शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

इस्थर अनुह्या हत्याप्रकरण : सानपला सुनावलेली फाशीची शिक्षा हायकोर्टाने ठेवली कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 17:37 IST

मुंबई उच्च न्यायालयात या शिक्षेविरोधात अपील दाखल करण्यात आलं होतं. या अपिलावर निकाल देताना उच्च न्यायालयाने सानपला सुनावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. 

ठळक मुद्देमुख्य आरोपी चंद्रभान सानपला सत्र न्यायालयाने २०१५ साली फाशीची शिक्षा सुनावली होती फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाच्या न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने कायम ठेवली आहे.मुंबई उच्च न्यायालयात या शिक्षेविरोधात अपील दाखल करण्यात आलं होतं.

मुंबई - २४ वर्षीय  इस्थर अनुह्य़ा या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीचे लोकमान्य टिळक टर्मिनसवरून अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी मुख्य आरोपी चंद्रभान सानपला सत्र न्यायालयाने २०१५ साली फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात या शिक्षेविरोधात अपील दाखल करण्यात आलं होतं. या अपिलावर निकाल देताना उच्च न्यायालयाने सानपला सुनावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. 

5 जानेवारी 2014 च्या पहाटे इस्थर अनुह्य़ा हैदराबादहून ट्रेनने कुर्ला टर्मिनसला आली. मात्र, कुर्ला टर्मिनसवर उतरल्यापासून तिचा काहीच पत्ता लागला नव्हता. 10 दिवसांनी तिचा मृतदेह कांजुरमार्ग ते भांडुपदरम्यान इस्टर्न एक्स्प्रेस वे लगतच्या झुडपामध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला होता. यानंतर सीसीटीव्ही फूटेजच्या साहाय्याने मानखुर्द येथील राहत्या घरातून चंद्रभान सानप याला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर रेल्वेमध्ये चोर्‍या करणे, दरोडे घालण्याचे खटले दाखल आहेत. अखेर सत्र न्यायालयाने सानपला दोषी ठरवलं आणि फाशीची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी पोलिसांनी 36 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचं फूटेज तपासलं आणि त्याआधारेच खुनाचा छडा लावला. स्टेशनवरच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फूटेजमध्ये इस्थरसोबत एक 35 ते 40 वयातील एक व्यक्ती दिसली होती. या व्यक्तीने इस्थरच्या सामानाची ट्रॉली हातात घेतली होती. हा व्यक्ती आरोपी चंद्रभान सानप होता.

खुनाच्या रात्री इस्थर कुर्ला स्टेशनवर उतरल्यावर सानपनं इस्थरला 300 रुपयांत घरी सोडेन असं सांगितलं. मात्र सानपकडे टॅक्सी नसून मोटारसायकल असल्याचं लक्षात आल्यावर इस्थरनं नकार दिला. त्यावर आपला मोबाईल नंबरही घेऊन ठेवा, असं म्हणत इस्थरला सानपनं राजी केलं. त्यानंतर तिला एका अज्ञात जागी नेऊन तिच्यावर बलात्कार करून, तिची गळा दाबून हत्या केली. सुरुवातीला आपला उद्देश केवळ चोरीचा होता. मात्र नंतर आपलं मन बदललं, अशी कबुली सानपनं दिली होती. मात्र, सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाच्या न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने कायम ठेवली आहे. आता आरोपीचे वकील या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुन्हा अपील दाखल करू शकतात. 

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSessions Courtसत्र न्यायालयMurderखूनRapeबलात्कारCourtन्यायालय