शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

भयंकर! 70 हजारांसाठी पोलीस रोज घरी यायचे; लेकाचा त्रास पाहून आईने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 14:18 IST

महिलेच्या मुलावर चोरीचा आरोप केल्यानंतर पोलीस त्यांच्यावर 70 हजार रुपये परत करण्यासाठी दबाव टाकत होते.

उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील एका गावात पोलिसांच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेच्या मुलावर चोरीचा आरोप केल्यानंतर पोलीस त्यांच्यावर 70 हजार रुपये परत करण्यासाठी दबाव टाकत होते. तीन दिवसांत 70 हजार रुपये परत करण्यासाठी पोलिसांनी दबाव आणल्याचा आरोप मुलीने केला आहे.

गदागंज पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने जाळून घेऊन आत्महत्या केली. गावामध्ये चोरीचा संशय महिलेच्या मुलावर घेतल्यानंतर पोलीस त्याच्यावर एफआयआर किंवा तपास न करता 70 हजार रुपये परत करण्यासाठी दबाव टाकत होते. पोलिसांनी तीन दिवसांत 70 हजार परत करण्यास भाग पाडल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या मुलीने केला आहे. यामुळे दुखावलेल्या आईने आत्महत्या केल्याचंही म्हटलं आहे.

लखनच्या घरात पाच दिवसांपूर्वी चोरी झाली होती. गावातील रहिवासी लखन याने त्याच ठिकाणी राहणाऱ्या शिवकुमार मौर्य यांच्या अल्पवयीन मुलावर आरोप केले होते. याप्रकरणी एफआयआर न नोंदवता पैसे परत करण्यासाठी पोलीस शिवकुमार मौर्य यांच्यावर दबाव आणत होते. पोलिसांच्या त्रासामुळे आणि समाजाच्या भीतीने दुखावलेल्या शिवकुमार मौर्य यांच्या पत्नी शांती देवी यांनी स्वत:वर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेतल्याचा आरोप आहे.

गंभीर भाजलेल्या शांतीदेवी यांना रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घरात पोलीस रोज येत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यामुळे आईला खूप त्रास सहन करावा लागला. त्यामुळेच तिने हे टोकाचं पाऊल उचलले. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून, पुढील कारवाई सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी