शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

बालसुधारगृहातून आठ मुलींचे पलायन! सात सापडल्या, एकीचा शोध सुरू; कारभारावर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 10:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क,  उल्हासनगर : शहरातील सरकारी मुलींच्या बालसुधारगृहातून मंगळवारी पहाटे तीन वाजता आठ मुली पळून गेल्याची घटना घडली. ...

लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर : शहरातील सरकारी मुलींच्या बालसुधारगृहातून मंगळवारी पहाटे तीन वाजता आठ मुली पळून गेल्याची घटना घडली. याप्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून,  पोलिसांनी कल्याण व विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनदरम्यान पळून गेलेल्या आठ पैकी सात मुलींचा शोध घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली.

उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात शांतीभवन येथे सरकारी मुलींचे बालसुधारगृह आहे. मंगळवारी पहाटे एकूण आठ मुलींनी संगनमत करून खिडकीचे लोखंडी गज वाकवून पळ काढला. मुली पळून गेल्याची माहिती रात्री बालसुधारगृहाच्या सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्यावर, त्यांनी हिललाईन पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिस पथकाने कल्याण व विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनदरम्यान आठपैकी सात मुलींचा शोध लागला. मात्र, एक मुलगी पळून गेली.

कारभारावर प्रश्नचिन्ह

  • बालसुधारगृहाच्या अधीक्षिका व्हीव्हीएन सिल्व्हर यांनी पळून गेलेल्या मुली सापडल्याची माहिती दिली. सर्व मुली उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आदी ठिकाणच्या रहिवासी असून, त्यांच्या घरचा पत्ता शोधण्याचे काम पोलिस करीत आहेत.
  • मुलींना घरी जायचे होते म्हणून त्या पळून गेल्याची माहिती सिल्व्हर यांनी दिली. तर जगताप यांच्या चौकशीत मुलींना सुखसुविधा व जेवण नियमित तसेच चांगले दिले जात नाही म्हणून पळून गेल्याचे म्हटले आहे.
  • महिला केअरटेकर, पोलिस बंदोबस्त असतानाही मुली पळून गेल्याची घटना घडल्याने बालसुधारगृहाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर