शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

ईडीने वर्षभरात नोंदविले ५०५ टक्के अधिक गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2023 06:07 IST

आठ वर्षांत तब्बल ९५ हजार कोटींची मालमत्ता जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाकाय व क्लिष्ट आर्थिक गुन्ह्यांची तपासणी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गेल्या चार वर्षांच्या तुलनेत सरत्या वर्षांत तब्बल ५०५ पट अधिक गुन्हे नोंदविल्याची माहिती आहे. उपलब्ध माहितीनुसार, २०१८-१९ या आर्थिक वर्षात ईडीने एकूण १९५ गुन्हे नोंदविले होते तर, २०२१-२२ या वर्षामध्ये ईडीने १,१८० गुन्ह्यांची नोंद केली आहे.

विशेष म्हणजे, केवळ गुन्हेच नव्हे तर ईडीकडून होणाऱ्या छापेमारीमध्ये देखील मोठी वाढ झाल्याची माहिती आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून उपलब्ध माहितीनुसार, २००४ ते २०१४ या कालावधीमध्ये ईडीने देशभरात एकूण ११२ ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीच्या माध्यमातून एकूण ५,३४६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली, तर २०१४ ते २०२२ या कालावधीमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी देशभरामध्ये २,९७४ ठिकाणी छापेमारी केली आणि या माध्यमातून तब्बल ९५ हजार ४३२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. 

मोबाइल गेमिंग ॲप कंपन्या रडारवर

राजकीय पक्ष व नेते यांच्यावरील कारवाईत एकीकडे वाढ झालेली असतानाच गेल्यावर्षी मोबाइल ॲप, क्रिप्टो करन्सी आदी माध्यमांतून होणाऱ्या व्यवहारांत देखील मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या गुन्ह्यांची ईडीने नोंद केली आहे.

मोबाइल गेमिंग ॲपच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त मोठा घोटाळा झाल्याचे प्रकरण गेल्यावर्षी या तपास यंत्रणेने उजेडात आणले होते, तर मोबाइल ॲपच्या माध्यमातून कर्ज देत ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर देखील ईडीने कारवाईचा मोठा बडगा उगारला होता. या प्रकरणी ६०० पेक्षा जास्त कंपन्यांची झाडाझडती घेण्यात आली होती.

 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMumbaiमुंबई