शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
2
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
3
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
4
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
5
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
6
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
7
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
8
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
9
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
10
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
11
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
12
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
13
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
14
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
15
Car Offers: निसान मॅग्नाइट, होंडा एलिव्हेटसह 'या' लोकप्रिय मॉडेल्सवर ३.२५ लाखांपर्यंत सूट!
16
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
17
पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
18
संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
19
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
20
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 16:52 IST

Cyber Crimes: भारतामध्ये सायबर गुन्हेगार लोकांना लुटण्यासाठी नवे-नवे मार्ग शोधत आहेत.

Cyber Crimes:भारतामध्ये सायबर गुन्हेगार आता लोकांना लुटण्यासाठी नवे-नवे मार्ग शोधत आहेत. अशाच पद्धतींपैकी एक म्हणजे इन्व्हेस्टमेंट स्कॅम, ज्यात अल्पावधीत मोठा नफा देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक केली जाते. गृह मंत्रालयाच्या सायबर विंगने नुकताच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, गेल्या सहा महिन्यांत 30,000 हून अधिक लोक या स्कॅमचे बळी ठरले असून, एकूण ₹1,500 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

अशी होते फसवणूक

सायबर गुन्हेगार लोकांना ऑनलाइन इन्व्हेस्टमेंट ग्रुप, ट्रेडिंग अॅप्स किंवा सोशल मीडिया लिंकद्वारे फसवतात. हे लोक “जलद नफा”, “हाय रिटर्न स्कीम” किंवा “क्रिप्टो इन्व्हेस्टमेंट” अशा नावाखाली पैशांची मागणी करतात. एकदा पैसे पाठवले की, गुन्हेगार संपर्क तोडून गायब होतात.

अहवालात धक्कादायक आकडे

गृह मंत्रालयाच्या सायबर विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 30,000+ लोक इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे शिकार झाले आहेत. याद्वारे ₹1,500 कोटींपेक्षा अधिक रक्कम लुटण्यात आली आहे. बंगळुरू, दिल्ली-NCR आणि हैदराबाद हे या फसवणुकीचे प्रमुख केंद्र ठरले आहेत. देशातील एकूण स्कॅम प्रकरणांपैकी 65% प्रकरणे या तीन शहरांतून आली आहेत. यातही  बंगळुरुमध्ये सर्वाधिक फसवणूक झाली आहे.

कोण झाले सर्वाधिक बळी?

रिपोर्टनुसार, 30 ते 60 वर्षे वयोगटातील लोकांवर सर्वाधिक हल्ले झाले, जे एकूण बळींपैकी 76% आहेत. हे लोक कामकाजी वयात असल्यामुळे डिजिटल गुंतवणुकीत सक्रिय असतात आणि त्यामुळे स्कॅमर्सचे प्रमुख लक्ष्य ठरतात. या स्कॅममध्ये प्रत्येक व्यक्तीला सरासरी ₹51.38 लाखांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी दिल्लीतील नागरिकांना सर्वाधिक आर्थिक फटका बसला आहे. सायबर गुन्हेगार या फसवणुकीसाठी सोशल मीडिया, पेमेंट अॅप्स, व्हॉट्सअॅप ग्रुप्स आणि बनावट वेबसाइट्सचा वापर करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Nationwide investment scam network defrauds 30,000, loots ₹1500 crore in six months.

Web Summary : Investment scams are rampant across India, with cybercriminals defrauding over 30,000 people of ₹1500 crore in just six months by promising high returns through fake online groups and apps. Bengaluru, Delhi-NCR, and Hyderabad are the epicenters, targeting working professionals aged 30-60.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजीIndiaभारत