शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शेतीच्या वादातून बाप-लेकाचा खून, पळून जाणाऱ्या तिघा भावंडांना अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 05:55 IST

पोलिसांनी सांगितले, उस्तुरी येथील सुरेश आण्णेप्पा बिराजदार (वय ५०) यांचा त्यांच्या भावंडासोबत वडिलोपार्जित शेतीचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.

- आशपाक पठाण

कासारसिरसी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथे शेतीच्या वादातून सख्या तीन भावंडांनी संगनमत करून बाप लेकाचा खून केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. रात्री ११:३० वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण राठोड यांनी दिली.

पोलिसांनी सांगितले, उस्तुरी येथील सुरेश आण्णेप्पा बिराजदार (वय ५०) यांचा त्यांच्या भावंडासोबत वडिलोपार्जित शेतीचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुरेश बिराजदार व त्यांचा मुलगा गणेश व साहील हे तिघेजण शेतात काम करीत असताना आरोपी बसवराज बिराजदार, सुनील बिराजदार व लखन बिराजदार यांनी संगनमत करून अचानक शेतात येऊन लाठी-काठी व दगडाने मारहाण सुरू केली.

या घटनेत सुरेश बिराजदार यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा साहिल (वय २२) यांचा कासार सिरसी ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरा मुलगा गणेश बिराजदार हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मृत सुरेश बिराजदार यांना एकूण चार भाऊ होते; त्यांतील एक भाऊ मृत आहे. घटना घडल्यानंतर तिन्ही आरोपी पळून जात असताना पोलिस उपनिरीक्षक अजय पाटील, पो.हे.कॉ. ज्ञानोबा सिरसाट, राजू हिंगमिरे, पोलिस शिपाई मस्के, गायकवाड यांनी मोठ्या शिताफीने त्यांना तासाभरातच अटक केली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. राठोड तपास करीत आहेत.

तासाभरात तिघांना घेतले ताब्यातसहायक पोलिस निरीक्षक राठोड म्हणाले, शेतीच्या वादातून ही घटना घडली आहे. यात बाप-लेकाचा मृत्यू आहे. या प्रकरणी आरोपी बसवराज बिराजदार, सुनील बिराजदार व लखन बिराजदार यांना घटनेनंतर तासाभरातच अटक केली आहे. सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी