शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

सूटकेसमध्ये मृतदेह, शिर गायब, तब्बल १ वर्षांनी झाला हत्येचा खुलासा; पोलीस हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 15:49 IST

सानियाच्या घरच्यांनी पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार नोंदवली. २९ ऑगस्ट २०२२ रोजी सानिया बेपत्ता झाल्याचं तक्रार नोंदवत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

मुंबई - वसई येथील एका बीचवर शिर नसलेला मृतदेह सापडला. हा मृतदेह एका मुलीचा होता. जिला काळ्या रंगाच्या सूटकेसमध्ये बंद केले होते. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी पाठवला त्याचसोबत मृतदेहाचं शिर शोधण्याचे प्रयत्न सुरु केले. मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलीस तपासातील मोठं आव्हान होते. या घटनेला १ वर्ष झाले परंतु पोलिसांच्या हाती काहीच पुरावा लागला नाही. मात्र त्यानंतर अचानक एक व्यक्ती मुलीचा शोध घेत पोलीस स्टेशनला पोहचतो त्यानंतर शिर नसलेल्या मृतदेहाचं भयानक रहस्य ऐकून सर्वच हादरतात. 

२६ जुलै २०२१ वसई त्यादिवशी वसईच्या भूईगाव बीचवर चिखलात काळ्या रंगाची मोठी सूटकेस सापडते. ही बातमी पोलिसांपर्यंत पोहचते. पोलीस घटनास्थळी दाखल होतात. पहिल्याच नजरेत हे सगळं संशयास्पद वाटतं कारण निर्जनस्थळी बीचवर अशी सूटकेस सापडते. या सूटकेसमध्ये एका मुलीचा मृतदेह सापडतो मात्र तो मृतदेह शिर नसलेला असतो. 

हत्येचा गुन्हा दाखलप्रथमदर्शनी ही हत्या असल्याचं निदर्शनास आल्यानंतर वसई पोलिसांनी आयपीसी ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करतात. परंतु खूप प्रयत्नानंतरही पोलिसांच्या हाती काहीच लागत नाही. याचवेळी पोलीस मृतदेह, सूटकेस, मृतदेहावरील कपडे यांचे विविध फोटो राज्यभर पसरवतं. जेणेकरून फोटोवरून पोलिसांना पुरावा हाती लागेल. मात्र काहीच फायदा होत नाही. पोलीस मृतदेहाचं पोस्टमोर्टम करून डीएनए सॅम्पल सुरक्षित ठेवते. या तपासाला १ वर्ष पूर्ण होतात. मात्र मृतदेह कुणाचा याचा सुगावा लागत नाही. 

मुलीच्या शोधात कुटुंब मुंबईत येतंकर्नाटकमधून एक कुटुंब मुलीच्या शोधात मुंबईत पोहचतं. या मुलीचं नाव सानिया शेख असं होतं. जिचं लग्न नालासोपाऱ्यात राहणाऱ्या आसिफ शेखसोबत झाले होते. सोनिया लहान असतानाच तिच्या आईवडिलांचं निधन झालं होते. तिला काका-काकीने वाढवलं होते. मागील १ वर्षापासून काका पुतणीसोबत फोनवरून बोलण्याचा प्रयत्न करत होते. परंतु तिचा फोन स्विच ऑफ लागत होता. जावई आसिफला फोन केला तर तो रॉंग नंबर म्हणून कट करत होता. 

जेव्हा सानियाचे नातेवाईक नालासोपाऱ्याला मुलीच्या शोधात गेले तेव्हा आसिफ आणि तिचं कुटुंब तिथे राहत नसल्याचं पुढे आले. त्यानंतर सानियाच्या काकांनी प्रयत्न केल्यानंतर आसिफ आणि त्याच्या आईशी बोलणं झाले. त्यांनी नालासोपाऱ्याची संपत्ती विकून मुंब्रा इथे राहायला गेल्याचं म्हटलं. जेव्हा मुंब्रा येथे सानियाचे नातेवाईक पोहचले तेव्हा आसिफ आणि लहान मुलगी दिसली परंतु सानिया दिसली नाही. सानिया तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचं सासरच्या मंडळींनी सांगितले. परंतु त्याबाबत सानियाच्या नवऱ्याने तक्रारही दाखल केली नसल्याने कुटुंबाला संशय आला. 

त्यानंतर सानियाच्या घरच्यांनी पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार नोंदवली. २९ ऑगस्ट २०२२ रोजी सानिया बेपत्ता झाल्याचं तक्रार नोंदवत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी वसई येथील मृतदेहाचे फोटो दाखवले ते सानियाच्या नवऱ्याने आणि सासरकडील लोकांनी ओळख पटवण्यास नकार दिला. परंतु जेव्हा हे फोटो सानियाच्या नातेवाईकांनी पाहिले तेव्हा त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. मृतदेहावरील कपडे आणि अन्य खूणांमुळे ओळख पटली. पोलिसांनी अधिक तपास केला असता सासरकडच्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यात सुरुवात केली. मात्र खाकीचा हिसका दाखवताच नवऱ्याने सत्य उलगडलं. आसिफनं वडील हनीफ, भाऊ यासीनसोबत मिळून आधी सानियाचे हात पाय बांधून तिला पाण्याच्या टबात टाकलं. त्यात बुडल्यामुळे तिचा जीव गेला. त्यानंतर पुरावे मिटवण्यासाठी आरोपी वडिलांनी सानियाचं शिर धडापासून वेगळे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. मुलीला दत्तक देण्यावरून आसिफ सानियात वाद झाला होता. त्यावरून आसिफने सानियाला संपवलं.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी