शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

चाकूने वार करून पतीची हत्या, फेसबुक पोस्ट करत पत्नीने दिली कबुली, त्यानंतर...  

By प्रविण मरगळे | Updated: January 4, 2021 09:37 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये चांगले संबंध नव्हते आणि वारंवार वाद होत होता, शनिवारी रात्री दोघांमध्ये टोकाचं भांडण झालं

ठळक मुद्देदिल्लीच्या छतरपूरमध्ये महिलेने पतीवर चाकूने वार करुन हत्या केलीएकाच कंपनीत वेगवेगळ्या विभागात काम करत होते पती-पत्नीओळखीचं रूपांतर प्रेमात झालं अन् ८ वर्षापूर्वी दोघांनी लव्ह मॅरेज केलं होतं

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील छतरपूर एक्सटेंशन परिसरात शनिवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली, याठिकाणी एका ३६ वर्षीय महिलेने तिच्या पतीची चाकूने वार करून हत्या केली त्यानंतर स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. इतकचं नाही तर या महिलेने पतीची हत्या केल्यानंतर या घटनेचा कबुलीजबाब फेसबुकवर पोस्ट करून अपलोड केला.

दक्षिण दिल्लीचे डीसीपी अतुल ठाकूर यांच्या माहितीनुसार, रेणुका नावाची महिला मध्य प्रदेशातील उज्जैन येथील रहिवासी आहे, तर तिचा पती चिराग शर्मा(३७) हरियाणाच्या यमुनानगर भागात राहणारा आहे. दोघंही पती-पत्नी एका इन्सुरन्स कंपनीत कामाला होते, चिराग शर्मा सेल्स डिपार्टमेंटमध्ये काम करत होता तर रेणुका त्याच कंपनीत ऑपरेशन डिपार्टमेंटमध्ये कामाला होती, ८ वर्षापूर्वी या दोघांनी प्रेमविवाह केला होता. त्यांना कोणतंही आपत्य नव्हतं, ते दोघं सध्या छतरपूर एक्सटेंशनच्या दुमजली इमारतीत वास्तव्यास होते.

दोघांमध्ये सुरू होता वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये चांगले संबंध नव्हते आणि वारंवार वाद होत होता, शनिवारी रात्री दोघांमध्ये टोकाचं भांडण झालं, यानंतर महिलेने पतीवर चाकूने वार करत हल्ला केला, यानंतर तिने स्वत:ची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, घरमालकाने पोलिसांना दिलेल्या जबाबात या दोघांनी घराचा दरवाजा उघडला नव्हता, त्याचवेळी पीसीआरला एका महिलेच्या फेसबुक पोस्टबाबत माहिती मिळाली, या फेसबुक पोस्टमध्ये तिने पतीची हत्या केल्याचं सांगण्यात आलं होतं.

घटनास्थळी पोलीस पोहचली त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला, त्यावेळी दोघं पती-पत्नी बेसुद्ध अवस्थेत आढळले, चिराग जमिनीवर पडला होता तर रेणुका बेडवर पडलेल्या अवस्थेत होती, जमिनीवर चारही बाजूने रक्ताचे डाग होते, या दोघांमध्ये खूप ताणतणाव असल्याचं पोलिसांना कळालं, या दोघांना पोलिसांनी रूग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी चिरागला मृत घोषित केले तर रेणुकावर अद्याप उपचार सुरू आहेत, महिलेची प्रकृती ठीक असून तिच्यावर लक्ष ठेवले जात आहे. महिलेची प्रकृती सुधारल्यानंतर तिचा जबाब घेतला जाईल असं पोलिसांनी सांगितले. या घटनेमागील रहस्य शोधण्यासाठी पोलीस पती-पत्नी दोघांच्या कुटुंबाची चौकशी करणार आहेत, त्याचसोबत शेजारी आणि घरमालकाचाही जबाब नोंदवण्यात येणार आहे. पुरावे मिळवण्यासाठी पोलीस दोघांचेही फेसबुक पेज तपासणार आहेत.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस