शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

लग्नाच्या काही तासांआधी नवरीचं अपहरण, नवरदेव आणि वराती बघत बसले वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 11:58 IST

Bihar Crime News : ही घटना आहे 22 जूनची. लग्नाच्या काही तासांआधीच नवरीला गायब करण्यात आलं. नवरीची आई पिंकी देवीने सांगितलं की, मुलीच्या लग्नाची सगळी तयारी झाली होती.

Bihar Crime News : बिहारमध्ये  फारबिसगंज जिल्ह्यातील गोढीहारेमध्ये एका मजुराच्या मुलीचं लग्नाचं स्वप्न तुटलं. वरात दारात येण्याआधीच नवरीचं अपहरण करण्यात आलं. त्यामुळे आनंदाचं वातावरण दु:खात बदललं. सकाळी तीन वाजेपर्यंत नवरदेवाकडील लोक नवरीची वाट बघत होते. पण अपहरणकर्त्यांनी तिला काही सोडलं नाही.

ही घटना आहे 22 जूनची. लग्नाच्या काही तासांआधीच नवरीला गायब करण्यात आलं. नवरीची आई पिंकी देवीने सांगितलं की, मुलीच्या लग्नाची सगळी तयारी झाली होती. वरात येणार होती. आनंदाने आम्ही लग्नाची तयारी केली होती. पण तेव्हाच गावातीलच एका तरूणाने मुलीचं अपहरण केलं.

आईने सांगितलं की, काही लोकांनी तिच्या मुलीला चहातून गुंगीचं औषध दिलं. त्यानंतर बाईकवरून तिला पळवून घेऊन गेले. गावातील लोक बसले होते. ते म्हणाले 24 तासात मुलीला परत करू. आम्ही वाट बघत राहिलो, पण तसं झालं नाही. नवरदेवाकडील लोकही सकाळी तीन वाजेपर्यंत नवरीची वाट बघत होते.

मुलीचे वडील संजय पासवान यांनी सांगितलं की, खूप आनंदाने मुलीचं लग्न करत होतो. पान टपरी चालवून आपलं जीवन जगत आहोत. नातेवाईकांकडून पैसे घेऊन मुलीचं लग्न करत होतो. लग्नाची पूर्ण तयारी झाली होती. नातेवाईक आणि समाजातील सगळे लोक आले होते. पण तेव्हाच मुलीचं अपहरण करण्यात आलं. गावातील सोनू कुमारवर मुलीला पळवण्याचा आरोप आहे. त्याचे वडील दारू धंदा करतात. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी