शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
3
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
4
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
5
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
6
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
7
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
8
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
9
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
10
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
11
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
12
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
13
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
14
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
15
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
16
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
17
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
18
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
19
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
20
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा

धक्कादायक! दोन लहानग्यांची गळे कापून निर्घृण हत्या; शेतात मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 5:43 PM

मृतांची ओळख न पटल्यानं पोलीस तपासात अडथळे; परिसरात भीतीचं वातावरण

बहराईच: उत्तर प्रदेशातल्या बहराईचमध्ये शेतात दोन चिमुरड्यांचे मृतदेह आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ माजली आहे. दोन्ही चिमुरड्यांची गळे कापून निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे. मृतांमध्ये एका मुलाचा आणि एका मुलीचा समावेश आहे.

बहराईचमधल्या फखरपूरमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २७ ला जोडणाऱ्या गजाधरपूर-बसंता रस्त्याच्या शेजारी असलेल्या ऊसाच्या शेतात दोन मृतदेह आढळून आले. याबद्दलची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. फखरपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी राजेश कुमार घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला. तू मला का मारलंस, आता मी हिला मारणार! निर्दयी सुनेनं सासूच्या कानशिलात लगावल्या

पोलीस अधीक्षक सुजाता सिंह यांनीदेखील घटनास्थळाचा आढावा घेतला. आरोपींना अटक करण्यासाठी त्यांनी दोन पथकं तयार केली आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश सिंह यांनी दिले आहेत. मात्र मृतदेहांची ओळख न पटल्यानं पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मृतांमध्ये १० वर्षांच्या मुलीचा आणि ८ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. दोघांना दुसऱ्या ठिकाणाहून आणून रात्री त्यांची हत्या करण्यात आली असावी अशा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासाठी श्वान पथकाची मदत घेतली. लवकरच हत्येचं गूढ उकलण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.