शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

विष प्यायलेल्या विवाहितेला घरातच ठेवल्याने मृत्यू; पतीसह सासूविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 08:43 IST

वेदना असह्य झाल्याने दुसऱ्या दिवशी तिने आपण विष प्यायल्याची माहिती फोनवरून आईला दिली. 

नवी मुंबई : सासरच्या त्रासाला कंटाळून विष प्यायलेल्या विवाहितेला उपचारासाठी देखील मदत न करता घरातच ठेवल्याची घटना समोर आली आहे. अखेर दोन दिवसांनी विवाहितेनेच आपण विष प्यायल्याने माहेरच्यांना कळविल्यानंतर त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण अंगात विष पसरल्याने उपचारादरम्यान १५ दिवसांनी तिचा मृत्यू झाला.

कोपरखैरणे सेक्टर १२ डी येथे राहणाऱ्या कुटुंबात हा प्रकार घडला आहे. मानसी भगत (३६) असे मृत पावलेल्या विवाहितेचे नाव असून ती मूळची बुलढाणा येथील गवई कुटुंबातील आहे. आठ महिन्यांपूर्वी तिचा विवाह कोपरखैरणे येथे राहणाऱ्या अजय योगीराज भगत याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर मानसी ही कोपरखैरणेत पती व सासू कमलाबाई यांच्यासह राहायला होती. मात्र, लग्नाच्या एक महिन्यानंतरच तिला पती व सासूकडून त्रास देण्यास सुरुवात झाली होती. याबाबत ती माहेरच्यांकडे सतत तक्रार करत होती. त्यावरून तिच्या माहेरच्यांनी मानसी हिच्या सासरी येऊन त्यांची समजूत देखील काढली होती. त्यानंतरही छोट्या-छोट्या गोष्टींवरून पती व सासूकडून होणाऱ्या त्रासाला मानसी कंटाळली होती. या त्रासातून सुटकेसाठी तिने १४ जानेवारीला उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे तिला त्रास होऊ लागला असतानाही पती व सासूने तिला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन न जाता तिच्याकडे दुर्लक्ष केले. अखेर विषारी औषध शरीरात पसरू लागले असता मानसीचा त्रासदेखील वाढू लागला. 

रुग्णालयांनी दाखल करण्यास दिला नकारवेदना असह्य झाल्याने दुसऱ्या दिवशी तिने आपण विष प्यायल्याची माहिती फोनवरून आईला दिली. त्यानंतर औरंगाबाद येथील मावशीने मानसीच्या मदतीसाठी धाव घेतली. मात्र, तीन ठिकाणी रुग्णालयात नेऊनही वेगवेगळ्या कारणांनी तिला दाखल करून घेतले नाही. अखेर २० जानेवारीला तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरू झाले. संपूर्ण शरीरात विष पसरले होते. यामुळे २९ जानेवारीला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी