शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोटींच्या मास्कचा काळाबाजार उघड, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 13:20 IST

देशमुख यांच्यासोबत पोलीस आयुक्त परमबिर सिंह हे देखील उपस्थित होते. 

ठळक मुद्देमुंबईच्या गुन्हे शाखा कक्ष ९ च्या पोलिसांनी तीन ट्रक भरून मास्क हस्तगत केले आहेत.तब्बल २६ लाखा हे मास्क असून बाजारात या मास्कची किंमत १४ कोटी रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबई - कोरोनाच्या पाशर्वभूमीवर मास्कची वाढती मागणी लक्षात घेता मास्कचा काळा बाज़ार करणाऱ्यांचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. जास्तीच्या भावाने मास्कची विक्री करण्यासाठी अंधेरी आणि भिवंडीच्या गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेला १४ कोटी १३ लाख किंमतीचा तब्बल २५ लाख २१ हजार मास्कचा साठा गुन्हे शाखेने जप्त केला आहे. याप्रकरणात चौघांना अटक करत पसार आरोपींचा शोध सुरु आहे. यात गोडाऊन मालक शाहरुख अकील शेख (२३), गुलाम मुर्तजा मुशनीर अली (२०) यांच्यासह माल ठेवणारा मिहीर दर्शन पटेल  (३६) जी त्याचा  ऑपरेटर बालाजी नाडर (३६) यांना अटक करण्यात आली आहे. 

वांद्रे येथे १५ कोटींचे २५ लाख मास्क जप्त केल्याची कारवाई एफडीए आणि मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष  ९ ने केली आहे. देशभरात कोरोनाचा हाहाकार पाहता राज्यात कालपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यातच नागरिक कोरोनाची लागण होण्यापासून वाचण्यासाठी सॅनिटाइझर्स आणि मास्कच्या खरेदी मोठ्या प्रमाणावर करत आहेत. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझर्सचा काळाबाजार आणि भेसळ देखील खूप होताना दिसत आहेत. मुंबईच्या गुन्हे शाखा कक्ष ९ च्या पोलिसांनी तीन ट्रक भरून मास्क हस्तगत केले आहेत. तब्बल अंदाजे  २६ लाख मास्क पोलिसांनी हस्तगत केले आहेत. काळाबाजार करण्यासाठी हे मास्क आणल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. बाजारात या मास्कची किंमत १५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुन्हे शाखा ९ ला भेट देत या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत पोलिसांचे कौतुक केले. यावेळी  देशमुख यांच्यासोबत पोलीस आयुक्त परमबिर सिंह हे देखील उपस्थित होते. 

गुन्हे शाखा कक्ष ९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली देसाई यांच्या पथकाने अंधेरीत कारवाई केली. पोलीस कारवाईत त्यांना तीन ट्रकभरून मास्क आढळून आले. तब्बल २६ लाखा हे मास्क असून बाजारात या मास्कची किंमत १४ कोटी रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः गुन्हे शाखेला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी पोलीस आयुक्त परमबिर सिंग हे देखील उपस्थित होते. 

 

 

गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले की अंधेरी आणि भिवंडी येथील गोडाऊनमधून २५ लाख मास्क हस्तगत करण्यात आले. त्यापैकी ३ लाख एन९५ मास्क असून एकूण १५ कोटींचे मास्क पोलिसांनी इसेन्शियल कमोडिटी ऍक्टअन्वये जप्त केले असून चार जणांना अटक केली आहे. तर दोन फरार आरोपींना पोलीस लवकरच अटक करतील असे पोलीस पुढे म्हणाले.  या कारवाई एकूण १४ कोटी १३ लाख ९९००० हजार किंमतीचा २५ लाख २१ हजार ८०० मास्क हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 लाखोंचे मास्क बाजारात 

यापूर्वी लाखो रुपये किंमतीच्या मास्कची या मंडळीने विक्री केल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. यात मेडिकल मालक तसेच काही दलाल मंडळीना हाताशी धरून काही मालाची विक्री करण्यात आली आहे.

 

२० रूपयांत विक्रीचा प्रयत्न

अटक चौकड़ीच्या चौकशीतून समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मास्कची मागणी लक्षात घेता ही मंडळी २० रुपयाहून अधिक किंमतीने या मास्कची मेडिकल तसेच अन्य दलालांकड़े विक्री करण्याचा प्रयत्नात होती. तसेच भविष्यातील मागणी नुसार ते भाव ठरवणाऱ होते.

 

मास्टरमाइंडचा शोध सुरु

चौकडीला २७ मार्चपर्यंत पोलीस कोठड़ी सुनावण्यात आली आहे. यामागील मुख्य  सूत्रधार कोण आहे? तसेच आणखीन किती जणांचा यात सहभाग आहे? शिवाय त्यांनी हा माल कोठून व कसा आणला ? आदिंबाबत अधिक तपास सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली. 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई