शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

फेसबुकवर आधी मैत्री नंतर प्रेम, 10 वर्षांनी लग्न केलं अन् लग्नाच्या 6 दिवसांनंतर झाला फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 13:10 IST

Love Story: शैलेंद्र लग्नाच्या 6 दिवसांनंतरच फरार झाला. तरूणीची मैत्री शैलेंद्रसोबत फेसबुकवर झाली होती आणि 10 वर्षापासूनची ही मैत्री प्रेमात बदलली.

Love Story:  फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 10 वर्षाआधी बोलणं सुरू झालं होतं. पण एका कपलचा लग्नाचा प्रवास लग्नाच्या केवळ 6 दिवसांनंतरच संपला. ही घटना कानपूरच्या एका तरूणीसोबत घडली असून तिने न्यायासाठी पोलीस कमिश्नरकडे मागणी केली. तिने तक्रार दिली की, शैलेंद्र सिंह गौतम नावाच्या व्यक्तीसोबत 10 वर्षाच्या अफेअरनंतर एक जुलै  2022 ला लग्न झालं. शैलेंद्र लग्नाच्या 6 दिवसांनंतरच फरार झाला. तरूणीची मैत्री शैलेंद्रसोबत फेसबुकवर झाली होती आणि 10 वर्षापासूनची ही मैत्री प्रेमात बदलली. दोघांनी सोबत आयुष्य जगण्याची शपथ घेतली होती.

लग्नानंतर पती झाला फरार

अनेकदा दोघांची भेट झाली आणि 10 वर्षांच्या प्रेमानंतर 1 जुलै 2022 ला त्यांनी लग्न केलं आणि त्याच्या 6 दिवसांनंतरच शैलेंद्र सिंग गौतम फरार झाला. तरूणी त्याचा ठिकठिकाणी शोध घेत राहिली, पण तो काही सापडला नाही.  तरूणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शैलेंद्रला 10 जुलैला शोधून काढलं. आता तरूणीने पोलिसात तक्रार दिली की, शैलेंद्र आणि त्याचा परिवार तिच्यावर हुंड्यासाठी दबाव टाकत आहे. ते 25 लाख रूपये रोख आणि कारची डिमांड करत आहेत.

तरूणीने आरोप केला की, 10 वर्षाच्या नात्यादरम्यान शैलेंद्रने अनेकदा तिचं शारीरिक शोषण केलं. लग्नाचा तगादा लावल्यानंतर शैलेंद्रने रजिस्टर्ड मॅरेज आणि आर्य़ समाज मंदिरात लग्न केलं. ज्याच्या 6 दिवसांनंतर तो अचानक गायब झाला. तरूणीने सांगितलं की, तिने पोलिसात तक्रार दाखल केली आहे आणि त्यांनी तिला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट