शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

महिलेने प्रियकरासोबत मिळून केली पती आणि तीन मुलांची हत्या, मग जळून मेल्याचा रचला बनाव, अखेर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 15:19 IST

Crime News: हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अग्निकांडाबाबत आता धक्कादायक गौप्यस्फोट झाला आहे. मात्र आता हे सुनियोजित हत्याकांड होते. (Extramarital affair) आणि या महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून पती आणि मुलांची हत्या केल्याचे समोर आले आहे.

चंबा (हिमाचल प्रदेश) - हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अग्निकांडाबाबत आता धक्कादायक गौप्यस्फोट झाला आहे. या अग्निकांडामध्ये वडील आणि तीन मुलांचा होरपळून मृत्यू झाला होता. मात्र मुलांची आई वाचली होती. मात्र आता हे सुनियोजित हत्याकांड होते. आणि या महिलेने तिच्या प्रियकरासोबत मिळून पती आणि मुलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. सदर महिलेचे गावातील जमात अली नामक इसमासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. दोघेही एकत्र राहू इच्छित होते. त्यातून त्यांनी हे भयानक कारस्थान रचले त्यांनी घराला आग लावली आणि त्यामध्ये तीन मुले आणि त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार १४ सप्टेंबर रोजी चंबामधील चुराह उपमंडलामधील करातोह गावातील एका घरात आग लागून ३ मुलांसह पतीचा मृत्यू झाला होता. यामध्ये या मुलांची आई आश्चर्यकारकरीत्या वाचली होती. सर्वजन या दुर्घटनेला अपघात समजत होते. मात्र या महिलेने पती मोहम्मद रफी, मोठा मुलगा जैतून, दुसरा मुलगा समीर आणि मुलगी जुलेखा यांना अत्यंत चलाखीने ठार मारले होते.

प्रसारमाध्यमांमधील वृत्तानुसार विवाहापूर्वी जमात अली तरुण महिलेच्या प्रेमात पडला होता. तसेच त्याला तिच्याशी विवाह करायचा होता. मात्र महिलेचा विवाह मोहम्मद रपी याच्याशी झाला. मात्र असे असले तरी जमात अली भुरावर प्रेम करत होता. तो तिच्याशी बोलण्यासाठी दोन-तीन वेळा गावातही आला होता.

दरम्यान, पोलीस तपासामध्ये दोघेही एकमेकांवर हत्येचा आरोप करत आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार आधी या सर्वांची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या करण्यात आली. पोलीस या हत्याकांडात कुऱ्हाड हे मोठे हत्यार असल्याचे गृहित धरून तपास करत आहेत. ही कुऱ्हाड फिंगर प्रिंट तपासण्यासाठी फॉरेंसिक लॅबमध्ये पाठवण्यात आली आहे. तसेच तेथून रिपोर्ट आल्यावर फिंगर प्रिंट तपासून पाहिले जातील. तपासामध्ये सदर तरुण या महिलेला तिथून उठवून घेऊन गेला, त्यामुळे ती वाचल्याचेही सांगण्यात आले.

सदर महिलेचा पती आणि मुलांचा जळून मृत्यू झाला नसल्याचे पोस्टमार्टममधून समोर आले आहे. नंतर पोलिसांना सदर महिलेची कसून चौकशी केली असता तिने सारे काही कबूल केले. पोलिसांनी मृताच्या वडिलांचा जबाब नोंदवला असून, त्यानंतर मृताची पत्नी आणि जमात अली याला अटक केली आहे. आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHimachal Pradeshहिमाचल प्रदेश