शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

आर्वी गावावर शाेककळा! एकाच कुटुंबातील चार जणांवर काळाचा घाला; भीषण अपघातात ७ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 20:09 IST

लातूर तालुक्यातील आर्वी येथील शिवाजी साेमवंशी यांच्या राडी येथील नातेवाईकाच्या घरी मावंद्याचा शनिवारी कार्यक्रम हाेता. दरम्यान, या कार्यक्रमासाठी आर्वी, कासारखेडा आणि मळवटी येथील नातेवाईक एका जीपमधून राडीकडे निघाले हाेते.

लातूर : बीड जिल्ह्यातील राडी (ता. अंबाजाेगाई) येथील उत्तमराव गंगणे यांच्या घरी मावंद्याचा कार्यक्रम हाेता. दरम्यान, शनिवारी सकाळी लातूर जिल्ह्यातील आर्वी, कासारखेडा आणि मळवटी येथील नातेवाईक एकाच जीपमधून निघाले हाेते. राडी गाव अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर हाेते. त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर अचानक झडप घातली. या अपघातात आर्वी येथील साेमवंशी कुटुंबातील चार आणि चालकाचा मृत्यू झाला. तर कासारखेडा आणि मळवटी येथील दाेन महिलांचा समावेश आहे. या भीषण अपघाताने आर्वी, कासारखेडा आणि मळवटी गावावर शाेककळा पसरली.

लातूर तालुक्यातील आर्वी येथील शिवाजी साेमवंशी यांच्या राडी येथील नातेवाईकाच्या घरी मावंद्याचा शनिवारी कार्यक्रम हाेता. दरम्यान, या कार्यक्रमासाठी आर्वी, कासारखेडा आणि मळवटी येथील नातेवाईक एका जीपमधून राडीकडे निघाले हाेते. आर्वी येथून सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास जीप मार्गस्थ झाली. एका तासाच्या अंतरावर अंबाजाेगाईनजीकच्या आंबा साखर कारखाना परिसरात समाेरुन येणाऱ्या ट्रकचा आणि जीपचा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण हाेता की, जीपचा चेंदामेंदा झाला. गावातून राडीकडे निघालेल्या जीपचा अपघात झाल्याचे वृत्त गावात धडकताच शाेककळा परसरली. यामध्ये साेमवंशी कुटुंबातील स्वाती बाेडके (३०), वनमाला साेमवंशी (४५), शकुंतला साेमवंशी (३०), साेहम साेमवंशी (१०) आणि जीपचालक खंडू राेहिले (४० सर्व रा. आर्वी ता. जि. लातूर) आणि सराेजाबाई कदम (३८, मळवटी ता. जि. लातूर), चित्रा शिंदे (३५ रा. कासारखेडा ता जि. लातूर) यांचा मृत्यू झाला आहे. वनमाला साेमवंशी आणि स्वाती बाेडके या दाेघी मायलेकी हाेत्या. तर इतर आकरा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अंबाजाेगाई येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर यातील एकाला लातूरच्या खाजगी रुग्णालयात सायंकाळी दाखल केले आहे.

रुग्णवाहिका पाहून फाेडला हंबरडा...

मृतदेह घेवून येणारी रुग्णवाहिका गावात प्रवेश करताच गावातील नातेवाईकांनी एकच हंबरडा फाेडला. हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे हाेते. अपघाताचे वृत्त गावात धडकताच सर्वत्र शाेककळा पसरली. आर्वी गावात रात्री उशिरा पाच जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर अन्य दाेघांवर मळवटी आणि कासारखेडा गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघात