शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भारताच्या उप उच्चायुक्तांनी २ तास कूलभूषण यांच्याशी केली चर्चा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 17:48 IST

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फटकारल्यानंतर पाकिस्तानने कूलभूषण यांना कॉउन्सिलर अ‍ॅक्सेस देण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देकूलभूषण यांना २०१६ साली अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच सुमारे तीन वर्षांनंतर कूलभूषण यांना कॉउन्सिलर अ‍ॅक्सेस मिळाला आहे.द हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताने हे प्रकरण नेल्यानंतर न्यायालयाने कूलभूषण यांना ताताडीने कॉउन्सिलर अ‍ॅक्सेस देण्याचे निर्देश पाकिस्तानला दिले होते.

इस्लामाबाद - हेरगिरी आणि विध्वंसक कृत्ये करण्याच्या आरोपावरून दोषी ठरवून लष्करी न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कमांडर कुलभूषण जाधव यांना कॉउन्सिलर अ‍ॅक्सेस देण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयानंतर सोमवारी भारताच्या उप उच्चायुक्त गौरव अहलूवालिया यांनी कूलभूषण जाधव यांची भेट घेतली आहे. दोघांत जवळपास दोन तास चर्चा झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव चर्चेचे ठिकाण जाहीर केलेले नाही. ही भेट इस्लामाबादमधील एका अज्ञात ठिकाणी झाल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले. कूलभूषण यांना २०१६ साली अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच सुमारे तीन वर्षांनंतर कूलभूषण यांना कॉउन्सिलर अ‍ॅक्सेस मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फटकारल्यानंतर पाकिस्तानने कूलभूषण यांना कॉउन्सिलर अ‍ॅक्सेस देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसारआज दुपारी साडेबारा वाजता भारताचे उप उच्चायुक्त गौरव अहलूवालिया यांनी कूलभूषण यांची भेट घेतली. पाकिस्तानने दोन तासांसाठी कूलभूषण यांनी कॉउन्सिलर अ‍ॅक्सेस दिला होता. या भेटीत गौरव यांनी तुरुंगात कूलभूषण यांना पाकिस्तानातील तुरुंगात देण्यात येणाऱ्या वर्तणुकीबाबत माहिती घेतली. तसेच त्यांना येणाऱ्या समस्या, त्यांच्या मदतीबाबतच्या मागण्या समजून घेऊन भारताची पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे. द हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताने हे प्रकरण नेल्यानंतर न्यायालयाने कूलभूषण यांना ताताडीने कॉउन्सिलर अ‍ॅक्सेस देण्याचे निर्देश पाकिस्तानला दिले होते. त्यानुसार आज कुलभूषण यांच्याशी  भारताच्या उप उच्चायुक्त यांची भेट झाली आहे. 

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवIndiaभारतPakistanपाकिस्तानCourtन्यायालय