शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

पाच अल्पवयीन बालकांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 00:52 IST

लॉकडाऊनच्या कालावधीत शहरातून अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रकार घडत होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत.

नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातून अपहृत असलेल्या पाच अल्पवयीन मुलांचा पोलिसांनी शोध घेतला आहे. या प्रकरणी त्यांना फूस लावून पळवून नेणाऱ्यांनाही अटक झाली आहे. त्यामध्ये चार वर्षांपासून बेपत्ता मुलाचाही शोध लागला आहे.लॉकडाऊनच्या कालावधीत शहरातून अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रकार घडत होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांच्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष तपास करत होते. त्याकरिता उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहायक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अर्जुन गरड यांनी तपास पथके तयार केली होती. या पथकाने दहा दिवसांत पाच गुन्ह्यांचा उलगडा करून अपहरण झालेल्या मुलांची सुटका केली आहे. त्यामध्ये चार अल्पवयीन मुलींचा तर एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. तळोजा येथून दहा वर्षांचा मुलगा मागील चार वर्षांपासून बेपत्ता होता. त्याच्याविषयी राज्यात व राज्याबाहेर चौकशी करताना, कर्नाटकच्या उडपी येथे तो असल्याची माहिती समोर आली. यानुसार, पोलिसांनी त्या ठिकाणावरून त्याला ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले आहे. तर तळोजा, खांदेश्वर, कोपरखैरणे व खारघर येथून बेपत्ता असलेल्या चार अल्पवयीन मुलींना पुणे, मुंबई, सातारा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तर त्यांना फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी मानखुर्दच्या मुंचुर ठाकूर या महिलेसह, तळोजाचा अजय पांडे, खान्देश्वरच्या रवी मोरे यांना पोलिसांनी अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई