शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

लॉकडाऊनमुळे जेवणाचे हाल, पतीने मोबाईल विकून आणून दिले अन्नधान्य अन् संपवले जीवन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 23:21 IST

अनेकांचे अन्नपाण्यावाचून हाल होत आहेत. असाच धक्कादायक प्रकार हरियाणा येथील गुडगावमध्ये घडला आहे.

ठळक मुद्दे लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर मूळचा बिहरमधील असणारा छाबु मंडल (३५) हा  कामगार आपल्या कुटुंबासहीत अडकून पडला.छाबुने अन्नधान्य आणल्यानंतर पूनम काही कामानिमित्त घराबाहेर पडली.

देशभरातील करोनाबाधितांचा आकडा वाढत असून केंद्र सरकारने लॉकडाउनचा दुसरा टप्पा देशभरात सुरु आहे. मात्र या निर्णयामुळे परराज्यातील मजुरांना खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. रोजंदारीवर म्हणजेच हातावर पोट असणारे हजारो कामगार वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. २२ मार्च रोजी पहिल्यांदा २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली तेव्हा रोजंदारीचे सर्व मार्ग बंद होणार असल्याने अनेक मजूर आपल्या मूळगावी जाण्यासाठी निघाले. अनेकांचे अन्नपाण्यावाचून हाल होत आहेत. असाच धक्कादायक प्रकार हरियाणा येथील गुडगावमध्ये घडला आहे. आत्महत्या करणारा छाबु हा मानसिक तणावात होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गुरुवारी सकाळी यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरु केला. मात्र यासंदर्भात कोणतीही चौकशी केली जाऊ नये असं छाबुच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्यामुळेच पोलिसांनी या प्रकरणात एफआयआरही दाखल केलेली नाही.लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर मूळचा बिहरमधील असणारा छाबु मंडल (३५) हा  कामगार आपल्या कुटुंबासहीत अडकून पडला. पेंटर म्हणून काम करणाऱ्या छाबुने घरातील आठ जणांचे पोट भरण्यासाठी आपला मोबाईल अडीच हजार रुपयांना विकला. त्यामधून घरी अन्नधान्य घेऊन आला. मात्र नंतर घरात इतर कुटुंबीय नसताना घराचा दरवाजा आतून लावून घेत छाबुने गळफास लावून आत्महत्या केली छाबुची पत्नी पूनमने सांगितले की, मोबाईल विकून मिळालेल्या पैशामधून छाबुने घरातील लोकांसाठी अन्नधान्य आणि एक पंखा विकत घेतला. छाबु आई-वडील, चार मुले आणि पत्नीसहीत राहत होता. आमचा सर्वात लहान मुलगा पाच महिन्यांचा आहे.मागील दोन दिवसांपासून आम्ही काहीच अन्न खाल्ले नाहीय. लॉकडाऊननंतर आम्ही अन्नासाठी शेजाऱ्यांवरच विसंबून होतो असंही पूनमने पुढे सांगितलं. छाबुने अन्नधान्य आणल्यानंतर पूनम काही कामानिमित्त घराबाहेर पडली. छाबुची आई आणि वडील मुलांना घेऊन घरासमोरच्या झाडाखाली बसले होते. घरात कोणीही नसल्याने संधीचा फायदा घेऊन छाबुने घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHaryanaहरयाणाMobileमोबाइल