शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

दिल्लीतील बनावट कॉल सेंटरचा म्होरक्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 03:22 IST

दिल्लीतील बनावट कॉल सेंटर प्रकरणात कफपरेड पोलिसांनी मुख्य सूत्रधार शशांक दुबेसह तिघांना शनिवारी अटक केली. त्यामुळे आरोपींचा आकडा ६ वर गेला आहे.

मुंबई : दिल्लीतील बनावट कॉल सेंटर प्रकरणात कफपरेड पोलिसांनी मुख्य सूत्रधार शशांक दुबेसह तिघांना शनिवारी अटक केली. त्यामुळे आरोपींचा आकडा ६ वर गेला आहे. त्यांच्याकडून तब्बल १६ लॅपटॉपसह १६ मोबाइल फोन, ४ हार्ड डिस्क, १९ सिम कार्ड, वायफाय किट जप्त करण्यात आले आहे.एचडीएफसी बँकेमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने सव्वा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी तरुणीने गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये तक्रार दिली. त्याच तक्रारीच्या आधारे कफपरेड पोलिसांनी तपास सुरूकेला.बँक खात्याच्या आधारे तपास सुरू करीत पंजाब अ‍ॅण्ड नॅशनल बँकेतील खातेधारक देवरुषी शर्मा (२४) याला बेड्या ठोकल्या. त्याच्या चौकशीतून टोळीसाठी बँक खाती उपलब्ध करून देणारा विक्रांत गिरी (२५) याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर जयदीप शास्त्री जाळ्यात अडकला.विक्रांतच्या चौकशीतून या टोळीचा पर्दाफाश झाला आणि पोलिसांनी कॉल सेंटर चालविणारा टोळीचा मुख्य सूत्रधार शशांक दुबे (२८) याच्यासह त्याला बेरोजगार तरुण-तरुणींची माहिती पुरविणाऱ्या मॉन्स्टर डॉट कॉम कंपनीतील कर्मचारी सोनल राणा (३५) आणि शाईन डॉट कॉम कंपनीतील कर्मचारी मनोज तिवारी (३२) यांना अटक केली. गेल्या ४ वर्षांपासून ही टोळी तरुण - तरुणींची फसवणूक करीत होती. अशा प्रकारे या टोळीने मुंबईसह संपूर्ण देशभरातील सुमारे १०० जणांना गंडा घातल्याचे पोलीस तपासात समोर आल्याचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी