शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

दारुड्याने चालविली स्कूलबस; ४० विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 10:02 IST

उलवे येथे मंगळवारी सकाळी आयएमएस शाळेची बस रिक्षाला धडकली. यावेळी बसमध्ये सुमारे चाळीस विद्यार्थी होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मद्यधुंद अवस्थेत स्कूलबस चालवून ४० विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बसचालकावर गुन्हा दाखल केला आहे. उलवे येथील खासगी शाळेच्या स्कूल बसबाबत हा प्रकार घडला आहे. 

उलवे येथे मंगळवारी सकाळी आयएमएस शाळेची बस रिक्षाला धडकली. यावेळी बसमध्ये सुमारे चाळीस विद्यार्थी होते. स्कूलबस रिक्षाला धडकल्यामुळे रिक्षाचालक व नागरिकांनी बसमध्ये डोकावले असता, स्कूलबसचा चालक मद्यधुंद अवस्थेत डुलत असल्याचे आढळले. त्याला बसतादेखील येत नसल्याने तो स्टेअरिंगवर लोळत होता. अशा अवस्थेत त्याच्याकडून अति वेगात बस पळवली जाऊन नियंत्रण सुटले असता, मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, रिक्षाला बस धडकल्याने वेळीच हा प्रकार उघड झाला. या घटनेनंतर पर्यायी व्यवस्था करून विद्यार्थ्यांना तिथून हलवण्यात आले.

पालकांनी या घटनेची तक्रार शाळा व्यवस्थापनाकडे केली. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत बस चालवून विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण केल्याप्रकरणी अशोक थोरात याच्यावर गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Schoolशाळा