शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

Video: 31 डिसेंबरच्या रात्री अंजलीसोबत नेमकं काय घडलं? मैत्रिणीने सांगितली हॉटेल अन् बॉयफ्रेंड वाली कहानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 21:21 IST

दिल्लीतील कंझावाला परिसरात 31 डिसेंबरच्या रात्री एका तरुणीला कारने चिरडून ठार केल्याची घटना घडली आहे.

नवी दिल्ली: दिल्लीतील कंझावाला इथं 31 डिसेंबरच्या रात्री कारनं चिरडून झालेल्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आज मंगळवारी शवविच्छेदनानंतर अंजलीचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, अंजलीच्या मैत्रिणीनं पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा केला आहे. 31 डिसेंबरच्या रात्री अंजली तिची मैत्रिण निधीसोबत आली होती. निधीनं या प्रकरणाशी संबंधित अनेक न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. 

अंजलीची मैत्रिण निधी हिनं 31 डिसेंबरच्या रात्रीचा सर्व तपशील पोलिसांसमोर मांडला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री तिची मैत्रीण निधी अंजलीसोबत तिच्या स्कूटीवर गेली होती. मात्र तिला या अपघातात कोणतीही दुखापत झाली नाही. विशेष पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सागर प्रीत हुड्डा यांनी सांगितले की, ती (अंजलीची मैत्रीण निधी) खूप घाबरली होती, त्यामुळे जेव्हा अपघात झाला तेव्हा ती अंजलीला सोडून पळून गेली.

निधी म्हणाली, "मी तिला (अंजली) फक्त 15 दिवसांपासून ओळखत होते, पण आमची खूप लवकर मैत्री झाली. आम्ही नवीन वर्ष एकत्र साजरे करण्याचा निर्णय घेतला. 31 डिसेंबरला तिने मला फोन केला आणि मला घेण्यासाठी सुलतानपुरीत आली. त्यानंतर आम्ही रोहिणीला गेलो. ती मला तिच्या घरी घेऊन गेली, मग आम्ही हॉटेलवर गेलो."

निधीने पुढे सांगितले की, ती आणि अंजली पहाटे दोनच्या सुमारास हॉटेलमधून निघाले होते. अंजली चिडलेली होती. ती म्हणत होती की जर तिचा प्रियकर तिला भेटला नाही तर ती मरेल. मी तिला स्कूटी थांबायला सांगितली, पण तिनं थांबवली नाही. काही क्षणातच त्यांच्या स्कूटीला एका गाडीला धडक दिली. यावेळी अंजली कारखाली अडकली, ती वेदनेने खूप व्हिवळत होती, पण गाडीतील लोकांनी तिचा आवाज ऐकून न ऐकल्यासारखा केला आणि जाणीवपूर्वक गाडी पळवली.  गाडी थांबली असती तर अंजलीला वाचवता आलं असतं. पण, गाडीत बसलेल्या लोकांनी प्रयत्नही केला नाही. ते अंजलीला कारने ओढत पळून गेले. 

1 जानेवारीला काय झालं?

एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करणारी 23 वर्षीय अंजली 31 डिसेंबरच्या संध्याकाळी अमन विहारमधील तिच्या घरातून नवीन वर्षाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी निघाली होती. 1 जानेवारीच्या पहाटे, पोलिसांना माहिती मिळाली की एक राखाडी रंगाची बलेनो एक मृतदेह ओढत आहे. पहाटे 4.11 वाजता जोंटी गावातील हनुमान मंदिराजवळ पोलिसांना मृतदेह आढळून आला. अंजलीच्या अंगावर अनेक जखमांच्या खुणा होत्या, कपडे फाटलेले होते आणि दोन्ही पाय शरीरापासून वेगळे झाले होते. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

 

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी31st December party31 डिसेंबर पार्टी