शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

अफवांमुळे चोर समजून घेतला युवकाचा बळी, चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 17:33 IST

संतप्त नागरिकांनी एका युवकाला चोर समजून बेदम मारहाण केली. यात त्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला

चंद्रपूर - चंद्रपूर महानगरातील श्‍यामनगर, पागलबाबानगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरींच्या अफवांनी नागरिक हैराण असून त्यांच्यात दहशतीचे वातावरण आहे. यामुळे रात्रीला डोळ्यात अंजन घालून जागत आहे. अशातच संतप्त नागरिकांनी एका युवकाला चोर समजून बेदम मारहाण केली. यात त्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

19 डिसेंबरला रात्रीचे 8.30 ते 9 दरम्यान 2 युवक पागलबाबा परिसरात मित्राचं घर शोधत आले, हे दोन्ही युवक तुकुम परिसरातील होते, पंकज लांडगे व अविनाश कल्लो असे या दोन मित्रांचे नाव, पागलबाबा परिसरात मित्राचं घर शोधण्यासाठी त्यांनी एका घरी विचारणा केली तर त्या घरी एक महिला दोघांना बघताच आरडाओरडा करू लागली व आपल्या परिसरात चोर आले म्हणून नागरिकांना बोलवू लागली, अचानक घडलेल्या या घटनेने दोन्ही युवक घाबरले व ते पळायला लागले, परिसरातील काही नागरिक लाठ्या काठ्या घेऊन त्या युवकांच्या मागे होती.

दोन्ही युवकांचा पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले व त्या परिसरातील एका झाडाला दोघांना बांधले व बेदम मारहाण सुरू केली, युवक वारंवार नागरिकांना विनवण्या करू लागले आम्ही चोर नाही, मित्राचं घर शोधण्यासाठी आलो परंतु नागरिकांनी त्यांचं काही न ऐकता त्यांना मारहाण सुरू ठेवली या मारहाणीत पंकज लांडगे या युवकाचा मृत्यू झाला.

पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी अष्टभुजा परिसर गाठत युवकांना बाहेर काढले परंतु तोपर्यंत पंकज चा मृत्यू झाला होता, अविनाश हा गंभीर जखमी झाला.

परिसरात जेव्हा या प्रकारच्या अफवा उडत होत्या तर पोलिसांनी त्या जागी गष्त वाढवायला हवी होती, फक्त मित्राच्या घरचा पत्ता विचारता विचारता त्याला तेथील नागरिकांनी पंकज ला यमसदनी पाठवले, या प्रकरणात रामनगर पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे, घटनेनंतर खुद्द जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी जाऊन पूर्ण माहिती घेतली.

शहरातील अष्टभुजा, इंदिरानगर, शामनगर, बंगाली कॅम्प परिसरात काही महिन्यांपासून चोरांची चांगलीच दहशत सुरू आहे, चोर परिसरात येऊन आवाज देऊन बाहेर बोलावतात व घरात शिरून चोरी करतात अशी चर्चा खूप दिवसांपासून या परिसरात सुरू आहे, पोलिसांनी याबाबत माहिती मिळविली असता ही निव्वळ अफवा आहे अशी कोणतीही घटना या परिसरात घडलेली नाही.

नागरिकांनी अश्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सुद्धा केले आहे, परंतु या अफवेने कुणी नवीन व्यक्ती या परिसरात गेले तर काय होणार असा प्रश्न पोलिसांसमोर आहे, नवीन व्यक्ती गेला काही बरं वाईट झालं तर? अशीच घटना काल अष्टभुजा परिसरातील पागलबाबा नगर येथे घडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी