शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
3
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
4
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
5
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
6
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
7
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
8
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
9
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
10
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
11
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
12
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
13
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
14
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
15
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
16
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
17
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
18
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
19
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
20
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण

डान्स आणि बारमध्ये युती नको!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 05:02 IST

डान्स आणि बारला एकत्रित परवानगी देऊच नये, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करणार असल्याचा निर्णय डान्सबारविरोधी मंचाने जाहीर केला आहे.

मुंबई : डान्स आणि बारला एकत्रित परवानगी देऊच नये, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करणार असल्याचा निर्णय डान्सबारविरोधी मंचाने जाहीर केला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंचाच्या समन्वयक वर्षा विद्या विलास यांनी ही माहिती दिली. सरकारने पुरेसे पुरावे सादर न करता अयोग्यपणे बाजू मांडल्यानेच डान्सबार पुन्हा खुले होणार असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.वर्षा विद्या विलास म्हणाल्या की, डान्सबारवरील बंदीवेळी ६९ संस्थांनी एकत्रित येत स्थापन केलेल्या डान्सबारविरोधी मंचाने सरकारला अनेक पुरावे सादर केले होते. या पुराव्यांत बारबालांच्या शोषणासह डान्सबारमधील विविध बेकायदेशीर आणि अश्लील बाबींचा समावेश होता. सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचे काम डान्सबारमुळे होत असून, रोजगारनिर्मितीसाठी आणि कलेसाठी वेगळे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र या दोन कारणांसाठी केवळ डान्सबार हाच उपाय नाही. विविध राज्यांतील परंपरेने सुरू असलेल्या जातींमधील नृत्यप्रकारांचा दाखला देत डान्सबार खुले ठेवण्याची मागणी अयोग्य आहे. संबंधित कलांसाठी आणि कलाकारांसाठी सांस्कृतिक केंद्राची उभारणी करता येईल. याशिवाय बारबालांच्या पुनर्वसनासाठी केंद्र स्तरावर शासनाला चांगली योजनाही सुरू करता येईल. मात्र त्याऐवजी डान्स आणि बार एकत्रित करून ‘डान्स-बार’ खुले करणे चुकीचे असल्याचे मत वर्षा विद्या विलास यांनी व्यक्त केले.>सरकारला देणार निवेदनमंचाचे अमोल मडामे यांनी सरकारला डान्सबारच्या माध्यमातून आधुनिक जातीयवाद मांडायचा असल्याची टीका केली. ते म्हणाले, विविध राज्यांमधील मागासलेल्या विशिष्ट जातींमधील महिला व तरुणीच डान्सबारमध्ये नाचगाण्याचे काम करीत आहेत. बहुतेक प्रकरणांत तरुणींना फसवून किंवा त्यांच्या गरजेचा गैरफायदा घेत बारबाला म्हणून त्यांना काम करायला लावले जाते. त्यामुळे या तरुणींना सन्मानाने जगता यावे, यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी आवश्यक पुरावे आणि सर्वेक्षणात मदत करण्यासाठी सरकारने सामाजिक संस्थांची मदत घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. त्यासाठी या आठवड्यात राज्यस्तरावर या विषयावर काम करणाऱ्या सामाजिक संस्था व संघटनांची बैठक घेण्यात येईल. तसेच सरकारला निवेदन देऊन न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.