शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

इस्थर अनुह्या हत्याप्रकरण : सानपला सुनावलेली फाशीची शिक्षा हायकोर्टाने ठेवली कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 17:37 IST

मुंबई उच्च न्यायालयात या शिक्षेविरोधात अपील दाखल करण्यात आलं होतं. या अपिलावर निकाल देताना उच्च न्यायालयाने सानपला सुनावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. 

ठळक मुद्देमुख्य आरोपी चंद्रभान सानपला सत्र न्यायालयाने २०१५ साली फाशीची शिक्षा सुनावली होती फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाच्या न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने कायम ठेवली आहे.मुंबई उच्च न्यायालयात या शिक्षेविरोधात अपील दाखल करण्यात आलं होतं.

मुंबई - २४ वर्षीय  इस्थर अनुह्य़ा या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीचे लोकमान्य टिळक टर्मिनसवरून अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी मुख्य आरोपी चंद्रभान सानपला सत्र न्यायालयाने २०१५ साली फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात या शिक्षेविरोधात अपील दाखल करण्यात आलं होतं. या अपिलावर निकाल देताना उच्च न्यायालयाने सानपला सुनावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. 

5 जानेवारी 2014 च्या पहाटे इस्थर अनुह्य़ा हैदराबादहून ट्रेनने कुर्ला टर्मिनसला आली. मात्र, कुर्ला टर्मिनसवर उतरल्यापासून तिचा काहीच पत्ता लागला नव्हता. 10 दिवसांनी तिचा मृतदेह कांजुरमार्ग ते भांडुपदरम्यान इस्टर्न एक्स्प्रेस वे लगतच्या झुडपामध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला होता. यानंतर सीसीटीव्ही फूटेजच्या साहाय्याने मानखुर्द येथील राहत्या घरातून चंद्रभान सानप याला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर रेल्वेमध्ये चोर्‍या करणे, दरोडे घालण्याचे खटले दाखल आहेत. अखेर सत्र न्यायालयाने सानपला दोषी ठरवलं आणि फाशीची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी पोलिसांनी 36 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचं फूटेज तपासलं आणि त्याआधारेच खुनाचा छडा लावला. स्टेशनवरच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फूटेजमध्ये इस्थरसोबत एक 35 ते 40 वयातील एक व्यक्ती दिसली होती. या व्यक्तीने इस्थरच्या सामानाची ट्रॉली हातात घेतली होती. हा व्यक्ती आरोपी चंद्रभान सानप होता.

खुनाच्या रात्री इस्थर कुर्ला स्टेशनवर उतरल्यावर सानपनं इस्थरला 300 रुपयांत घरी सोडेन असं सांगितलं. मात्र सानपकडे टॅक्सी नसून मोटारसायकल असल्याचं लक्षात आल्यावर इस्थरनं नकार दिला. त्यावर आपला मोबाईल नंबरही घेऊन ठेवा, असं म्हणत इस्थरला सानपनं राजी केलं. त्यानंतर तिला एका अज्ञात जागी नेऊन तिच्यावर बलात्कार करून, तिची गळा दाबून हत्या केली. सुरुवातीला आपला उद्देश केवळ चोरीचा होता. मात्र नंतर आपलं मन बदललं, अशी कबुली सानपनं दिली होती. मात्र, सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाच्या न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने कायम ठेवली आहे. आता आरोपीचे वकील या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुन्हा अपील दाखल करू शकतात. 

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSessions Courtसत्र न्यायालयMurderखूनRapeबलात्कारCourtन्यायालय