शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

कर्ज देण्याच्या नावाखाली ८०० शेतकऱ्यांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 06:36 IST

अहमदनगरच्या शेवगांवमध्ये २ जुलै रोजी कंपनीने कार्यालय थाटले. कंपनीचे भाडे म्हणून २५ हजार रुपयेही येथे काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या श्रीहरी वायकरला त्यांनी दिले.

मनीषा म्हात्रे -मुंबई : पडिक जमिनींसह शेतीवर कमी व्याजाने ६ ते २५ लाखांपर्यंतचे कर्ज मिळवून देणाºया एका लोभस योजनेला फसून राज्यातील ८०० हून अधिक शेतकऱ्यांनी त्यात गुंतवणूक केली. मात्र ही योजना घेऊन आलेले ठग निघाल्याने शेतकरी कुटूंब हवालदिल झाले आहेत. फसल्या गेलेल्या बीडच्या शेतकरी कुटुंबातील तरुणाने याबाबत मुंबई पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला असून, याप्रकरणी मुंबईतील एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बीडच्या गेवराई येथील मालेगावचा रहिवासी नवनाथ श्रीहरी वायकर (२३) याच्या तक्रारीवरून पोलीस या रॅकेटचा शोध घेत आहेत. त्याचे आईवडील शेतकरी आहेत. घराच्या हलाकीच्या परिस्थितीतही नवनाथ बी.एस.सीच्या द्वित्तीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. घरच्यांना हातभार लावण्यासाठी तो नोकरीच्या शोधात असताना, ३० जानेवारीला एका दैनिकात त्याने, ‘लाईफ इन्फो केअर कंपनीच्या अ‍ॅग्रीकल्चरल लोन, होम लोन, बिझनेस लोन व प्रोजेक्टर लोन इत्यादी लोनसाठी तालुका स्तरावर सेल्स रिप्रझेन्टेटीव्ह नेमणे आहे’ अशी जाहिरात पाहिली. ती पाहून तो कामावर रुजू झाला होता. 

 शेतीवर कर्ज देण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरण, आतापर्यंत ५७ जणांच्या तक्रारीअहमदनगरच्या शेवगांवमध्ये २ जुलै रोजी कंपनीने कार्यालय थाटले. कंपनीचे भाडे म्हणून २५ हजार रुपयेही येथे काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या श्रीहरी वायकरला त्यांनी दिले. २६ जुलै रोजी ४० शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठी येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. त्यानुसार शेतकरी गोळा झाले. मात्र कर्मचारी आलेच नाहीत. त्यानंतर मुंबईतील कार्यालय, मोबाईल बंद करुन पसार झाले. मुंबईतील दाखल गुन्ह्यात नगरसह बीड येथील ५७ जणांच्या तक्रारी आतापर्यंत दाखल आहेत. यात प्रत्येकी २१ ते ४० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.वायकरसारख्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा वापर करत अशाप्रकारे राज्यभरातील ८०० हून अधिक शेतकºयांना गंडविले आहे. त्यापैकी काही जण तक्रारीसाठी पुढे येत आहे. तर, काही जण अजूनही पैसे मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. हा आकडा आणखी मोठा असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.पैसेही गेले आणि कागदपत्रेही...कर्जासाठी शेतकºयांच्या जमिनीचा ७/१२, ८ अ, आधारकार्ड, पॅनकार्ड व वैयक्तिक बचत खाते असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेचा ३ हजार ९७० रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. यात पैसे तर नाही पण त्यांची कागदपत्रेही ठगांकडे आहेत. त्यामुळे कागदपत्रांचा दुरुपयोग होण्याची भीती त्यांना सतावत आहे.अद्याप अटक नाही...याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे. संबंधित कर्मचारी, अधिकाºयांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती एमएचबी पोलीस ठाण्याचे गुन्हे अधिकारी धनंजय लिगाडे यांनी दिली.अशी झाली नवनाथची फसवणूकबीडच्या गेवराई येथील मालेगावचा रहिवासी असलेल्या नवनाथ श्रीहरी वायकर (२३) या तरुणाने कंपनीने शेतीवर कर्ज देण्याच्या नावाखाली राज्यातील ८०० शेतकºयांची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. प्रत्यक्षात चांगली नोकरी मिळेल म्हणून त्याने एका दैनिकात जाहिरात पाहून सदर कंपनीशी संपर्क साधला होता. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवनाथने पोलिसांत धाव घेतली.आता फक्त मुंबई पोलिसांवरच विश्वासआईवडिलांना मदत व्हावी, शिक्षणाचा खर्च निघावा म्हणून पुढाकार घेतला. आधी बेरोजगारीने त्रस्त होतो त्यात, आता यात शेतकºयांच्या झालेल्या फसवणुकीमुळे धक्काच बसला आहे. याबाबत मीच पुढाकार घेत तक्रार केली. आता फक्त मुंबई पोलिसांवरच विश्वास आहे. ते लवकरात लवकर आरोपींना पकडून आमचे पैसे मिळवून देतील ही अपेक्षा आहे. माझ्यासारखे आठशे शेतकरी यात फसल्याचे नवनाथ वायकरने सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी