शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सूटकेसमध्ये मृतदेह, शिर गायब, तब्बल १ वर्षांनी झाला हत्येचा खुलासा; पोलीस हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 15:49 IST

सानियाच्या घरच्यांनी पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार नोंदवली. २९ ऑगस्ट २०२२ रोजी सानिया बेपत्ता झाल्याचं तक्रार नोंदवत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

मुंबई - वसई येथील एका बीचवर शिर नसलेला मृतदेह सापडला. हा मृतदेह एका मुलीचा होता. जिला काळ्या रंगाच्या सूटकेसमध्ये बंद केले होते. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी पाठवला त्याचसोबत मृतदेहाचं शिर शोधण्याचे प्रयत्न सुरु केले. मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलीस तपासातील मोठं आव्हान होते. या घटनेला १ वर्ष झाले परंतु पोलिसांच्या हाती काहीच पुरावा लागला नाही. मात्र त्यानंतर अचानक एक व्यक्ती मुलीचा शोध घेत पोलीस स्टेशनला पोहचतो त्यानंतर शिर नसलेल्या मृतदेहाचं भयानक रहस्य ऐकून सर्वच हादरतात. 

२६ जुलै २०२१ वसई त्यादिवशी वसईच्या भूईगाव बीचवर चिखलात काळ्या रंगाची मोठी सूटकेस सापडते. ही बातमी पोलिसांपर्यंत पोहचते. पोलीस घटनास्थळी दाखल होतात. पहिल्याच नजरेत हे सगळं संशयास्पद वाटतं कारण निर्जनस्थळी बीचवर अशी सूटकेस सापडते. या सूटकेसमध्ये एका मुलीचा मृतदेह सापडतो मात्र तो मृतदेह शिर नसलेला असतो. 

हत्येचा गुन्हा दाखलप्रथमदर्शनी ही हत्या असल्याचं निदर्शनास आल्यानंतर वसई पोलिसांनी आयपीसी ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करतात. परंतु खूप प्रयत्नानंतरही पोलिसांच्या हाती काहीच लागत नाही. याचवेळी पोलीस मृतदेह, सूटकेस, मृतदेहावरील कपडे यांचे विविध फोटो राज्यभर पसरवतं. जेणेकरून फोटोवरून पोलिसांना पुरावा हाती लागेल. मात्र काहीच फायदा होत नाही. पोलीस मृतदेहाचं पोस्टमोर्टम करून डीएनए सॅम्पल सुरक्षित ठेवते. या तपासाला १ वर्ष पूर्ण होतात. मात्र मृतदेह कुणाचा याचा सुगावा लागत नाही. 

मुलीच्या शोधात कुटुंब मुंबईत येतंकर्नाटकमधून एक कुटुंब मुलीच्या शोधात मुंबईत पोहचतं. या मुलीचं नाव सानिया शेख असं होतं. जिचं लग्न नालासोपाऱ्यात राहणाऱ्या आसिफ शेखसोबत झाले होते. सोनिया लहान असतानाच तिच्या आईवडिलांचं निधन झालं होते. तिला काका-काकीने वाढवलं होते. मागील १ वर्षापासून काका पुतणीसोबत फोनवरून बोलण्याचा प्रयत्न करत होते. परंतु तिचा फोन स्विच ऑफ लागत होता. जावई आसिफला फोन केला तर तो रॉंग नंबर म्हणून कट करत होता. 

जेव्हा सानियाचे नातेवाईक नालासोपाऱ्याला मुलीच्या शोधात गेले तेव्हा आसिफ आणि तिचं कुटुंब तिथे राहत नसल्याचं पुढे आले. त्यानंतर सानियाच्या काकांनी प्रयत्न केल्यानंतर आसिफ आणि त्याच्या आईशी बोलणं झाले. त्यांनी नालासोपाऱ्याची संपत्ती विकून मुंब्रा इथे राहायला गेल्याचं म्हटलं. जेव्हा मुंब्रा येथे सानियाचे नातेवाईक पोहचले तेव्हा आसिफ आणि लहान मुलगी दिसली परंतु सानिया दिसली नाही. सानिया तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचं सासरच्या मंडळींनी सांगितले. परंतु त्याबाबत सानियाच्या नवऱ्याने तक्रारही दाखल केली नसल्याने कुटुंबाला संशय आला. 

त्यानंतर सानियाच्या घरच्यांनी पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार नोंदवली. २९ ऑगस्ट २०२२ रोजी सानिया बेपत्ता झाल्याचं तक्रार नोंदवत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी वसई येथील मृतदेहाचे फोटो दाखवले ते सानियाच्या नवऱ्याने आणि सासरकडील लोकांनी ओळख पटवण्यास नकार दिला. परंतु जेव्हा हे फोटो सानियाच्या नातेवाईकांनी पाहिले तेव्हा त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. मृतदेहावरील कपडे आणि अन्य खूणांमुळे ओळख पटली. पोलिसांनी अधिक तपास केला असता सासरकडच्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यात सुरुवात केली. मात्र खाकीचा हिसका दाखवताच नवऱ्याने सत्य उलगडलं. आसिफनं वडील हनीफ, भाऊ यासीनसोबत मिळून आधी सानियाचे हात पाय बांधून तिला पाण्याच्या टबात टाकलं. त्यात बुडल्यामुळे तिचा जीव गेला. त्यानंतर पुरावे मिटवण्यासाठी आरोपी वडिलांनी सानियाचं शिर धडापासून वेगळे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. मुलीला दत्तक देण्यावरून आसिफ सानियात वाद झाला होता. त्यावरून आसिफने सानियाला संपवलं.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी