शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

चौघांना तरुणाच्या हत्येप्रकरणी अटक; पूर्ववैमनस्यातून उचलले पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 09:33 IST

कोळसेवाडी पोलिसांनी पेंद्या ऊर्फ अरविंद गाळपांडे याच्यासह एका अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे.

कल्याण - शहराच्या पूर्व भागातील शंभर फुटी रस्त्याच्या चौकात १ जुलै रोजी संदीप राठोड याची पाच जणांनी धारदार हत्याराने हत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस, कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ही हत्या पूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून झाली आहे. या प्रकरणातील अन्य एक आराेपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

संदीप हा द्वारलीपाडा येथे राहत होता. तो १ जुलै रोजी सायंकाळी त्याचा मित्र प्रेम चव्हाण याच्यासोबत दुचाकीवरून घरी निघाला होता. वाटेत शंभरफुटी चौक येथे  एका दारूच्या दुकानातून बीअर घेण्यासाठी संदीप आणि प्रेम थांबले होते. ते परत निघाले असता त्याच चौकात पाच जणांनी संजय याच्यावर चॉपरने हल्ला केला. हल्ला करून ते पसार झाले. 

आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल कोळसेवाडी पोलिसांनी पेंद्या ऊर्फ अरविंद गाळपांडे याच्यासह एका अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे. याप्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शैफ ऊर्फ साहिल शेख आणि विद्यासागर मूर्तील ऊर्फ अण्णा या दोघांना अटक केली आहे. अटक आरोपींपैकी पेंद्या याचे संदीप सोबत काही महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. याप्रकरणी संदीपने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या भांडणाचा राग पेंद्याच्या मनात होता.  संदीपचा वचपा काढण्यासाठी पेंद्याने अन्य तीन साथीदारांना घेऊन संदीपला गाठले. त्याच्यावर चॉपरने हल्ला करून त्याची हत्या केली. आरोपींच्या विरोधात पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.