळणे कठीण झाल्याने असे भामटे ठिकठिकाणी पाहावयास मिळतात. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.

गोंदिया जिल्ह्यात असा प्रकार नाही, पण तरीही...

गोंदिया जिल्ह्यात असा प्रकार अद्याप घडलेला नाही. मात्र, लगतच्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी लुटेरी दुल्हनची दहशत चांगलीच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विवाहयोग्य मुलांनी याबाबत अधिक दक्ष राहून वधू मंडळीकडील सर्व बाबी नीट तपासून घ्याव्यात, तिची माहिती गोळा करून चौकशी करावी, योग्य वाटले तरच विवाह करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.