शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

बालसुधारगृहातून आठ मुलींचे पलायन! सात सापडल्या, एकीचा शोध सुरू; कारभारावर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 10:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क,  उल्हासनगर : शहरातील सरकारी मुलींच्या बालसुधारगृहातून मंगळवारी पहाटे तीन वाजता आठ मुली पळून गेल्याची घटना घडली. ...

लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर : शहरातील सरकारी मुलींच्या बालसुधारगृहातून मंगळवारी पहाटे तीन वाजता आठ मुली पळून गेल्याची घटना घडली. याप्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून,  पोलिसांनी कल्याण व विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनदरम्यान पळून गेलेल्या आठ पैकी सात मुलींचा शोध घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिली.

उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात शांतीभवन येथे सरकारी मुलींचे बालसुधारगृह आहे. मंगळवारी पहाटे एकूण आठ मुलींनी संगनमत करून खिडकीचे लोखंडी गज वाकवून पळ काढला. मुली पळून गेल्याची माहिती रात्री बालसुधारगृहाच्या सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्यावर, त्यांनी हिललाईन पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिस पथकाने कल्याण व विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनदरम्यान आठपैकी सात मुलींचा शोध लागला. मात्र, एक मुलगी पळून गेली.

कारभारावर प्रश्नचिन्ह

  • बालसुधारगृहाच्या अधीक्षिका व्हीव्हीएन सिल्व्हर यांनी पळून गेलेल्या मुली सापडल्याची माहिती दिली. सर्व मुली उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आदी ठिकाणच्या रहिवासी असून, त्यांच्या घरचा पत्ता शोधण्याचे काम पोलिस करीत आहेत.
  • मुलींना घरी जायचे होते म्हणून त्या पळून गेल्याची माहिती सिल्व्हर यांनी दिली. तर जगताप यांच्या चौकशीत मुलींना सुखसुविधा व जेवण नियमित तसेच चांगले दिले जात नाही म्हणून पळून गेल्याचे म्हटले आहे.
  • महिला केअरटेकर, पोलिस बंदोबस्त असतानाही मुली पळून गेल्याची घटना घडल्याने बालसुधारगृहाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर