शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

कर्ज देण्याच्या नावाखाली ८०० शेतकऱ्यांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 06:36 IST

अहमदनगरच्या शेवगांवमध्ये २ जुलै रोजी कंपनीने कार्यालय थाटले. कंपनीचे भाडे म्हणून २५ हजार रुपयेही येथे काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या श्रीहरी वायकरला त्यांनी दिले.

मनीषा म्हात्रे -मुंबई : पडिक जमिनींसह शेतीवर कमी व्याजाने ६ ते २५ लाखांपर्यंतचे कर्ज मिळवून देणाºया एका लोभस योजनेला फसून राज्यातील ८०० हून अधिक शेतकऱ्यांनी त्यात गुंतवणूक केली. मात्र ही योजना घेऊन आलेले ठग निघाल्याने शेतकरी कुटूंब हवालदिल झाले आहेत. फसल्या गेलेल्या बीडच्या शेतकरी कुटुंबातील तरुणाने याबाबत मुंबई पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला असून, याप्रकरणी मुंबईतील एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बीडच्या गेवराई येथील मालेगावचा रहिवासी नवनाथ श्रीहरी वायकर (२३) याच्या तक्रारीवरून पोलीस या रॅकेटचा शोध घेत आहेत. त्याचे आईवडील शेतकरी आहेत. घराच्या हलाकीच्या परिस्थितीतही नवनाथ बी.एस.सीच्या द्वित्तीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. घरच्यांना हातभार लावण्यासाठी तो नोकरीच्या शोधात असताना, ३० जानेवारीला एका दैनिकात त्याने, ‘लाईफ इन्फो केअर कंपनीच्या अ‍ॅग्रीकल्चरल लोन, होम लोन, बिझनेस लोन व प्रोजेक्टर लोन इत्यादी लोनसाठी तालुका स्तरावर सेल्स रिप्रझेन्टेटीव्ह नेमणे आहे’ अशी जाहिरात पाहिली. ती पाहून तो कामावर रुजू झाला होता. 

 शेतीवर कर्ज देण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरण, आतापर्यंत ५७ जणांच्या तक्रारीअहमदनगरच्या शेवगांवमध्ये २ जुलै रोजी कंपनीने कार्यालय थाटले. कंपनीचे भाडे म्हणून २५ हजार रुपयेही येथे काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या श्रीहरी वायकरला त्यांनी दिले. २६ जुलै रोजी ४० शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठी येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. त्यानुसार शेतकरी गोळा झाले. मात्र कर्मचारी आलेच नाहीत. त्यानंतर मुंबईतील कार्यालय, मोबाईल बंद करुन पसार झाले. मुंबईतील दाखल गुन्ह्यात नगरसह बीड येथील ५७ जणांच्या तक्रारी आतापर्यंत दाखल आहेत. यात प्रत्येकी २१ ते ४० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.वायकरसारख्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा वापर करत अशाप्रकारे राज्यभरातील ८०० हून अधिक शेतकºयांना गंडविले आहे. त्यापैकी काही जण तक्रारीसाठी पुढे येत आहे. तर, काही जण अजूनही पैसे मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. हा आकडा आणखी मोठा असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.पैसेही गेले आणि कागदपत्रेही...कर्जासाठी शेतकºयांच्या जमिनीचा ७/१२, ८ अ, आधारकार्ड, पॅनकार्ड व वैयक्तिक बचत खाते असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेचा ३ हजार ९७० रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. यात पैसे तर नाही पण त्यांची कागदपत्रेही ठगांकडे आहेत. त्यामुळे कागदपत्रांचा दुरुपयोग होण्याची भीती त्यांना सतावत आहे.अद्याप अटक नाही...याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे. संबंधित कर्मचारी, अधिकाºयांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती एमएचबी पोलीस ठाण्याचे गुन्हे अधिकारी धनंजय लिगाडे यांनी दिली.अशी झाली नवनाथची फसवणूकबीडच्या गेवराई येथील मालेगावचा रहिवासी असलेल्या नवनाथ श्रीहरी वायकर (२३) या तरुणाने कंपनीने शेतीवर कर्ज देण्याच्या नावाखाली राज्यातील ८०० शेतकºयांची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. प्रत्यक्षात चांगली नोकरी मिळेल म्हणून त्याने एका दैनिकात जाहिरात पाहून सदर कंपनीशी संपर्क साधला होता. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवनाथने पोलिसांत धाव घेतली.आता फक्त मुंबई पोलिसांवरच विश्वासआईवडिलांना मदत व्हावी, शिक्षणाचा खर्च निघावा म्हणून पुढाकार घेतला. आधी बेरोजगारीने त्रस्त होतो त्यात, आता यात शेतकºयांच्या झालेल्या फसवणुकीमुळे धक्काच बसला आहे. याबाबत मीच पुढाकार घेत तक्रार केली. आता फक्त मुंबई पोलिसांवरच विश्वास आहे. ते लवकरात लवकर आरोपींना पकडून आमचे पैसे मिळवून देतील ही अपेक्षा आहे. माझ्यासारखे आठशे शेतकरी यात फसल्याचे नवनाथ वायकरने सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी