शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

बालसुधारगृहातून आठ मुलींचे पलायन! सात सापडल्या, एकीचा शोध सुरू; कारभारावर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 10:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क,  उल्हासनगर : शहरातील सरकारी मुलींच्या बालसुधारगृहातून मंगळवारी पहाटे तीन वाजता आठ मुली पळून गेल्याची घटना घडली. ...

लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर : शहरातील सरकारी मुलींच्या बालसुधारगृहातून मंगळवारी पहाटे तीन वाजता आठ मुली पळून गेल्याची घटना घडली. याप्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून,  पोलिसांनी कल्याण व विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनदरम्यान पळून गेलेल्या आठ पैकी सात मुलींचा शोध घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली.

उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात शांतीभवन येथे सरकारी मुलींचे बालसुधारगृह आहे. मंगळवारी पहाटे एकूण आठ मुलींनी संगनमत करून खिडकीचे लोखंडी गज वाकवून पळ काढला. मुली पळून गेल्याची माहिती रात्री बालसुधारगृहाच्या सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्यावर, त्यांनी हिललाईन पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिस पथकाने कल्याण व विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनदरम्यान आठपैकी सात मुलींचा शोध लागला. मात्र, एक मुलगी पळून गेली.

कारभारावर प्रश्नचिन्ह

  • बालसुधारगृहाच्या अधीक्षिका व्हीव्हीएन सिल्व्हर यांनी पळून गेलेल्या मुली सापडल्याची माहिती दिली. सर्व मुली उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आदी ठिकाणच्या रहिवासी असून, त्यांच्या घरचा पत्ता शोधण्याचे काम पोलिस करीत आहेत.
  • मुलींना घरी जायचे होते म्हणून त्या पळून गेल्याची माहिती सिल्व्हर यांनी दिली. तर जगताप यांच्या चौकशीत मुलींना सुखसुविधा व जेवण नियमित तसेच चांगले दिले जात नाही म्हणून पळून गेल्याचे म्हटले आहे.
  • महिला केअरटेकर, पोलिस बंदोबस्त असतानाही मुली पळून गेल्याची घटना घडल्याने बालसुधारगृहाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर