शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

तरूणांनो, सतर्क राहा! पैसे मोजून लग्न करायचे अन् लग्न होताच नवरी 'सावधान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 16:43 IST

विविध माध्यमांतून फसवणुकीच्या घटना घडताना दिसतात. आता अनेक जिल्ह्यात लुटेरी दुल्हनची दहशत निर्माण झाली आहे.

गोंदिया : सध्या फसवणुकीचा नवा फंडा सुरु झालेला आहे. परराज्यातून मुली आणायच्या आणि लग्न जमवून द्यायचे. लग्नानंतर पैसे घेऊन नवरीने धूम ठोकायची, असे प्रकार विविध जिल्ह्यात घडल्याचे ऐकिवात आहे. त्यामुळे गोंदियाकरांनो सावधान, संपूर्ण चौकशी, माहिती गोळा करून पुढील पावले उचलून लग्न करा, अन्यथा फसवणुकीला सामोरे जावे लागेल, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

विविध माध्यमांतून फसवणुकीच्या घटना घडताना दिसतात. आता अनेक जिल्ह्यात लुटेरी दुल्हनची दहशत निर्माण झाली आहे. परराज्यातील मुली आणून लग्न लावून द्यायचे, दोन दिवसांनंतर पैसे आणि दागिने घेऊन फरार व्हायचे, असले प्रकार सुरु आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वर मंडळींनी ही बाब गांभीर्याने घेऊन वधू मंडळींकडील सर्व माहिती अचूक घ्यावी. नंतर ते शक्य होत नाही, हे मात्र तितकेच खरे. त्यामुळे नागरिकांनीही सतर्क राहून पुढील पावले उचलावीत, अन्यथा फसवणुकीला सामोरे जावे लागेल. सध्या फसवणुकीचे नवनवे फंडे वापरले जात आहेत. सतर्क राहिल्यास फसवणुकीचे प्रकार टाळता येतील.

लग्नासाठी मुली मिळेनात

मुलींच्या अपेक्षा मोठ्या असल्याने अनेकांना विवाहयोग्य मुली मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेकजण वय वाढत असल्याच्या चिंतेत लग्नाची घाई करून अनोळखी मुलीशी लग्न करण्यास तयार होतात. मात्र, अशा मुलांची नंतर फसवणूक होते.

कोठून आणल्या जातात या मुली ?

अशा मुली परराज्यातून आणल्या जातात. अशा मुलींकडून फसवणुकीचे धंदे अनेक ठिकाणी सुरु असतात. नवनवीन फंडे वापरून फसवणूक केली जाते. यात विनाकारण मुलाला नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यातच वर मंडळाची बदनामी होते. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

लग्नासाठी अनोळखीला पैसे देऊ नका

-लग्न जमविण्यासाठी अनोळखी व्यक्तिला पैसे देऊ नका, अनेकदा पैसे घेऊन मध्यस्थी फरार होतात.

-आधी मुली मिळणे कठीण झाल्याने असे भामटे ठिकठिकाणी पाहावयास मिळतात. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.

गोंदिया जिल्ह्यात असा प्रकार नाही, पण तरीही...

गोंदिया जिल्ह्यात असा प्रकार अद्याप घडलेला नाही. मात्र, लगतच्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी लुटेरी दुल्हनची दहशत चांगलीच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विवाहयोग्य मुलांनी याबाबत अधिक दक्ष राहून वधू मंडळीकडील सर्व बाबी नीट तपासून घ्याव्यात, तिची माहिती गोळा करून चौकशी करावी, योग्य वाटले तरच विवाह करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.