शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

अफवांमुळे चोर समजून घेतला युवकाचा बळी, चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 17:33 IST

संतप्त नागरिकांनी एका युवकाला चोर समजून बेदम मारहाण केली. यात त्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला

चंद्रपूर - चंद्रपूर महानगरातील श्‍यामनगर, पागलबाबानगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरींच्या अफवांनी नागरिक हैराण असून त्यांच्यात दहशतीचे वातावरण आहे. यामुळे रात्रीला डोळ्यात अंजन घालून जागत आहे. अशातच संतप्त नागरिकांनी एका युवकाला चोर समजून बेदम मारहाण केली. यात त्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

19 डिसेंबरला रात्रीचे 8.30 ते 9 दरम्यान 2 युवक पागलबाबा परिसरात मित्राचं घर शोधत आले, हे दोन्ही युवक तुकुम परिसरातील होते, पंकज लांडगे व अविनाश कल्लो असे या दोन मित्रांचे नाव, पागलबाबा परिसरात मित्राचं घर शोधण्यासाठी त्यांनी एका घरी विचारणा केली तर त्या घरी एक महिला दोघांना बघताच आरडाओरडा करू लागली व आपल्या परिसरात चोर आले म्हणून नागरिकांना बोलवू लागली, अचानक घडलेल्या या घटनेने दोन्ही युवक घाबरले व ते पळायला लागले, परिसरातील काही नागरिक लाठ्या काठ्या घेऊन त्या युवकांच्या मागे होती.

दोन्ही युवकांचा पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले व त्या परिसरातील एका झाडाला दोघांना बांधले व बेदम मारहाण सुरू केली, युवक वारंवार नागरिकांना विनवण्या करू लागले आम्ही चोर नाही, मित्राचं घर शोधण्यासाठी आलो परंतु नागरिकांनी त्यांचं काही न ऐकता त्यांना मारहाण सुरू ठेवली या मारहाणीत पंकज लांडगे या युवकाचा मृत्यू झाला.

पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी अष्टभुजा परिसर गाठत युवकांना बाहेर काढले परंतु तोपर्यंत पंकज चा मृत्यू झाला होता, अविनाश हा गंभीर जखमी झाला.

परिसरात जेव्हा या प्रकारच्या अफवा उडत होत्या तर पोलिसांनी त्या जागी गष्त वाढवायला हवी होती, फक्त मित्राच्या घरचा पत्ता विचारता विचारता त्याला तेथील नागरिकांनी पंकज ला यमसदनी पाठवले, या प्रकरणात रामनगर पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे, घटनेनंतर खुद्द जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी जाऊन पूर्ण माहिती घेतली.

शहरातील अष्टभुजा, इंदिरानगर, शामनगर, बंगाली कॅम्प परिसरात काही महिन्यांपासून चोरांची चांगलीच दहशत सुरू आहे, चोर परिसरात येऊन आवाज देऊन बाहेर बोलावतात व घरात शिरून चोरी करतात अशी चर्चा खूप दिवसांपासून या परिसरात सुरू आहे, पोलिसांनी याबाबत माहिती मिळविली असता ही निव्वळ अफवा आहे अशी कोणतीही घटना या परिसरात घडलेली नाही.

नागरिकांनी अश्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सुद्धा केले आहे, परंतु या अफवेने कुणी नवीन व्यक्ती या परिसरात गेले तर काय होणार असा प्रश्न पोलिसांसमोर आहे, नवीन व्यक्ती गेला काही बरं वाईट झालं तर? अशीच घटना काल अष्टभुजा परिसरातील पागलबाबा नगर येथे घडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी