शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

चौघांना तरुणाच्या हत्येप्रकरणी अटक; पूर्ववैमनस्यातून उचलले पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 09:33 IST

कोळसेवाडी पोलिसांनी पेंद्या ऊर्फ अरविंद गाळपांडे याच्यासह एका अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे.

कल्याण - शहराच्या पूर्व भागातील शंभर फुटी रस्त्याच्या चौकात १ जुलै रोजी संदीप राठोड याची पाच जणांनी धारदार हत्याराने हत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस, कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ही हत्या पूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून झाली आहे. या प्रकरणातील अन्य एक आराेपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

संदीप हा द्वारलीपाडा येथे राहत होता. तो १ जुलै रोजी सायंकाळी त्याचा मित्र प्रेम चव्हाण याच्यासोबत दुचाकीवरून घरी निघाला होता. वाटेत शंभरफुटी चौक येथे  एका दारूच्या दुकानातून बीअर घेण्यासाठी संदीप आणि प्रेम थांबले होते. ते परत निघाले असता त्याच चौकात पाच जणांनी संजय याच्यावर चॉपरने हल्ला केला. हल्ला करून ते पसार झाले. 

आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल कोळसेवाडी पोलिसांनी पेंद्या ऊर्फ अरविंद गाळपांडे याच्यासह एका अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे. याप्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शैफ ऊर्फ साहिल शेख आणि विद्यासागर मूर्तील ऊर्फ अण्णा या दोघांना अटक केली आहे. अटक आरोपींपैकी पेंद्या याचे संदीप सोबत काही महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. याप्रकरणी संदीपने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या भांडणाचा राग पेंद्याच्या मनात होता.  संदीपचा वचपा काढण्यासाठी पेंद्याने अन्य तीन साथीदारांना घेऊन संदीपला गाठले. त्याच्यावर चॉपरने हल्ला करून त्याची हत्या केली. आरोपींच्या विरोधात पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.