शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

गोरेगावात विजेचा धक्का बसल्याने कामगाराचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 20:46 IST

कंपनीच्या मालकाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचं प्राथमिक माहितीत निदर्शनास आलं. त्यानुसार वनराई पोलिसांनी गुन्हा नोंदवत एकाला अटक केली आहे.

मुंबई - गोरेगाव परिसरात विजेचा धक्का बसल्याने एका ५२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटनाकाल संध्याकाळी घडली. रामसिंगार यादव असं या मृत कामगारचं नाव असून या कंपनीच्या मालकाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचं प्राथमिक माहितीत निदर्शनास आलं. त्यानुसार वनराई पोलिसांनी गुन्हा नोंदवत एकाला अटक केली आहे.

मूळचे उत्तर प्रदेशमधील रहिवासी असलेले रामसिंगार यादव हे मागील अनेक महिन्यांपासून वालभट्ट रोडच्या राजीव गांधी नगर येथील कामा इस्टेटमध्ये साई रबर कंपनीत कामाला होते. सोमवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे ते रबर मोल्डिंग इलेक्ट्राॅनिक हॅडस्प्रे मशीन चालू करण्यासाठी गेले. त्यावेळी विद्युत पुरवठा करणाऱ्या बाॅक्समध्ये चुकीच्या इलेक्ट्रिक वायरच्या जोडणीमुळे मागील अनेक दिवसांपासून स्पार्क होत होता. मात्र, तरी देखील त्याची दुरूस्ती करण्यात आली नव्हती. मशीन चालू करण्यासाठी गेलेल्या यादव यांनी मशीनला हात लावताच विजेच्या झटक्याने ते मागे फेकले गेले. या दुर्घटनेत यादव बेशुद्धावस्थेत कोसळले. त्यावेळी कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना जवळील शासकीय रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी यादव यांच्या मृत्यूस कारणीभूत म्हणून एकाला अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीelectricityवीज