शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एसआरए सदनिका ट्रान्सफर करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी, दहिसर उपजिल्हाधिकारी कार्यालयावर खासदारांचे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 22:59 IST

Mumbai News:

मुंबई-एसआरएचे घर 10 वर्षे विकत येत नाही आणि विकत घेणाऱ्याच्या नावावर ट्रान्सफर होत नाही असा कायदा आहे. सरकारकडे एसआरएचे घर ट्रान्सफर करण्याचा प्रस्ताव प्रलंबित असतांना मात्र दहिसरच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाचे काही अधिकारी दहिसर येथील एसआरए वसाहतीत जाऊन दरवाज्यावर एक लाख रुपये भरा अश्या नोटिसा लावून जात आहेत. विशेष म्हणजे या नोटिसवरील जानेवारी २०२१ची तारीख कट करून यावर पाचव्या महिन्याची तारिख टाकण्यात आली आहे,आणि या नोटीसा नवव्या महिन्यात एसआरए सदनिका धारकांना देण्यात आल्या. त्यामुळे अश्याप्रकारे भ्रष्टाचार करणाऱ्या येथील अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी चक्क दहिसरच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आज आपला मोर्चा वळवला.आणि सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करून त्यांनी येथील भ्रष्टाचार उघडकीस आणला. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जातीने लक्ष घालून झोपडपट्टीवासीयांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

येथील अधिकारी हरिश्चंद्र पाटील आणि गुलाम परदेशी या अधिकाऱ्यांची बदली झाली असून येथे नवीन अधिकाऱ्यांची अजून नियुक्ती झाली नाही. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांना तर भ्रष्टाचाराला कुरण मिळाले असा आरोप त्यांनी केला.

झोपडपट्टीवासीयांनी एसआरएतून घेतलेली सदनिका विक्रीची सध्याची  १० वर्षांची मर्यादा ५ वर्षे करावी आणि सदनिका ट्रान्सफर शुल्क कमी करण्याच्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावाला आघाडी सरकारने अजून मंजूरी दिली नाही अशी माहिती त्यांनी दिली. मग कोणत्या आधारावर सदर सदनिका ट्रान्सफरच्या नावाखाली येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी एक लाख रुपयांची मागणी करण्याचे नवे षडयंत्र सुरू करून झोपडपट्टीवासीयांना घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती भाजपा व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला दिली. त्यामुळे असे प्रकार जर दहिसरला सुरू असतील तर मुंबईत देखिल सुरू असतील असा टोला त्यांनी लगावला.जर झोपडपट्टीधारकांकडून कोणी अश्या प्रकारे पैसे मागायला घरी येत असतील तर त्यांनी मला थेट फोन करावा, मी स्वतः त्यांच्याकडे येईल आणि संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारेल असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारMumbaiमुंबई